शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मराठवाडा विकास मंडळाला ५० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 14:13 IST

शेतकरी, बचत गटाला प्राधान्य द्यावे

ठळक मुद्देपारंपरिक पद्धतीनुसार खर्च करता येणार नाही

औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळाला ४ ऑगस्ट २०१४ नंतर २३ जुलै २०१९ रोजी ५० कोटींचा निधी शासनाने देऊ केला आहे. मंडळाला या निधीतून समाजमंदिरे, व्यायामशाळा बांधता येणार नाहीत. शेतकरी उत्पादक, महिला बचत गटांसाठी विशेष कामे करावीत, असा स्पष्ट उल्लेख शासनाने मंगळवारी काढलेल्या आदेशात केला आहे.

राज्यातील तिन्ही विकास मंडळांना ६ वर्षांनंतर प्रत्येकी ५० कोटी रुपये मिळणार आहेत. यापूर्वी २०१३-१४ या आर्थिक वर्षात मराठवाडा विकास कामांसाठी मंडळाला १३ कोटींचा निधी मिळाला होता. त्यानंतर मंडळाच्या प्रशासकीय खर्चासाठी १ कोटी मिळत गेले. मानव विकास कार्यक्रमांतर्गत १२५ तालुके व ४५ क वर्ग नगरपालिका क्षेत्रात ५० टक्के निधी खर्च करता येऊ शकतो. मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी मदत होऊ शकते. दुष्काळग्रस्त भागांसाठी पाणीपुरवठा,  महिला कल्याण योजना, कृषी योजनांसाठी निधी देणे, अपंगांसाठी विशेष साधने, प्रशिक्षण देणे. आयटीआय संस्थांसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याबाबत मंडळ माध्यम होते, परंतु निधी न मिळाल्यामुळे आजवर मंडळ फक्त पोसले गेले. 

२०१३-१४ मध्ये अध्यादेश काढून प्रत्येक मंडळाला १०० कोटींचा निधी जाहीर केला. त्या निधीतही वित्त विभागाने दांडी मारली. एका मंडळासाठी जाहीर केलेला हा निधी तीन मंडळांसाठी असल्याचे तोंडी आदेश त्यावेळी काढले. १०० कोटींचा निधी मिळणार त्या अनुषंगाने मंडळाने खर्चाचे नियोजन केल्यानंतर १३ कोटींचा निधी देऊन शासनाने हात वर केले होते. आता ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड हे निधी मिळण्यासाठी प्रयत्न करीत होते. १ हजार कोटींच्या अनुदानासाठी त्यांनी शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. आता शासनाने निधी देण्यास सुरुवात केली असून, नजीकच्या काळात आणखी निधी मिळवू, असा दावा डॉ. कराड यांनी केला.

अडीच कोटींची मर्यादा प्रत्येक तालुका, नगरपालिका, नगरपंचायत, शहरासाठी जास्तीत जास्त अडीच कोटींचा निधी कुठल्याही एका कामासाठी खर्च करण्याची मर्यादा शासनाने घातली आहे. मंडळाला मिळालेल्या निधीतून अडीच कोटींच्या आतीलच कामे करावी लागणार आहेत. शिवाय एकाच पॅटर्नची कामेदेखील यातून करण्यात येणार नाहीत.

टॅग्स :fundsनिधीMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकार