शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातील ६५ टक्के जागा रिक्त, कर्मचाऱ्यांअभावी ग्रामीण आरोग्यसेवा ‘कोमात’

By विजय सरवदे | Updated: October 16, 2023 14:39 IST

लोहयुक्त, कॅल्शियमच्या गाेळ्यांचा ‘पीएचसी’त ठणठणाट

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा बळकट करण्याच्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये सुमारे ६५ टक्के कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. दुसरीकडे, गेल्या दोन महिन्यांपासून आरोग्य केंद्रांत गरोदरमाता व स्तनदामातांसाठी आवश्यक लोहयुक्त तसेच कॅल्शियमच्या गाेळ्यांचा ठणठणाट आहे. यावरून जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्यसेवाच ‘कोमात’ असल्याचा प्रत्यय येतोय.

यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले की, गरोदरमाता व स्तनदामातांना १८० दिवस लोकयुक्त तसेच कॅल्शियमच्या गाेळ्या घेणे अत्यावश्यक असते. मात्र, मागील सहा महिन्यांपासून शासनाकडून या गोळ्यांचा पुरवठाच बंद आहे. तथापि, जिल्हास्तरावर उपलब्ध साठ्यातून चार महिन्यांपर्यंत गरोदरमाता व स्तनदामातांना या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला. आता स्थानिक पातळीवर या गोळ्या खरेदीच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रांत येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात. गंभीर रुग्ण आल्यास त्यास जिल्हा रुग्णालय अथवा घाटीत रेफर केले जाते. याशिवाय, आरोग्य केंद्रांत पहिली प्रसूतीसाठी केली जात नाही. पहिली प्रसूती नॉर्मल असेल, तर दुसरी प्रसूती आरोग्य केंद्रात केली जाते. सिझर प्रसूती केंद्रांत केली जात नाही. एवढेच नाही, तर जिल्ह्यातील ५१ पैकी एकाही आरोग्य केंद्रांमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर नाहीत.

१३ डॉक्टरांची पदे रिक्तप्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्ह्यात १३ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. याशिवाय २७५ परिचारिका (एएनएम), १०० बहुउद्देशीय आरोग्य सेवकांची (एमपीडब्ल्यू) पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, शिपायांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे आरोग्य केंद्रांची स्वच्छताच होत नाही. काही ठिकाणी उपलब्ध असलेला शिपाई दिवसा ‘ओपीडी’चे काम करून निघून जातो. त्यामुळे अनेक आरोग्य केंद्रांमध्ये अस्वच्छता पसरलेली आहे.

एकाच वेळी अनेक योजनांचा भारदैनंदिन बाह्यरुग्ण सेवा तसेच प्राथमिक उपचाराव्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांचा भार उपलब्ध कर्मचाऱ्यांवर आहे. सध्या मिशन इंद्रधनुष्य, गोल्डन कार्ड, घरोघरी जाऊन टीबी, कुष्ठरोगी शोधणे, १८ वर्षे वयापुढील व या वयाखालील मुलांची तपासणी करणे, आयुष्यमान भव या योजनांमध्ये तपासणी करणे व त्याची ऑनलाइन नोंदणीची कामे करावी लागतात. त्यामुळेही आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे.

प्रत्येकालाच हवे खोकल्याचे औषध१५ ऑगस्टपासून नि:शुल्क रुग्णसेवा सुरू झाल्यामुळे ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २७९ उपकेंद्रांत येणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. जिल्हाभरात रोज सरासरी १० ते १२ हजार रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, किरकोळ सर्दी, ताप, खोकला असलेला प्रत्येक रुग्ण खोकल्याच्या औषधाची बाटली, खाजेचा मलम, टॉनिकच्या बाटलीची मागणी करत असतो. परिणामी, या औषधाची अनावश्यक मागणी वाढली असून, गरजू रुग्णांनाच ती दिली जाते. प्रत्येकालाच या औषधाचा पुरवठा करणे शक्य नाही, असे डाॅ. धानोरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यdoctorडॉक्टर