शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

औरंगाबादेत कचऱ्यापासून ५ हजार टन खतनिर्मिती; महापालिकेच्या उपक्रमास मोठे यश

By मुजीब देवणीकर | Updated: July 22, 2022 20:04 IST

आतापर्यंत चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रकल्पात ५ हजार १९० टन खताची निर्मिती झाली आहे.

औरंगाबाद : शहरात दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर मनपाकडून चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी येथे शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते. खत निर्मितीचे हे प्रकल्प ३ वर्षांपासून यशस्वीरीत्या सुरू आहेत. आतापर्यंत चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रकल्पात ५ हजार १९० टन खताची निर्मिती झाली आहे. या कचऱ्यातून खतापेक्षा जास्त ६ हजार ५५ टन एवढे ड्रायवेस्टच निघाले.

शहरात २०१६ मध्ये कचराकोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेला शंभर टक्के अनुदान देण्याचे घोषित केले. मनपाच्या १४८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. महापालिकेने चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल व कांचनवाडी अशा चार ठिकाणी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. हर्सूल वगळता इतर तीन प्रकल्प सुरू झाले आहेत. चिकलठाणा व पडेगाव प्रकल्पांची क्षमता दररोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. तीन वर्षांपूर्वी चिकलठाणा येथील प्रकल्प सुरू झाला तर दोन वर्षांपूर्वी पडेगावचा प्रकल्प सुरू झाला. या दोन्ही प्रकल्पात आत्तापर्यंत खासगी एजन्सीने ५ हजार १९० टन खताची निर्मिती केली असल्याचे घन कचरा विभागाचे प्रमुख सोमनाथ जाधव यांनी सांगितले. तयार केलेले खत दीड हजार रुपये टन या दराने खासगी कंपन्यांना विकले जात आहे. कचऱ्यातून खतापेक्षा ड्रायवेस्टच जास्त निघाल्याचे समोर आले आहे. ८ हजार ५५ टन ड्रायवेस्ट आतापर्यंत अंबुजा सिमेंट, सोशल लॅबला देण्यात आले आहे.

हॉटेल वेस्ट मिळेनाकांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाची दररोज २५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. पण महापालिकेला फक्त साडेचार टन ओला कचरा मिळत आहे. अनेक हॉटेल चालक महापालिकेला शिळे उरलेले अन्न देण्यास टाळाटाळ करीत आहेत. हॉटेल वेस्ट जमा करण्यासाठी घन कचरा विभागाने स्वतंत्र घंटागाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी महापालिकेच्या घंटागाड्यात ओला कचरा द्यावा, असे आवाहन जाधव यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न