शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्याची ५० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 17:39 IST

जिल्ह्यातील १८ लाख ७९ हजार नागरिकांना टँकरचे पाणी

ठळक मुद्देसरत्या दशकात पहिल्यांदाच ११५० टँकरने पाणीपुरवठा  

औरंगाबाद : जिल्ह्यातील हजार दोन हजार नव्हे, तर तब्बल १८ लाख ७९ हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. या सरत्या दशकात पहिल्यांदाच ११५० टँकरने जिल्ह्यातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ५० टक्के लोकसंख्या पाण्यासाठी व्याकूळ असून, आता दमदार पावसाळ्याची प्रतीक्षा आहे. 

३७ लाखांच्या आसपास जिल्ह्याची लोकसंख्या आहे. यातील ५० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करीत आहे. जिल्ह्यातील बहुतांश मध्यम, लघु प्रकल्प आटले असून, टँकरशिवाय ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्याचा दुसरा कुठलाही पर्याय नाही. ७३८ गावे आणि २६९  वाड्यांवर पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागते आहे. ५३६ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे. औरंगाबाद तालुक्यातील १३७ गावांतील ४ लाख ६ हजार ३७२ नागरिकांना १९४ टँकर, फुलंब्री तालुक्यातील ६८ गावांतील १ लाख ८५ हजार ९१६ नागरिकांना ११४ टँकर, पैठण तालुक्यातील ९८ गावांतील २ लाख ५१ हजार ६७१ नागरिकांना १३६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

गंगापूर तालुक्यातील १४५ गावांतील २ लाख ६४ हजार ५७२ नागरिकांना १७७ टँकर, वैजापूर तालुक्यातील १२५ गावांतील २ लाख १४ हजार ८१२ नागरिकांना १८५ टँकर, खुलताबाद तालुक्यातील ३३ गावांतील ९० हजार ५४४ नागरिकांना ५० टँकर, कन्नड तालुक्यातील ५९ गावांतील १ लाख २९ हजार ४५५ नागरिकांना ८३ टँकर, सिल्लोड तालुक्यातील ९६ गावांतील ३ लाख २० हजार ५८० नागरिकांना १९४ टँकरने, तर सोयगाव तालुक्यातील ७ गावांतील १५ हजार ८२ नागरिकांना १३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

तालुकानिहाय टँकरतालुका    टँकरऔरंगाबाद    १९४फुलंब्री    ११४पैठण    ९८गंगापूर    १७७वैजापूर    १८५खुलताबाद    ५०कन्नड    ८३सिल्लोड    १९४सोयगाव    १३एकूण    ११४६

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद