शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासमोर होणार ७४ कोटींतून भुयारी मार्ग; जुना उड्डाणपूल झाला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 17:17 IST

४०० कोटी रुपयांच्या मूळ प्रकल्प आराखड्यातून आता फक्त विमानतळासमोर भुयारी मार्ग (अंडरपास) करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

ठळक मुद्देपुढच्या आठवड्यात विभागीय आयुक्तालयात बैठकएनएचएआयच्या पथकाकडून पाहणी

- विकास राऊत 

औरंगाबाद : जालना रोड रुंदीकरणाचा प्रस्ताव जवळपास गुंडाळल्यात जमा असून, ४०० कोटी रुपयांच्या मूळ प्रकल्प आराखड्यातून आता फक्त विमानतळासमोर ७४ कोटी रुपयांतून भुयारी मार्ग (अंडरपास) करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यासाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या पथकाने यासाठी पाहणी केली असून, पुढच्या आठवड्यात विभागीय आयुक्तालयात याबाबत सर्वंकष विभागांची बैठक होणार आहे. या बैठकीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, वाहतूक पोलीस विभागाचे प्रमुख, एनएचएआयचे अधिकारी उपस्थित असतील. 

जालना रोड रेकॉर्डमध्ये राष्ट्रीय महामार्ग म्हणून गृहीत धरण्यात आला आहे. त्याला एनएच २११ हा बायपास होईल. केंद्र शासनाच्या धोरणानुसार जेव्हा एनएच २११ बायपास होईल, तेव्हा जालना रोडच्या नॅशनल हायवेचा दर्जा संपुष्टात येईल. तोपर्यंत जालना रोडच्या मूळ ४०० कोटींच्या डीपीआरमध्ये समाविष्ट असलेल्या कामांतून काही महत्त्वांच्या कामांवर खर्च करण्यासाठी दिल्ली मुख्यालयातून एका पथकाने पाहणी केली. त्याअंती जालना रोडवर अमरप्रीत चौक आणि विमानतळासमोर भुयारी मार्ग करण्याचा मुद्दा पुढे आला. त्यातून विमानतळासमोर भुयारी मार्ग होण्याची शक्यता आहे. ७४ कोटींसाठी निविदा मागविण्याची तयारी सुरू झाली आहे. ६० कोटींच्या आसपास भुयारी मार्ग होतील. 

उरलेल्या रकमेतून जालना रोडवर पुन्हा डांबरीकरण करण्याचा विचार होण्याची शक्यता आहे. रुंदीकरणासह पाच उड्डाणपूल, सर्व्हिस रोड, भुयारी मार्गाचा मूळ डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) आता संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, एनएचएआय (नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया)चे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी सांगितले, पुढच्या आठवड्यात भुयारी मार्गाच्या अनुषंगाने बैठक होईल. ७४ कोटींतून भुयारी मार्ग बांधणीचे नियोजन आहे.

दोन्ही प्रकल्प फक्त घोषणेपुरतेच ठरले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जालना रोड आणि बीड बायपाससाठी २५ डिसेंबर २०१५ रोजी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केली. तीन वर्षे काहीही न करता जून २०१८ मध्ये त्यांनी २४५ कोटींची घोषणा केली. जून २०१८ च्या घोषणेनंतर पुन्हा जालना रोडच्या प्रकल्पासाठी १५० कोटींची घोषणा झाली, त्यातून बीड बायपास वगळण्यात आला. ४प्रकल्प रद्द करण्यात आल्यामुळे राज्य महामार्ग प्राधिकरणाला १३ कोटी रुपये देऊन जालना रोडवर डांबराचा दोन ते तीन इंचाचा थर टाकण्यात आला आणि आता तर ७४ कोटींवरच जालना रोडचे काम येऊन ठेपले आहे, तर बीड बायपासचे काम राज्य शासनाकडे वर्ग करून ३८३ कोटी रुपयांची घोषणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने केली. त्या कामाची निविदा प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने अद्याप पुढे काहीही हालचाल झालेली नाही. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ