शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

जायकवाडीत धरणात ४२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:38 IST

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी धरणात ३३०७४ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक होत होती. धरणाचा जलसाठा ४२ टक्के झाला असून गेल्या २४ तासात धरणात पावणेतीन टीएमसीने भर पडली आहे.

पैठण : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी धरणात ३३०७४ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक होत होती. धरणाचा जलसाठा ४२ टक्के झाला असून गेल्या २४ तासात धरणात पावणेतीन टीएमसीने भर पडली आहे.वरील धरणातून होणारे विसर्ग आज घटविण्यात आले आहेत. विसर्गात झालेली घट लक्षात घेता जायकवाडी धरणात येणारी आवक कमी होण्याची शक्यता धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. नाशिक व नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पाऊस उघडला असून गेल्या २४ तासात त्र्यंबकेश्वर २० मि.मी., इगतपुरी ६२ मि. मी., घोटी ४० मि. मी. याच ठिकाणी पाऊस झाला. यामुळे दोन्ही जिल्ह्यातील धरण समुहातून होणारा विसर्ग घटविण्यात आला आहे.दारणा १८००, गंगापूर १५६०, पालखेड २२१३ क्युसेक्सपर्यंत विसर्ग कमी करण्यात आला. या सर्व धरणाचे पाणी नांदूर -मधमेश्वर बंधाऱ्यात जमा होते. नांदूर -मधमेश्वर बंधाºयातून गोदावरी पात्रात काल २०२४४ क्युसेक्स एवढ्या मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत होता, तो आज १११५२ क्युसेक्सपर्यंत घटविण्यात आला. यामुळे गोदावरीचा पूर ओसरत आहे.नाशिक जिल्ह्यातील धरणाप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातूनसुध्दा विसर्ग घटविण्यात आला आहे. भंडारदरा २०३७, निळवंडे ६३०० व ओझर वेअरमधून प्रवरेच्या पात्रात ६३०१ क्युसेक्स असा विसर्ग आज ठेवण्यात आला.गुरुवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी १५०८.६८ फूट झाली असून धरणात एकूण जलसाठा १५९४.७२४ दलघमी (५६.३१ टीएमसी) तर जीवंत जलसाठा ८५६.६१८ दलघमी ( ३०.२४ टीएमसी)एवढा झाला होता.

टॅग्स :DamधरणWaterपाणी