शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

१ रुपया भरून राज्यातील ७२ लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा, मोजकेच दिवस बाकी

By बापू सोळुंके | Updated: July 19, 2023 16:01 IST

आर्थिक चणचणीमुळे शेतकरी पीक विमा उतरविण्यास टाळाटाळ करतात. ही बाब लक्षात आल्यानंतर गतवर्षी राज्य सरकारने एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतला.

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला. या योजनेंतर्गत यावर्षी कालपर्यंत राज्यातील ७२ लाख १७ हजार २२२ शेतकऱ्यांनी एक रुपया भरून विविध पिकांचा विमा उतरविला असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

आर्थिक चणचणीमुळे शेतकरीपीक विमा उतरविण्यास टाळाटाळ करतात. परिणामी, नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊनही अशा विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत नव्हती. ही बाब लक्षात आल्यानंतर गतवर्षी राज्य सरकारने एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीचे हे पहिलेच वर्ष आहे. गतवर्षी राज्यातील ९६ लाख ६२ हजार २६१ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. या अंतर्गत ४६ लाख ३१ हजार ८२८ हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण मिळाले होते. यावर्षीपासून केवळ १ रुपयांत पीक विमा मिळत असल्याने विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता कृषी विभागाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी वर्तविली.यंदा आतापर्यंत ७२ लाख १७ हजार २२२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यात ८३ हजार ३८० कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर ७१ लाख ३३ हजार ८४२ शेतकरी बिगर कर्जदार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत विमा काढणाऱ्या एकूण शेतकऱ्यांची सरासरी ७५.६९ टक्के आहे.

हप्त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे ३ हजार ६५९ कोटी २४ लाख रुपयेदरवर्षी पीक विम्याच्या हप्त्यासाठी केंद्र, राज्य आणि शेतकरी असे संयुक्तपणे हप्ता भरत असत. यंदापासून राज्य सरकारने केवळ एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा हिस्सा ही राज्य सरकार भरणार आहे. यावर्षी खरीप हंगामासाठी पीक विम्याच्या हप्त्यापोटी केंद्र सरकार २ हजार १४१ कोटी ४० लाख रुपये तर राज्य सरकारला १ हजार ५१७ कोटी १२ लाख रुपये खर्च येणार आहे.

कोणत्या विभागात किती शेतकऱ्यांनी भरला विमा?औरंगाबाद विभाग - २३ लाख १४ हजार ७५२कोकण विभाग - २३ हजार ७६६नाशिक विभाग - ३ लाख ३३ हजार ५६३पुणे विभाग - ४ लाख ३२ हजार ४४०कोल्हापूर - ७४ हजार ९०लातूर विभाग - २४ लाख १६ हजार ७७अमरावती विभाग - १३ लाख ८५ हजार ८११नागपूर विभाग - २ लाख ३६ हजार ७२३

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद