शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

नागझरीतले ५०० एमएलडी पाणी घटले

By admin | Updated: August 19, 2016 01:01 IST

लातूर : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लातूर शहरासह जिल्ह्यात फक्त एक मोठा पाऊस झाल्यामुळे मांजरा नदीवरील नागझरी व साई बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले़

लातूर : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लातूर शहरासह जिल्ह्यात फक्त एक मोठा पाऊस झाल्यामुळे मांजरा नदीवरील नागझरी व साई बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले़ त्यामुळे शहराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे़ मात्र या दोन्हीही बॅरेजेसमधील पाणी झपाट्याने उतरत आहे़ नागझरी बॅरेजेसमधील ५०० एमएलडी पाणी घटले आहे़ शहरासाठी गेल्या १८ दिवसात २२० एमएलडी पाणी उचलले असले तरी बॅरेजेसमधील पाणी त्या तुलनेत झपाट्याने उतरले आहे़ यामुळे लातूर शहराच्या पाणीपुरवठ्या संदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे़जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या एका पावसात नागझरी बॅरेजेसमध्ये ३़३० एम़एमक़्युब पाणीसाठी झाला होता़ तर साई बॅरेजेसमध्ये ०़२२ एमएमक्युब पाणी संकलित झाले़ लातूरकरांना मोठा आनंद झाला़ महानगर प्रशासनानेही तत्काळ रेल्वेने होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला़ मात्र त्यानंतर लातूर शहर व परिसरात पाऊस झाला नाही़ तब्बल अठरा दिवस झाले, या अठरा दिवसात मोठा एकही पाऊस झाला नसल्यामुळे बॅरेजेसमध्ये पाणीसाठा झाला नाही़ उलट संकलित झालेले पाणी झपाट्याने उतरत आहे़ ३़३० एमएमक्युब नागझरी बॅरेजेसमध्ये पाणी होते़ मात्र आता या बॅरेजेसमध्ये २़८ एमएमक्युब पाणी आहे़ पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी कालच या प्रकल्पातील उपलब्ध पाण्याची चाचपणी घेतली असता ०़५० एमएमक्युबने पाणी उतरले असल्याचे निदर्शनास आले आहे़ लातूर शहरासाठी दररोज नागझरी येथून १२ एमएलडी पाणी उचलण्यात आले आहे़ गेल्या १८ दिवसात ०़२२ एमएमक्युब पाणी उचलण्यात आले आहे़ मात्र त्या तुलनेत अधिक पाणी घटले आहे़ ०़२८ एमएमक्युब पाणी वापर न होता घटले आहे़ तसेच साई बंधाऱ्यात ०़२२ एमएमक्युब पाणीसाठा झाला होता़ यातीलही १़५० एमएलडी पाणी घटले आहे़ बाष्पीभवन होऊन तसेच चर खोदल्यामुळे पाणी आतल्या आत मुरत आहे़ त्यामुळेच ०़२८ एमएमक्युब पाणी वापर न होता घटले असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी निष्कर्ष काढला आहे़ पाणी मोठ्या प्रमाणात घटत असल्यामुळे महानगर पालिका प्रशासनाला भविष्यातील पाण्याची चिंता वाटत आहे़ योग्य नियोजनाची गरज आहे़ (प्रतिनिधी)लातूर शहरात १ आॅगस्टपासून नळाने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे़ नागझरी व साई प्रकल्पातून दररोज १२ ते १५ एमएलडी पाणी उचलण्यात आले असून, आतापर्यंत २२० एमएलडी पाणी मनपाने या दोन्हीही प्रकल्पातून उचलले आहे़ दरम्यान, १ ते १७ आॅगस्ट दरम्यान शहरात नळाद्वारे पाणीपुरवठ्याची पहिली फेरी पूर्ण झाली आहे़ मात्र बॅरेजेसमधील पाणी झपाट्याने उतरत आहे़ शिवाय, पावसानेही ओढ दिली आहे़ त्यामुळे पाण्याची चिंता मनपा प्रशासनाला परत भेडसावत आहे़