शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे ५८ शिक्षक बदलीनंतर ‘गायब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:10 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलीनंतर तब्बल ५८ शिक्षक शाळांवर रुजूच झाले नाहीत. यासंदर्भात अनेक शाळा गुरुजींच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, अशा गुरुजींविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासनासमोरही पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशाळांना प्रतीक्षा : कारवाईचे निकषही वेगळे; प्रशासनासमोर पेच, अनेक शाळांना हवेत गुरु जी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलीनंतर तब्बल ५८ शिक्षक शाळांवर रुजूच झाले नाहीत. यासंदर्भात अनेक शाळा गुरुजींच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, अशा गुरुजींविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासनासमोरही पेच निर्माण झाला आहे.नवीन बदली धोरणानुसार २९ मे रोजी तब्बल साडेतीन हजार जि. प. शिक्षकांच्या बदलीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या मेलवर आले. पवनीत कौर कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बदलीचे आदेश हस्तगत केले. दुसºया दिवशी पवनीत कौर यांच्या स्वाक्षरीने तालुकानिहाय बदल्यांचे आदेश गटशिक्षणाधिकाºयांकडे सुपूर्द केले. तथापि, पहिल्या टप्प्यात ५२७ शिक्षक विस्थापित झाले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा शाळांचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी संवर्ग-५ द्वारे आॅनलाईन नोंदणीची संधी देण्यात आली. त्यानंतर दुसºया टप्प्यात ३६३ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या. उर्वरित १६४ पैकी १५९ शिक्षकांच्या बदलीचे आदेश १६ जून रोजी राज्यस्तरीय बदली कक्षाकडून प्राप्त झाले.राज्यस्तरीय बदली कक्षाकडून देण्यात आलेले तिसºया टप्प्यातील बदलींचे आदेश शिक्षकांच्या पसंतीनुसार नव्हे, तर शाळांच्या गरजेनुसार देण्यात आले. दोन आठवड्यापूर्वी या कक्षाने जिल्ह्यातील शाळांवरील शिक्षकांच्या रिक्त जागांचा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात आला होता. त्यानुसार विस्थापित शिक्षकांना शाळांच्या गरजेनुसार पदस्थापना देण्यात आल्या.दरम्यान, यंदा पहिल्यांदाच राज्यस्तरीय कक्षाकडून बदली प्रक्रिया राबविण्यात आली असून, कोणत्या प्रशासकीय आणि कोणत्या विनंती बदल्या समजायच्या असा गोंधळ प्रशासनासह शिक्षकांमध्येही निर्माण झाला आहे. तथापि, बदली आदेश निर्गमित केल्यानंतर लगेच दुसºया दिवशी शिक्षकांना कार्यमुक्त करावे व शिक्षकांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश ग्रामविकास विभागाचे आहेत. मात्र, असे असले तरी प्रशासकीय बदली झालेल्या शिक्षकाला नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी ७ दिवसांची मुदत असते, तर विनंती बदली झालेल्या शिक्षकांनी मात्र, लगेच शाळेवर रुजू व्हावे, असा नियम आहे.आज शाळांवर रुजू होण्याची अपेक्षायासंदर्भात शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सांगितले की, प्रामुख्याने विस्थापित शिक्षकांपैकी ज्यांना पसंतीक्रमानुसार शाळा भेटल्या नाहीत. शाळांच्या गरजेनुसार राज्यस्तरीय कक्षाने थेट शिक्षकांच्या पदस्थापना शाळांवरच केल्या, अशा शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या समजल्या जातील. पसंतीक्रमानुसार मिळालेल्या शाळा या विनंती बदल्या समजल्या जातील. बदली झाल्यानंतर विहित कालावधीत रुजू न होणाºया शिक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे ग्रामविकास विभागाचे निर्देश आहेत. अद्यापही ५८ शिक्षक बदली झाल्यानंतरही रुजू झालेले नाहीत. उद्या सोमवारपर्यंत ते शाळेवर रुजू होतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबादzp schoolजिल्हा परिषद शाळाTransferबदली