शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेचा करार संपला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७०० संगणक परिचालकांची नोकरी गेली

By विजय सरवदे | Updated: August 9, 2024 12:50 IST

जिल्हाभरातील ‘आपले सरकार सेवा केंद्रांचे’ कामकाज ठप्प झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायत स्तरावर ‘ई-पंचायत’ संगणकीय प्रणालीद्वारे सर्व प्रकारचे दाखले, विविध योजनांच्या कामकाजासाठी नेमलेल्या ‘सीएससी- एसपीव्ही’ संस्थेचा करार संपुष्टात आला असून शासनाने नवीन कंपनीसोबत करार केला आहे. परिणामी, जुन्या संस्थेने नेमलेले जिल्ह्यातील ७०० संगणक परिचालक आणि तालुका व जिल्हास्तरावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा पूर्ववत ठेवण्याचे धोरण जाहीर करण्यात आले नसल्यामुळे हे सारे जण साशंक असून जिल्हाभरातील ‘आपले सरकार सेवा केंद्रांचे’ कामकाज ठप्प झाले आहे.

शासनाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे व्यवहार संगणकीकृत करण्याचा निर्णय सन २०११ मध्ये घेतला. सुरुवातीला ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेत ‘संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र’ (संग्राम) याद्वारे नागरिकांना सेवा देण्यासाठी ‘सीएससी- एसपीव्ही’ या खासगी संस्थेसोबत करार केला. या संस्थेने ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक, पंचायत समिती स्तरावर तालुका समन्वयक आणि जिल्हा परिषदेत जिल्हा समन्वयकांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले होते. त्यानंतर ११ ऑगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ कार्यान्वित करण्यात आली. यासाठी जिल्ह्यात ६९० संगणक परिचालक, पंचायत समित्यांमध्ये तालुका व्यवस्थापक, जिल्हास्तरावर जिल्हा व्यवस्थापक आणि एक हार्डवेअर इंजिनीअरची सेवा पूर्ववत चालू ठेवली. आता ‘सीएससी- एसपीव्ही’ संस्थेचा करार संपुष्टात आला असून शासनाने ‘महाआयटी’ या राज्य शासनाच्या कंपनीमार्फत ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ चालविली जाणार आहेत. मात्र, पूर्वीच्या संस्थेने नेमलेले संगणक परिचालक, तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक आणि हार्डवेअर इंजिनीअर आदींच्या सेवा पुढे सुरू ठेवण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे १२-१३ वर्षांपासून सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आली आहे.

सोमवारपासून सेवा थांबली‘ई-पंचायत’ संगणकीय प्रणाली सेवेचे कंत्राट नवीन कंपनीकडे गेले असून सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पाच्या संबंधित डिजिटल डाटा आणि सॉफ्टवेअर हस्तांतरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत संगणक परिचालकांमार्फत कामकाज चालू ठेवण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. मात्र, यापुढे त्यांच्या सेवा पूर्ववत ठेवल्या जातील की नाही, याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. दुसरीकडे, तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक आणि हार्डवेअर इंजिनीअर या कर्मचाऱ्यांच्या सेवांबाबत तर शासन निर्णयात काहीच नमूद नाही. त्यामुळे हे कर्मचारी हवालदिल झाले असून जिल्हाभरातील ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची सेवा सोमवारपासून बंद ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTahasildarतहसीलदार