शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

औरंगाबाद मनपाला ७५० कोटींचे देणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:26 IST

महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मिळून मागील विकास कामांचा प्रचंड भडिमार केला. महापालिकेची आर्थिक स्थिती माहीत असतानाही चक्क दहापट अधिक कामांचा डोंगर रचला. लेखा विभागात आज १०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत.

ठळक मुद्देविकासकामांचा भडिमार : १०० कोटींची बिले पडून; ५०० कोटींची कामे अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मिळून मागील विकास कामांचा प्रचंड भडिमार केला. महापालिकेची आर्थिक स्थिती माहीत असतानाही चक्क दहापट अधिक कामांचा डोंगर रचला. लेखा विभागात आज १०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. ५०० कोटी रुपयांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. आयुक्तांच्या सहीसाठी तब्बल १५० कोटींची कामे थांबली आहेत. महापालिकेची आर्थिक घडी इतिहासात प्रथमच एवढी विस्कटलेली असताना सोमवारी तब्बल १८६४ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.मनपाचे तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डात १ कोटींचीच विकास कामे करण्याचा सपाटा लावला होता, त्यामुळे नगरसेवकांना अनावश्यक कामे करता आली नाहीत. त्यांच्या बदलीनंतर नगरसेवक, अधिकाऱ्यांना अक्षरश: रान मोकळे झाले.मागील वर्षी अर्थसंकल्पात समाविष्ट कामांचा धूमधडाकाच लावण्यात आला. कंत्राटदारांना बळजबरी कामे घेण्यास भाग पाडण्यात आले. कंत्राटदारांनीही कोट्यवधी रुपयांची कामे करून टाकली. आता पैसे द्यायचे कोठून, हा सर्वात मोठा प्रश्न भेडसावत आहे. रमजान ईदसाठी कंत्राटदारांना बिले कोठून द्यावीत, हा प्रश्न लेखा विभागाला भेडसावत आहे. सध्या १०० कोटींची बिले लेखा विभागात पडून आहेत.११५ वॉर्डांमध्ये जवळपास ५०० कोटी रुपयांची कामे होत आली आहेत. लवकरच बिले तयार होऊन दायित्व लेखा विभागावर येणार आहे. मागील तीन महिन्यांपासून आयुक्तांच्या सह्या न झालेल्या फायलींची संख्या जवळपास ८५० आहे. या फायलींवर सह्या झाल्या तर किमान १५० कोटींची बिले लेखा विभागात येतील. यामध्ये काही वर्क आॅर्डरच्या फायलीही आहेत.मनपाची झोळी रिकामीशासनाकडून जीएसटीपोटी २१ कोटी रुपये येतात. या रकमेत कर्मचाºयांचा पगार होतो. इतर विभागांकडून मिळणाºया वसुलीत अत्यावश्यक खर्च होतो. कंत्राटदारांना देण्यासाठी तिजोरीत पैसेच नसतात. उत्पन्न वाढावे यादृष्टीने प्रशासन, पदाधिकाºयांकडून कधी प्रयत्नच झालेले नाहीत.महापौरांचा सावध पवित्रामनपाच्या तिजोरीत दरवर्षी ७०० कोटी रुपये येतात. त्यातील ५०० कोटी रुपये निव्वळ पगार, अत्यावश्यक कामांवर खर्च होतात. असे असताना १८६४ कोटी रुपयांचे अर्थसंकल्प कशासाठी मंजूर करण्यात आले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी नमूद केले की, तिजोरीत पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पैसे उभे करण्यात येतील. हळूहळू कंत्राटदारांची बिलेही दिली जातील. परिस्थितीतून मार्ग तर काढावाच लागेल. आयुक्तांनी सुचवलेली कामेही शहरासाठी आवश्यक आहेत. मालमत्ता कर आणि इतर माध्यमांतून येत्या काही दिवसांत पैसे उभे केले जातील.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBudgetअर्थसंकल्प 2023fundsनिधी