शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

औरंगाबाद मनपाला ७५० कोटींचे देणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:26 IST

महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मिळून मागील विकास कामांचा प्रचंड भडिमार केला. महापालिकेची आर्थिक स्थिती माहीत असतानाही चक्क दहापट अधिक कामांचा डोंगर रचला. लेखा विभागात आज १०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत.

ठळक मुद्देविकासकामांचा भडिमार : १०० कोटींची बिले पडून; ५०० कोटींची कामे अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मिळून मागील विकास कामांचा प्रचंड भडिमार केला. महापालिकेची आर्थिक स्थिती माहीत असतानाही चक्क दहापट अधिक कामांचा डोंगर रचला. लेखा विभागात आज १०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. ५०० कोटी रुपयांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. आयुक्तांच्या सहीसाठी तब्बल १५० कोटींची कामे थांबली आहेत. महापालिकेची आर्थिक घडी इतिहासात प्रथमच एवढी विस्कटलेली असताना सोमवारी तब्बल १८६४ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.मनपाचे तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डात १ कोटींचीच विकास कामे करण्याचा सपाटा लावला होता, त्यामुळे नगरसेवकांना अनावश्यक कामे करता आली नाहीत. त्यांच्या बदलीनंतर नगरसेवक, अधिकाऱ्यांना अक्षरश: रान मोकळे झाले.मागील वर्षी अर्थसंकल्पात समाविष्ट कामांचा धूमधडाकाच लावण्यात आला. कंत्राटदारांना बळजबरी कामे घेण्यास भाग पाडण्यात आले. कंत्राटदारांनीही कोट्यवधी रुपयांची कामे करून टाकली. आता पैसे द्यायचे कोठून, हा सर्वात मोठा प्रश्न भेडसावत आहे. रमजान ईदसाठी कंत्राटदारांना बिले कोठून द्यावीत, हा प्रश्न लेखा विभागाला भेडसावत आहे. सध्या १०० कोटींची बिले लेखा विभागात पडून आहेत.११५ वॉर्डांमध्ये जवळपास ५०० कोटी रुपयांची कामे होत आली आहेत. लवकरच बिले तयार होऊन दायित्व लेखा विभागावर येणार आहे. मागील तीन महिन्यांपासून आयुक्तांच्या सह्या न झालेल्या फायलींची संख्या जवळपास ८५० आहे. या फायलींवर सह्या झाल्या तर किमान १५० कोटींची बिले लेखा विभागात येतील. यामध्ये काही वर्क आॅर्डरच्या फायलीही आहेत.मनपाची झोळी रिकामीशासनाकडून जीएसटीपोटी २१ कोटी रुपये येतात. या रकमेत कर्मचाºयांचा पगार होतो. इतर विभागांकडून मिळणाºया वसुलीत अत्यावश्यक खर्च होतो. कंत्राटदारांना देण्यासाठी तिजोरीत पैसेच नसतात. उत्पन्न वाढावे यादृष्टीने प्रशासन, पदाधिकाºयांकडून कधी प्रयत्नच झालेले नाहीत.महापौरांचा सावध पवित्रामनपाच्या तिजोरीत दरवर्षी ७०० कोटी रुपये येतात. त्यातील ५०० कोटी रुपये निव्वळ पगार, अत्यावश्यक कामांवर खर्च होतात. असे असताना १८६४ कोटी रुपयांचे अर्थसंकल्प कशासाठी मंजूर करण्यात आले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी नमूद केले की, तिजोरीत पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पैसे उभे करण्यात येतील. हळूहळू कंत्राटदारांची बिलेही दिली जातील. परिस्थितीतून मार्ग तर काढावाच लागेल. आयुक्तांनी सुचवलेली कामेही शहरासाठी आवश्यक आहेत. मालमत्ता कर आणि इतर माध्यमांतून येत्या काही दिवसांत पैसे उभे केले जातील.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBudgetअर्थसंकल्प 2023fundsनिधी