शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

‘नीट’ परीक्षेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात ४८ केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 16:07 IST

१३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५  या वेळेत ही परीक्षा देशभर आयोजित करण्याचे नियोजन नॅशनल टेस्टिंंग एजन्सीद्वारे करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातून १२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा  परीक्षा केंद्रात कोरोनाचे नियम पाळणार

औरंगाबाद  : वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट ) १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेला औरंगाबाद शहरातील ४८ परीक्षा केंद्रांवर तब्बल १२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती समन्वयक रविंदर राणा यांनी दिली.

१३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५  या वेळेत ही परीक्षा देशभर आयोजित करण्याचे नियोजन नॅशनल टेस्टिंंग एजन्सीद्वारे करण्यात आले आहे. यात ७२० मार्कांची परीक्षा असून, १८० प्रश्न असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचे वेळापत्रक तीन वेळा बदलण्यात आले आहेत. मे, जून, जुलै महिन्यांत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात येत होती. १३ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यालाही विविध राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शविलेला असतानाही परीक्षा घेण्यावर केंद्र शासन ठाम राहिले. त्यामुळे ही परीक्षा होत आहे.

औरंगाबाद शहरातील ४८ परीक्षा केंद्रांवर १२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंंगच्या नियमांची कडकपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी गर्दी करू नये, यासाठी सकाळी ११ वाजेपासून विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या वेळेनुसार प्रवेश करावा लागणार आहे. ही प्रवेशाची प्रक्रिया दीड वाजेपर्यंत चालणार आहे. याशिवाय एका वर्गात केवळ १२ विद्यार्थी बसण्याची परवानगी आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क आदी सुरक्षा साधनेही पुरविण्यात येतील, तसेच वर्गात प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासण्यात येईल. यात कोणाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास आयसोलेशन असलेल्या हॉलमध्ये संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल, असेही ठरविण्यात आले. त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचेही समन्वयक रविंदर राणा यांनी सांगितले.

गोंधळ होऊ नये  याकडे लक्षनीटच्या परीक्षेवेळी आतमध्ये विद्यार्थी प्रवेश करताना आणि त्यानंतर बाहेर जाताना गोंधळ होऊ नये, सोशल डिस्टन्सिंंगच्या नियमांचे पालन केले जावे, याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. 

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी