शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळा संपताच पाण्यासाठी भटकंती; छत्रपती संभाजीनगर जिल्हयासाठी ५२ कोटींचा कृती आराखडा

By विजय सरवदे | Updated: February 19, 2024 18:07 IST

फेब्रुवारी महिन्यात सुमारे दीडशे गावांना पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या आहेत, तर उन्हाळ्यात काय स्थिती राहील?

छत्रपती संभाजीनगर : सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याच्या सर्व स्रोतांची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील सुमारे ३५० गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी जि. प. पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते जूनपर्यंत ५१ कोटी ६६ लाखांचा कृती आराखडा तयार केला आहे.

अजून हिवाळा संपला नाही तोच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ११५ गावे आणि २६ वाड्यांना १६७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईच्या अनुषंगाने प्रशासनाने ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीसाठी प्रत्येकी तीन महिन्यांच्या तीन टप्प्यांत टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. या तीन टप्प्यांत एकूण २०५५ योजनांवर ८१ कोटी ४० लाख २६ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संबंधित योजना १३१० गावांमध्ये राबविण्यात येत आहेत.

फेब्रुवारी महिन्यात सुमारे दीडशे गावांना पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या आहेत, तर उन्हाळ्यात काय स्थिती राहील? त्यामुळे आतापासूनच प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने विहीर अधिग्रहण, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, नवीन विंधन विहीर आदी उपाययोजना टंचाई कृती आराखड्यात प्रस्तावित केल्या आहेत. दरम्यान, सध्या टंचाईसंबंधीच्या उपाययोजनांवर भर देण्यात आल्यामुळे मार्चपासून पुढील कालावधीत टँकरची संख्या थोडीफार कमी होईल, अशी शक्यता पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी वर्तविली आहे.

ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ पर्यंत उपाययोजनांची स्थिती

तालुके - गावे - योजनांची संख्या - खर्चछत्रपती संभाजीनगर - १८१ - १८६ - ११ कोटी ५७ लाखफुलंब्री - १०३ - १२२ - ५ कोटी ३८सिल्लोड - ११२ - १८५ - १७ कोटी ७३ लाखसोयगाव - ११९ - ११९ - १ कोटी ४७ लाखकन्नड - १५३ - १५३ - ५ कोटी ९१ लाखखुलताबाद - ८९ - ८९ - ५ कोटी ६७ लाखगंगापूर - २२५ - ४६३ - ११ कोटी ६० लाखवैजापूर - १६० - २९२ - ११ कोटी ३६ लाखपैठण - १६८ - ४४६ - १० कोटी ७० लाख

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात