शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

‘नीट’ परीक्षेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात ४८ केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 16:07 IST

१३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५  या वेळेत ही परीक्षा देशभर आयोजित करण्याचे नियोजन नॅशनल टेस्टिंंग एजन्सीद्वारे करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातून १२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा  परीक्षा केंद्रात कोरोनाचे नियम पाळणार

औरंगाबाद  : वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट ) १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेला औरंगाबाद शहरातील ४८ परीक्षा केंद्रांवर तब्बल १२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती समन्वयक रविंदर राणा यांनी दिली.

१३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५  या वेळेत ही परीक्षा देशभर आयोजित करण्याचे नियोजन नॅशनल टेस्टिंंग एजन्सीद्वारे करण्यात आले आहे. यात ७२० मार्कांची परीक्षा असून, १८० प्रश्न असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचे वेळापत्रक तीन वेळा बदलण्यात आले आहेत. मे, जून, जुलै महिन्यांत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात येत होती. १३ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यालाही विविध राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शविलेला असतानाही परीक्षा घेण्यावर केंद्र शासन ठाम राहिले. त्यामुळे ही परीक्षा होत आहे.

औरंगाबाद शहरातील ४८ परीक्षा केंद्रांवर १२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंंगच्या नियमांची कडकपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी गर्दी करू नये, यासाठी सकाळी ११ वाजेपासून विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या वेळेनुसार प्रवेश करावा लागणार आहे. ही प्रवेशाची प्रक्रिया दीड वाजेपर्यंत चालणार आहे. याशिवाय एका वर्गात केवळ १२ विद्यार्थी बसण्याची परवानगी आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क आदी सुरक्षा साधनेही पुरविण्यात येतील, तसेच वर्गात प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासण्यात येईल. यात कोणाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास आयसोलेशन असलेल्या हॉलमध्ये संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल, असेही ठरविण्यात आले. त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचेही समन्वयक रविंदर राणा यांनी सांगितले.

गोंधळ होऊ नये  याकडे लक्षनीटच्या परीक्षेवेळी आतमध्ये विद्यार्थी प्रवेश करताना आणि त्यानंतर बाहेर जाताना गोंधळ होऊ नये, सोशल डिस्टन्सिंंगच्या नियमांचे पालन केले जावे, याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. 

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी