शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

औरंगाबाद जिल्ह्याची ५० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 17:39 IST

जिल्ह्यातील १८ लाख ७९ हजार नागरिकांना टँकरचे पाणी

ठळक मुद्देसरत्या दशकात पहिल्यांदाच ११५० टँकरने पाणीपुरवठा  

औरंगाबाद : जिल्ह्यातील हजार दोन हजार नव्हे, तर तब्बल १८ लाख ७९ हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. या सरत्या दशकात पहिल्यांदाच ११५० टँकरने जिल्ह्यातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ५० टक्के लोकसंख्या पाण्यासाठी व्याकूळ असून, आता दमदार पावसाळ्याची प्रतीक्षा आहे. 

३७ लाखांच्या आसपास जिल्ह्याची लोकसंख्या आहे. यातील ५० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करीत आहे. जिल्ह्यातील बहुतांश मध्यम, लघु प्रकल्प आटले असून, टँकरशिवाय ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्याचा दुसरा कुठलाही पर्याय नाही. ७३८ गावे आणि २६९  वाड्यांवर पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागते आहे. ५३६ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे. औरंगाबाद तालुक्यातील १३७ गावांतील ४ लाख ६ हजार ३७२ नागरिकांना १९४ टँकर, फुलंब्री तालुक्यातील ६८ गावांतील १ लाख ८५ हजार ९१६ नागरिकांना ११४ टँकर, पैठण तालुक्यातील ९८ गावांतील २ लाख ५१ हजार ६७१ नागरिकांना १३६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

गंगापूर तालुक्यातील १४५ गावांतील २ लाख ६४ हजार ५७२ नागरिकांना १७७ टँकर, वैजापूर तालुक्यातील १२५ गावांतील २ लाख १४ हजार ८१२ नागरिकांना १८५ टँकर, खुलताबाद तालुक्यातील ३३ गावांतील ९० हजार ५४४ नागरिकांना ५० टँकर, कन्नड तालुक्यातील ५९ गावांतील १ लाख २९ हजार ४५५ नागरिकांना ८३ टँकर, सिल्लोड तालुक्यातील ९६ गावांतील ३ लाख २० हजार ५८० नागरिकांना १९४ टँकरने, तर सोयगाव तालुक्यातील ७ गावांतील १५ हजार ८२ नागरिकांना १३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

तालुकानिहाय टँकरतालुका    टँकरऔरंगाबाद    १९४फुलंब्री    ११४पैठण    ९८गंगापूर    १७७वैजापूर    १८५खुलताबाद    ५०कन्नड    ८३सिल्लोड    १९४सोयगाव    १३एकूण    ११४६

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद