शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ५ एमएलडी सांडपाणी रोज होते शुद्ध; पण सोडावे लागते खामनदीत

By साहेबराव हिवराळे | Updated: January 11, 2024 19:14 IST

मानसिकता बदलण्याची आवश्यकता; बांधकाम व्यावसायिक तसेच उद्यान व झाडासाठी पाणी वापरण्यास योग्य

छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रात आता सकारात्मक खूप कामे होत आहेत त्याचा एक भाग म्हणून आता औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत असून तब्बल पाच एमएलडी पाणी रोज शुद्ध करण्यात येत आहे. हे शुद्ध केलेले पाणी उद्यान, दुभाजकावरील झाडे किंवा औद्योगिक क्षेत्रातील वनीकरणासाठी योग्य असूनही खामनदीत हे पाणी सोडून द्यावे लागत आहे. सीईटीपी प्लांट उभारून व त्याचा योग्य वापर करूनही केवळ इच्छाशक्ती नसल्याने हे पाणी न वापरता नदीत सोडून द्यावे लागत आहे.

दुष्काळसदृश परिस्थिती, कडक उन्हाळ्याचा काळ यावेळी औद्योगिक क्षेत्रातील बागबगिचा हिरवागार ठेवण्यासाठी हे पाणी अमृतच ठरणार आहे; परंतु, त्याविषयी कुणीही विचार करीत नाहीत. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील सांडपाणी वाहून गेल्याने परिसरातील जमिनीची पोत खराब झालेली असून, हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अभ्यासावरून लक्षात आले होते. त्यामुळे एमआयडीसीने वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारला. पूर्ण एमआयडीसीतील कारखान्याचे टाकाऊ पाणी यामुळे शुद्ध होऊ लागले आहे. याची उभारणी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी झाली होती हे विशेष. असे असले तरीही आज जमिनीचा पोत सुधारलेला नाही. पूर्वी जे सांडपाणी मोकळ्या प्लॉटवर किंवा नाल्यात, नदीत सोडण्याचे प्रकार होत होते. यामुळे परिसरातील शेतकरी, मेंढपाळ तसेच गोपालकांना या सांडपाण्याचा मोठा फटका बसलेला होता. अनेक शेतकरी तसेच गोपालकांनी सांडपाण्याची ओरड केली होती त्याची दखल घेत सीईटीपी प्लांट उभारण्यात आला.

सांडपाणी वाहून आणले प्लांटमध्ये...रसायनयुक्त पाणी, ऑइल, इतर वापराचे पाणी या प्लांटमध्ये भूमिगत वाहिनी टाकून वाहून आणले आहे. दररोज पाच एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी नाइलाजास्तव नदीत सोडले जाते. त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी विकणे किंवा नदीत टाकण्यापेक्षा ते बांधकाम व्यावसायिक तसेच एमआयडीसीने लावलेल्या झाडांना टाकल्यास परिसरात हिरवळ कायम राहू शकेल, असाही निसर्गमित्रांचा आग्रह आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग करावी...जमिनीतील पाणी दूषित झाले असून, ते योग्य नाही असे म्हटले तरी चालेल; परंतु, आपण जमिनीत रेन वाॅटर हार्वेस्टिंगनेही पावसाचे पाणी जमिनीत जिरवू शकतो. जमिनीची पोत सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळही यावर काम करीत आहे. उद्योजकांनी मार्ग अवलंबला पाहिजे.- अनिल पाटील, पाणी चळवळ

बांधकाम व्यवसाय व बागांसाठी पाणी नेता येईल..औद्योगिक क्षेत्रातील घाण पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते वापरायोग्य होते, झाड तसेच बांधकामासाठी नेता येईल; परंतु, तसेच कुणाची मागणी आलेली नाही.- गीतेश साबणे, प्लांट प्रमुख

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीWaluj MIDCवाळूज एमआयडीसी