शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

हिवाळा संपताच पाण्यासाठी भटकंती; छत्रपती संभाजीनगर जिल्हयासाठी ५२ कोटींचा कृती आराखडा

By विजय सरवदे | Updated: February 19, 2024 18:07 IST

फेब्रुवारी महिन्यात सुमारे दीडशे गावांना पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या आहेत, तर उन्हाळ्यात काय स्थिती राहील?

छत्रपती संभाजीनगर : सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याच्या सर्व स्रोतांची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील सुमारे ३५० गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी जि. प. पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते जूनपर्यंत ५१ कोटी ६६ लाखांचा कृती आराखडा तयार केला आहे.

अजून हिवाळा संपला नाही तोच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ११५ गावे आणि २६ वाड्यांना १६७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईच्या अनुषंगाने प्रशासनाने ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीसाठी प्रत्येकी तीन महिन्यांच्या तीन टप्प्यांत टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. या तीन टप्प्यांत एकूण २०५५ योजनांवर ८१ कोटी ४० लाख २६ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संबंधित योजना १३१० गावांमध्ये राबविण्यात येत आहेत.

फेब्रुवारी महिन्यात सुमारे दीडशे गावांना पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या आहेत, तर उन्हाळ्यात काय स्थिती राहील? त्यामुळे आतापासूनच प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने विहीर अधिग्रहण, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, नवीन विंधन विहीर आदी उपाययोजना टंचाई कृती आराखड्यात प्रस्तावित केल्या आहेत. दरम्यान, सध्या टंचाईसंबंधीच्या उपाययोजनांवर भर देण्यात आल्यामुळे मार्चपासून पुढील कालावधीत टँकरची संख्या थोडीफार कमी होईल, अशी शक्यता पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी वर्तविली आहे.

ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ पर्यंत उपाययोजनांची स्थिती

तालुके - गावे - योजनांची संख्या - खर्चछत्रपती संभाजीनगर - १८१ - १८६ - ११ कोटी ५७ लाखफुलंब्री - १०३ - १२२ - ५ कोटी ३८सिल्लोड - ११२ - १८५ - १७ कोटी ७३ लाखसोयगाव - ११९ - ११९ - १ कोटी ४७ लाखकन्नड - १५३ - १५३ - ५ कोटी ९१ लाखखुलताबाद - ८९ - ८९ - ५ कोटी ६७ लाखगंगापूर - २२५ - ४६३ - ११ कोटी ६० लाखवैजापूर - १६० - २९२ - ११ कोटी ३६ लाखपैठण - १६८ - ४४६ - १० कोटी ७० लाख

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात