शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

औरंगाबादेत कचऱ्यापासून ५ हजार टन खतनिर्मिती; महापालिकेच्या उपक्रमास मोठे यश

By मुजीब देवणीकर | Updated: July 22, 2022 20:04 IST

आतापर्यंत चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रकल्पात ५ हजार १९० टन खताची निर्मिती झाली आहे.

औरंगाबाद : शहरात दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर मनपाकडून चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी येथे शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते. खत निर्मितीचे हे प्रकल्प ३ वर्षांपासून यशस्वीरीत्या सुरू आहेत. आतापर्यंत चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रकल्पात ५ हजार १९० टन खताची निर्मिती झाली आहे. या कचऱ्यातून खतापेक्षा जास्त ६ हजार ५५ टन एवढे ड्रायवेस्टच निघाले.

शहरात २०१६ मध्ये कचराकोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेला शंभर टक्के अनुदान देण्याचे घोषित केले. मनपाच्या १४८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. महापालिकेने चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल व कांचनवाडी अशा चार ठिकाणी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. हर्सूल वगळता इतर तीन प्रकल्प सुरू झाले आहेत. चिकलठाणा व पडेगाव प्रकल्पांची क्षमता दररोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. तीन वर्षांपूर्वी चिकलठाणा येथील प्रकल्प सुरू झाला तर दोन वर्षांपूर्वी पडेगावचा प्रकल्प सुरू झाला. या दोन्ही प्रकल्पात आत्तापर्यंत खासगी एजन्सीने ५ हजार १९० टन खताची निर्मिती केली असल्याचे घन कचरा विभागाचे प्रमुख सोमनाथ जाधव यांनी सांगितले. तयार केलेले खत दीड हजार रुपये टन या दराने खासगी कंपन्यांना विकले जात आहे. कचऱ्यातून खतापेक्षा ड्रायवेस्टच जास्त निघाल्याचे समोर आले आहे. ८ हजार ५५ टन ड्रायवेस्ट आतापर्यंत अंबुजा सिमेंट, सोशल लॅबला देण्यात आले आहे.

हॉटेल वेस्ट मिळेनाकांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाची दररोज २५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. पण महापालिकेला फक्त साडेचार टन ओला कचरा मिळत आहे. अनेक हॉटेल चालक महापालिकेला शिळे उरलेले अन्न देण्यास टाळाटाळ करीत आहेत. हॉटेल वेस्ट जमा करण्यासाठी घन कचरा विभागाने स्वतंत्र घंटागाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी महापालिकेच्या घंटागाड्यात ओला कचरा द्यावा, असे आवाहन जाधव यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न