शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

५० कोटींतील रस्त्यांच्या कामांचा महापालिकेकडून श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 19:49 IST

50 crore road works started by Aurangabad Municipal Corporation शहरातील २३ रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

ठळक मुद्देएमआयडीसीने केले ८० टक्के काम पूर्णमहापालिकेच्या वाट्याला ५० कोटींत ९ रस्ते आले आहेत.

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी दिला आहे. महापालिकेच्या वाट्याला ५० कोटींत ९ रस्ते आले आहेत. त्यातील अमरप्रीत ते एकता चौक या रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याची माहिती कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली. उर्वरित ८ रस्त्यांच्या मार्किंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

शहरातील २३ रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून रस्ते विकास महामंडळ व एमआयडीसी प्रत्येकी ७ तर महापालिका ९ रस्ते विकसित करणार आहे. महापालिका वगळता इतर विभागांची कामे अगोदरच सुरू झाली आहेत. एमआयडीसीच्या कंत्राटदारांनी आणि प्रशासनाने या कामांमध्ये आघाडी घेतली. रस्त्यांची दर्जेदार कामे एमआयडीसीकडून केली जात आहेत. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही रस्त्यांच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. एमआयडीसीने जवळपास ८० टक्के काम पूर्ण केले आहे. रस्ते विकास महामंडळ आणि महापालिका कामांच्या बाबतीत बरेच मागे आहे. एमआयडीसीने शासनाकडून निधी प्राप्त होण्यापूर्वीच पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशावरून कामाला सुरुवात केली.महापालिकेकडून सध्या हॉटेल अमरप्रीत ते एकता चौक रस्त्याचे काम सुरू आहे. उर्वरित ८ रस्त्यांची मार्किंग आणि काही ठिकाणी अतिक्रमणे असल्यास ती काढून त्वरित कामे सुरू करण्यात येणार आहेत, असे कोल्हे यांनी सांगितले. महापालिकेच्या नगररचना विभागाची या कामासाठी मदत घेण्यात येत आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादfundsनिधी