शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

५३ प्रकल्पातील साठा वाढला

By admin | Updated: November 16, 2014 00:37 IST

उस्मानाबाद : गत तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोरडेठाक पडलेल्या तब्बल ५३ साठवण तलावातील पाणीपातळीत वाढ झाली आहे़

उस्मानाबाद : गत तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोरडेठाक पडलेल्या तब्बल ५३ साठवण तलावातील पाणीपातळीत वाढ झाली आहे़ तर ३० लघू प्रकल्प कोरडेठाक असून, २११ प्रकल्पात केवळ २१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभीपासूनच जिल्ह्यासह ग्रामीण भागात पाणीटंचाई जणावू लागली होती़ पाणीटंचाईचे स्वरूप उग्र होत असल्याने ग्रामीण भागातून शेकडो अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर दाखल झाले होते़ त्यातच गत काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे़ विशेषत: उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे़ उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यातील प्रत्येकी १८ लघू प्रकल्पातील उपयुक्त पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे़ तर उस्मानाबाद तालुक्यातील २ आणि तुळजापूर तालुक्यातील एका मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी वाढली आहे़ या पावसामुळे बहुतांश गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याची चिन्हे असून, दोन ते तीन महिन्यांसाठी हे पाणी पुरेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे़ तर रबी हंगामातील पिकांसाठी याचा लाभ होताना दिसत असला तरी बागायतदारांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे़ तर तुरीचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे़ लघू प्रकल्पातील साठ्यात वाढउस्मानाबाद तालुक्यातील १८ लघू प्रकल्पातील पाणीपातळी वाढ झाली आहे़ यात सांजा, वरूडा, आळणी, उपळा, राघूचीवाडी, बेडकीनाला, वलगूड, गावसूद, पोहनेर, वलगूड, कौडगाव, अंबेजवळगा, खेड, उपळा, धुत्ता, शेकापूर, सकनेवाडी, कोंडवाडी या लघू प्रकल्पांचा समावेश आहे़तुळजापूरकरही खुशतुळजापूर तालुक्यातीलही १८ लघू प्रकल्पातील पाणीपातळी वाढली आहे़ यात यमाई, हंगरगा, कामठा, पिंपळा, मसला, सांगवीकाटी, मुरटा, अणदूर, शहापूर, सावरगाव, आपसिंगा, आरळी, किलज, मुर्टा, होर्टी, बंचाई, येडोळा, निलेगाव या लघू प्रकल्पांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)उस्मानाबाद तालुक्यातील (कंसातील आकडेवारी गत आठवड्यातील पाणी परिस्थितीची) रूईभर मध्यम प्रकल्पात १़५६४ दलघमी (०़०० दलघमी), वाघोली प्रकल्पात २़२९७ दलघमी (२़०४७ ), तुळजापूर तालुक्यातील खंडाळा मध्यम प्रकल्पात ०़८७७ (०़८७७ ), भूम तालुक्यातील रामगंगा प्रकल्पात ४़९३६ (४़९३६) दलघमी पाणीसाठा सद्यस्थिीत आहे़४उमरगा तालुक्यातील ३५ लघू प्रकल्पापैकी केवळ कोळसूर प्रकल्पातील पाणीपातळी (२़७९८ दलघमी) वाढली आहे़ कळंब तालुक्यातील चोराखळी (१़७९६ दलघमी) व वडजी (०़४५९ दलघमी) या दोन प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ झाली आहे़ तर भूम तालुक्यातील सहा प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ झाली आहे़ यात बागलवाडी, आरसोली, पाथ्रूड, नांदगाव या लघू प्रकल्पांचा समावेश आहे़ वाशी तालुक्यातील सेलू, इराचीवाडी, पारा (१) या तीन प्रकल्पांमध्येही पाणीपातळी वाढली आहे़जिल्ह्यातील १ मोठा, १७ मध्यम आणि १९३ लघू प्रकल्पात सध्यस्थितीत १९३़७८१ दलघमी पाणीसाठा आहे़ यातील १३३़४७९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे़ प्रकल्प क्षमतेनुसार पाहता सिना-कोळेगाव या मोठ्या प्रकल्पात मृतसाठा आहे़ तर एका मध्यम प्रकल्पात ५१ ते ७५ टक्क्याच्या दरम्यान, तीन प्रकल्पात २६ ते ५० टक्के, ६ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी, ४ प्रकल्पात जोत्याच्याखाली पाणी आहे़ तर एक प्रकल्प कोरडाठाक आहे़ पाच लघू प्रकल्प १०० टक्के भरले आहेत़ ११ लघू प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे़ २१ लघू प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पाणी आहे़ ३९ प्रकल्पात २५ टक्क्यांहून कमी, ५७ प्रकल्पात जोत्याखाली तर २९ लघू प्रकल्प कोरडेठाक आहेत़गत आठ दिवस जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे़ मात्र, परंडा व लोहारा तालुक्याच्या काही भागात आणि तोही तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे़ त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील मध्यम, लघू प्रकल्पातील पाणीपातळी वाढ झाली नसून, पाण्याचे प्रमाण घटत असल्याचे चित्र असून, या परिसरातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना पावसाची प्रतिक्षा कायम आहे़