शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जायकवाडी धरणाचे ६ दरवाजे उघडून विसर्ग, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 13:06 IST

यापूर्वी २०२२ मध्ये नाथसागर धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला होता.

- दादासाहेब गलांडेपैठण : येथील जायकवाडी धरणातीलपाणीसाठा रविवारी सायंकाळी ६ वाजता ९६.३७ टक्के झाला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी ६ वाजता जलसाठा ९७.३७ टक्क्यांवर पोहचला. धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली होती. त्यानुसार आज दुपारी १२ ते  १ वाजेच्या दरम्यान धरणाचे ६ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून गोदावरी नदीत ३१४४ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे.

जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रासह नाशिक परिसरातून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. असे असले तरी धरणातील पाणीसाठा रविवारी सायंकाळी ६ वाजता १५२१.३९ फूट (९६.३७ टक्के) झाला. धरणाची क्षमता १५२२ फूट आहे. धरणात रविवारी २०९२.१२४ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा होता. धरणात पाण्याची १८ हजार ७२ क्युसेकने आवक होत असून उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणासाठी ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, आज सकाळी ६ वाजता  जलसाठा ९७.३७ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर पाणीसाठा ९८ टक्के झाल्यानंतर दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान नाथसागर धरणाचे गेट क्र. १०, २७, १८, १९, १६ आणि २१ असे एकूण सहा दरवाजे ०. ५ फुट उंचीने उघडून ३ हजार १४४ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यांतील गोदावरी नदी काठच्या गावकऱ्यांना सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. यापूर्वी २०२२ मध्ये नाथसागर धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी