शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ५ एमएलडी सांडपाणी रोज होते शुद्ध; पण सोडावे लागते खामनदीत

By साहेबराव हिवराळे | Updated: January 11, 2024 19:14 IST

मानसिकता बदलण्याची आवश्यकता; बांधकाम व्यावसायिक तसेच उद्यान व झाडासाठी पाणी वापरण्यास योग्य

छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रात आता सकारात्मक खूप कामे होत आहेत त्याचा एक भाग म्हणून आता औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत असून तब्बल पाच एमएलडी पाणी रोज शुद्ध करण्यात येत आहे. हे शुद्ध केलेले पाणी उद्यान, दुभाजकावरील झाडे किंवा औद्योगिक क्षेत्रातील वनीकरणासाठी योग्य असूनही खामनदीत हे पाणी सोडून द्यावे लागत आहे. सीईटीपी प्लांट उभारून व त्याचा योग्य वापर करूनही केवळ इच्छाशक्ती नसल्याने हे पाणी न वापरता नदीत सोडून द्यावे लागत आहे.

दुष्काळसदृश परिस्थिती, कडक उन्हाळ्याचा काळ यावेळी औद्योगिक क्षेत्रातील बागबगिचा हिरवागार ठेवण्यासाठी हे पाणी अमृतच ठरणार आहे; परंतु, त्याविषयी कुणीही विचार करीत नाहीत. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील सांडपाणी वाहून गेल्याने परिसरातील जमिनीची पोत खराब झालेली असून, हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अभ्यासावरून लक्षात आले होते. त्यामुळे एमआयडीसीने वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारला. पूर्ण एमआयडीसीतील कारखान्याचे टाकाऊ पाणी यामुळे शुद्ध होऊ लागले आहे. याची उभारणी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी झाली होती हे विशेष. असे असले तरीही आज जमिनीचा पोत सुधारलेला नाही. पूर्वी जे सांडपाणी मोकळ्या प्लॉटवर किंवा नाल्यात, नदीत सोडण्याचे प्रकार होत होते. यामुळे परिसरातील शेतकरी, मेंढपाळ तसेच गोपालकांना या सांडपाण्याचा मोठा फटका बसलेला होता. अनेक शेतकरी तसेच गोपालकांनी सांडपाण्याची ओरड केली होती त्याची दखल घेत सीईटीपी प्लांट उभारण्यात आला.

सांडपाणी वाहून आणले प्लांटमध्ये...रसायनयुक्त पाणी, ऑइल, इतर वापराचे पाणी या प्लांटमध्ये भूमिगत वाहिनी टाकून वाहून आणले आहे. दररोज पाच एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी नाइलाजास्तव नदीत सोडले जाते. त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी विकणे किंवा नदीत टाकण्यापेक्षा ते बांधकाम व्यावसायिक तसेच एमआयडीसीने लावलेल्या झाडांना टाकल्यास परिसरात हिरवळ कायम राहू शकेल, असाही निसर्गमित्रांचा आग्रह आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग करावी...जमिनीतील पाणी दूषित झाले असून, ते योग्य नाही असे म्हटले तरी चालेल; परंतु, आपण जमिनीत रेन वाॅटर हार्वेस्टिंगनेही पावसाचे पाणी जमिनीत जिरवू शकतो. जमिनीची पोत सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळही यावर काम करीत आहे. उद्योजकांनी मार्ग अवलंबला पाहिजे.- अनिल पाटील, पाणी चळवळ

बांधकाम व्यवसाय व बागांसाठी पाणी नेता येईल..औद्योगिक क्षेत्रातील घाण पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते वापरायोग्य होते, झाड तसेच बांधकामासाठी नेता येईल; परंतु, तसेच कुणाची मागणी आलेली नाही.- गीतेश साबणे, प्लांट प्रमुख

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीWaluj MIDCवाळूज एमआयडीसी