शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

‘मोदींविरोधी ६९ टक्के जनतेने एक होऊन देश आणि संविधान वाचवावे’ : कन्हैयाकुमार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 15:16 IST

‘मोदींविरोधी ६९ टक्के जनतेने एक होऊन देश आणि संविधान वाचवावे’ : कन्हैयाकुमार 

ठळक मुद्दे कॉर्पोरेट लूट आणि जातीयवाद थांबवण्याचे आवाहन

औरंगाबाद : फक्त ३१ टक्के मतदारांनी निवडून दिलेले हे मोदी सरकार आहे. ३१ आकडा मोठा आहे की उर्वरित ६९? मग आता ६९ टक्के मतदारांनी एक होऊन देश आणि संविधान वाचवण्याची गरज आहे. देशातील तमाम संविधानवादी व धर्मनिरपेक्षवादी संस्था-संघटना व पक्षांनी एक व्हावे व देश तोडणारी भाजपा, आरएसएस यांचा दारुण पराभव करावा, असे कळकळीचे आवाहन रविवारी येथे देशाचे युवा नेते कॉ. कन्हैयाकुमार यांनी केले. आपल्या खास बिहारी शैलीत तब्बल पाऊणतास मोदींच्या मर्मावर बोट ठेवणारे भाषण करीत कन्हैयाकुमार यांनी ही सभा जिंकली.

सध्या देशात सुरू असलेला जातीयवाद आणि कॉर्पोरेट लूट थांबलीच पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. आमखास मैदानावर ‘देश बचाव... संविधान बचाव’ अभियानांतर्गत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण आणि विविध धर्मनिरपेक्ष व संविधानवादी संस्था-संघटनांनी ही जाहीर सभा आयोजित केली होती. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद या सभेला मिळाला. पाच हजार खुर्च्या भरून लोकांनी कन्हैयाकुमार यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यात युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. ‘तुमचं आमचं नातं काय... जय शिवराय, जय भीमराय’ ही घोषणा त्यांनी उपस्थितांकडून वदवून घेत व डफावर ‘आझादी’चे  क्रांतिगीत म्हणत या सभेचा समारोप कन्हैयाकुमार यांनी केला. सभेचे संयोजक आ. सतीश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. आमदार बाबाजानी दुर्राणी, कॉ. तुकाराम भस्मे, प्रा. सुनील मगरे, प्रा. उमाकांत राठोड, अमोल दांडगे, शेख जहूर, इलियास किरमाणी आदींची भाषणे झाली. यावेळी एमआयएमवर किरमाणी यांनी सडकून टीका केली. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. संविधानाची प्रत देऊन चव्हाण यांनी कन्हैयाकुमार यांचे स्वागत केले. कॉ. राम बाहेती, कॉ. अभय टाकसाळ, कॉ. अश्फाक सलामी आदींसह मंचावर इतर नेते उपस्थित होते.आता सत्तेसाठी रामाचा वापर...आता मोदींच्या नावाने सत्ता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर रामनामाचा जप सुरू आहे. यांना मंदिर बांधायला रोखले कुणी? यांना मंदिर बनवायचेच नाही. त्या मुद्यावर हे दोनदा सत्तेत आले. आता पुन्हा राम मंदिराच्या मुद्यावरच सत्ता हस्तगत करायची आहे. १९९२ साली बाबरी पाडली. आता २०१८ चालू आहे. हा आस्थेचा प्रश्न जरूर आहे; पण मशीद पाडण्यापूर्वीही आस्था होतीच. या सरकारची विचारधाराच मनुस्मृतीवर आधारित असल्यामुळे आज कोणीही समाधानी नाही, असे कन्हैयाकुमार यांनी यावेळी नमूद केले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबाद