शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

दामदुप्पटचे आमिष अंगलट, तक्रार दाखल होताच ऑनलाईन फसवणुकीचे ५ लाख ६४ हजार रिफंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 11:55 IST

online fraud तक्रारदारांनी फोन पे, गुगल पेसह इतर ऑनलाइन गेट वेच्या माध्यमातून पेमेंट केले होते.

ठळक मुद्देदामदुप्पट करण्याचा प्रकार अनेक नागरिकांच्या अंगलट

औरंगाबाद : शहरातील १२ नागरिकांनी चिटफंडासह दामदुपटीच्या आमिषांना बळी पडून विविध माध्यमांतून पैसे पाठविले होते. त्यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी सायबर पोलिसांकडे ( Cyber Crime ) धाव घेतली. तक्रारदारांनी फोन पे, गुगल पेसह इतर ऑनलाइन गेट वेच्या माध्यमातून पेमेंट केले होते. त्या गेट वेच्या प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून फसवणूक झालेल्या १२ नागरिकांचे ५ लाख ६४ हजार रुपये परत मिळवून दिले आहेत.

सायबर पोलीस ठाण्यात १२ नागरिकांनी ऑनलाइन फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. निरीक्षक गौतम पातारे यांनी तक्रारींची तत्काळ दखल घेत तांत्रिक बाजू तपासली. ज्या गेट वेच्या माध्यमातून पेमेंट झाले होते, त्या व्यवस्थापनाला माहिती कळवून नागरिकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आणून दिले. यासाठी उपनिरीक्षक राहुल चव्हाण, हवालदार सुशांत शेळके आणि रवींद्र पौळ यांनी अधिक तपास करीत ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले होते ती खाती गोठविण्याची मागणी केली. गुगल पे, फोन पेसह इतर कंपन्यांनी अधिक तपास केला असता, संबंधितांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित तक्रारदारांनी पाठविलेले ५ लाख ६४ हजार रुपये पुन्हा त्यांना रिफंड केल्याची माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी केली. ही कामगिरी आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते, सहायक पोलीस निरीक्षक विशाल ढुमे, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पातारे, उपनिरीक्षक चव्हाण, हवालदार सुशांत शेळके, रवींद्र पौळ यांनी केली.

आमिषाला बळी पडू नकानागरिकांनी पैसे दुप्पट करून देतो, क्रेडिट कार्डचे पॉइंट्स वाढविण्याच्या योजनांसह संदेश आपल्या मोबाइलवर सतत येत असतात. या संदेशाच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्यात येते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपली कोणतीही गोपनीय माहिती संबंधितांना शेअर करू नये, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइम