शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अकरावीच्या ४४४ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ७२ हजार जागा

By राम शिनगारे | Updated: May 30, 2024 20:25 IST

मिशन ॲडमिशन; केंद्रीय नव्हे महाविद्यालय पातळीवरच होणार प्रवेश, विद्यार्थ्यांसह पालकांची प्रवेशासाठी धावपळ

छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाची धावपळ सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील ४४४ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तिन्ही शाखांना तब्बल ७२ हजार ८६० जागा उपलब्ध आहेत. त्यात शहरातील ११९ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश असून, खासगी शिकवणी लागण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडेच असल्याचेही समोर आले आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर केंद्रीय पद्धतीने प्रवेश देण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहराचाही समावेश होता. मात्र, उपलब्ध असलेल्या जागांएवढीही नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होत नव्हती. त्यामुळे ही प्रक्रिया बंद केलेली आहे. त्यानंतर आता प्रत्यक्ष महाविद्यालय पातळीवरच प्रवेश करण्यात येतात. दहावीचा निकाल २७ मे रोजी लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जून अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालणार असून, जुलैमध्ये नियमित तासिकांना सुरुवात होईल. जिल्ह्यात अकरावीच्या तिन्ही शाखांच्या ७२ हजार ८४० जागा उपलब्ध आहेत. त्याचवेळी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ६२ हजार ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या १० हजार जागा शिल्लक राहणार आहेत. त्यातच दहावीनंतर पॉलटेक्निक, आयटीआयलाही शेकडो विद्यार्थी प्रवेश घेतात.

जिल्ह्यात शाखानिहाय प्रवेश क्षमताशाखा.......अनुदानित...................विनाअनुदानित.......एकूणकला..........१२,८०........................१६,४८०................१७,७६०वाणिज्य.....२८००..........................४६८०..................७४८०विज्ञान........१३,२००........................२२,८४०..............३६,०४०एकूण.........२८,८६०........................४४,०००..............७२,८६०

महाविद्यालयाच्या पातळीवरच प्रवेश प्रक्रियाशहरासह जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशांना सुरुवात झालेली आहे. महाविद्यालयाच्या पातळीवरच ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याठिकाणीच नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. सुरुवातीला अनुदानित जागेवर गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील. त्यानंतर विनाअनुदानित जागेवर विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील.- अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय