शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळा संपताच पाण्यासाठी भटकंती; छत्रपती संभाजीनगर जिल्हयासाठी ५२ कोटींचा कृती आराखडा

By विजय सरवदे | Updated: February 19, 2024 18:07 IST

फेब्रुवारी महिन्यात सुमारे दीडशे गावांना पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या आहेत, तर उन्हाळ्यात काय स्थिती राहील?

छत्रपती संभाजीनगर : सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याच्या सर्व स्रोतांची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील सुमारे ३५० गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी जि. प. पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते जूनपर्यंत ५१ कोटी ६६ लाखांचा कृती आराखडा तयार केला आहे.

अजून हिवाळा संपला नाही तोच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ११५ गावे आणि २६ वाड्यांना १६७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईच्या अनुषंगाने प्रशासनाने ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीसाठी प्रत्येकी तीन महिन्यांच्या तीन टप्प्यांत टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. या तीन टप्प्यांत एकूण २०५५ योजनांवर ८१ कोटी ४० लाख २६ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संबंधित योजना १३१० गावांमध्ये राबविण्यात येत आहेत.

फेब्रुवारी महिन्यात सुमारे दीडशे गावांना पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या आहेत, तर उन्हाळ्यात काय स्थिती राहील? त्यामुळे आतापासूनच प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने विहीर अधिग्रहण, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, नवीन विंधन विहीर आदी उपाययोजना टंचाई कृती आराखड्यात प्रस्तावित केल्या आहेत. दरम्यान, सध्या टंचाईसंबंधीच्या उपाययोजनांवर भर देण्यात आल्यामुळे मार्चपासून पुढील कालावधीत टँकरची संख्या थोडीफार कमी होईल, अशी शक्यता पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी वर्तविली आहे.

ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ पर्यंत उपाययोजनांची स्थिती

तालुके - गावे - योजनांची संख्या - खर्चछत्रपती संभाजीनगर - १८१ - १८६ - ११ कोटी ५७ लाखफुलंब्री - १०३ - १२२ - ५ कोटी ३८सिल्लोड - ११२ - १८५ - १७ कोटी ७३ लाखसोयगाव - ११९ - ११९ - १ कोटी ४७ लाखकन्नड - १५३ - १५३ - ५ कोटी ९१ लाखखुलताबाद - ८९ - ८९ - ५ कोटी ६७ लाखगंगापूर - २२५ - ४६३ - ११ कोटी ६० लाखवैजापूर - १६० - २९२ - ११ कोटी ३६ लाखपैठण - १६८ - ४४६ - १० कोटी ७० लाख

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात