शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
गिल 'गोल्डन डक' झाला अन् 'डगआउट'मध्ये बसलेल्या संजूसह पुन्हा चर्चेत आला 'वशीलेबाजी'चा मुद्दा
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेचा करार संपला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७०० संगणक परिचालकांची नोकरी गेली

By विजय सरवदे | Updated: August 9, 2024 12:50 IST

जिल्हाभरातील ‘आपले सरकार सेवा केंद्रांचे’ कामकाज ठप्प झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायत स्तरावर ‘ई-पंचायत’ संगणकीय प्रणालीद्वारे सर्व प्रकारचे दाखले, विविध योजनांच्या कामकाजासाठी नेमलेल्या ‘सीएससी- एसपीव्ही’ संस्थेचा करार संपुष्टात आला असून शासनाने नवीन कंपनीसोबत करार केला आहे. परिणामी, जुन्या संस्थेने नेमलेले जिल्ह्यातील ७०० संगणक परिचालक आणि तालुका व जिल्हास्तरावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा पूर्ववत ठेवण्याचे धोरण जाहीर करण्यात आले नसल्यामुळे हे सारे जण साशंक असून जिल्हाभरातील ‘आपले सरकार सेवा केंद्रांचे’ कामकाज ठप्प झाले आहे.

शासनाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे व्यवहार संगणकीकृत करण्याचा निर्णय सन २०११ मध्ये घेतला. सुरुवातीला ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेत ‘संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र’ (संग्राम) याद्वारे नागरिकांना सेवा देण्यासाठी ‘सीएससी- एसपीव्ही’ या खासगी संस्थेसोबत करार केला. या संस्थेने ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक, पंचायत समिती स्तरावर तालुका समन्वयक आणि जिल्हा परिषदेत जिल्हा समन्वयकांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले होते. त्यानंतर ११ ऑगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ कार्यान्वित करण्यात आली. यासाठी जिल्ह्यात ६९० संगणक परिचालक, पंचायत समित्यांमध्ये तालुका व्यवस्थापक, जिल्हास्तरावर जिल्हा व्यवस्थापक आणि एक हार्डवेअर इंजिनीअरची सेवा पूर्ववत चालू ठेवली. आता ‘सीएससी- एसपीव्ही’ संस्थेचा करार संपुष्टात आला असून शासनाने ‘महाआयटी’ या राज्य शासनाच्या कंपनीमार्फत ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ चालविली जाणार आहेत. मात्र, पूर्वीच्या संस्थेने नेमलेले संगणक परिचालक, तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक आणि हार्डवेअर इंजिनीअर आदींच्या सेवा पुढे सुरू ठेवण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे १२-१३ वर्षांपासून सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आली आहे.

सोमवारपासून सेवा थांबली‘ई-पंचायत’ संगणकीय प्रणाली सेवेचे कंत्राट नवीन कंपनीकडे गेले असून सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पाच्या संबंधित डिजिटल डाटा आणि सॉफ्टवेअर हस्तांतरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत संगणक परिचालकांमार्फत कामकाज चालू ठेवण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. मात्र, यापुढे त्यांच्या सेवा पूर्ववत ठेवल्या जातील की नाही, याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. दुसरीकडे, तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक आणि हार्डवेअर इंजिनीअर या कर्मचाऱ्यांच्या सेवांबाबत तर शासन निर्णयात काहीच नमूद नाही. त्यामुळे हे कर्मचारी हवालदिल झाले असून जिल्हाभरातील ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची सेवा सोमवारपासून बंद ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTahasildarतहसीलदार