शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेचा करार संपला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७०० संगणक परिचालकांची नोकरी गेली

By विजय सरवदे | Updated: August 9, 2024 12:50 IST

जिल्हाभरातील ‘आपले सरकार सेवा केंद्रांचे’ कामकाज ठप्प झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायत स्तरावर ‘ई-पंचायत’ संगणकीय प्रणालीद्वारे सर्व प्रकारचे दाखले, विविध योजनांच्या कामकाजासाठी नेमलेल्या ‘सीएससी- एसपीव्ही’ संस्थेचा करार संपुष्टात आला असून शासनाने नवीन कंपनीसोबत करार केला आहे. परिणामी, जुन्या संस्थेने नेमलेले जिल्ह्यातील ७०० संगणक परिचालक आणि तालुका व जिल्हास्तरावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा पूर्ववत ठेवण्याचे धोरण जाहीर करण्यात आले नसल्यामुळे हे सारे जण साशंक असून जिल्हाभरातील ‘आपले सरकार सेवा केंद्रांचे’ कामकाज ठप्प झाले आहे.

शासनाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे व्यवहार संगणकीकृत करण्याचा निर्णय सन २०११ मध्ये घेतला. सुरुवातीला ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेत ‘संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र’ (संग्राम) याद्वारे नागरिकांना सेवा देण्यासाठी ‘सीएससी- एसपीव्ही’ या खासगी संस्थेसोबत करार केला. या संस्थेने ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक, पंचायत समिती स्तरावर तालुका समन्वयक आणि जिल्हा परिषदेत जिल्हा समन्वयकांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले होते. त्यानंतर ११ ऑगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ कार्यान्वित करण्यात आली. यासाठी जिल्ह्यात ६९० संगणक परिचालक, पंचायत समित्यांमध्ये तालुका व्यवस्थापक, जिल्हास्तरावर जिल्हा व्यवस्थापक आणि एक हार्डवेअर इंजिनीअरची सेवा पूर्ववत चालू ठेवली. आता ‘सीएससी- एसपीव्ही’ संस्थेचा करार संपुष्टात आला असून शासनाने ‘महाआयटी’ या राज्य शासनाच्या कंपनीमार्फत ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ चालविली जाणार आहेत. मात्र, पूर्वीच्या संस्थेने नेमलेले संगणक परिचालक, तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक आणि हार्डवेअर इंजिनीअर आदींच्या सेवा पुढे सुरू ठेवण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे १२-१३ वर्षांपासून सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आली आहे.

सोमवारपासून सेवा थांबली‘ई-पंचायत’ संगणकीय प्रणाली सेवेचे कंत्राट नवीन कंपनीकडे गेले असून सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पाच्या संबंधित डिजिटल डाटा आणि सॉफ्टवेअर हस्तांतरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत संगणक परिचालकांमार्फत कामकाज चालू ठेवण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. मात्र, यापुढे त्यांच्या सेवा पूर्ववत ठेवल्या जातील की नाही, याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. दुसरीकडे, तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक आणि हार्डवेअर इंजिनीअर या कर्मचाऱ्यांच्या सेवांबाबत तर शासन निर्णयात काहीच नमूद नाही. त्यामुळे हे कर्मचारी हवालदिल झाले असून जिल्हाभरातील ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची सेवा सोमवारपासून बंद ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTahasildarतहसीलदार