शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

जायकवाडी धरणात ४० टक्के पाणी; पिण्याच्या पाण्याचे, उद्योगांचे टेन्शन गेले

By विकास राऊत | Updated: September 29, 2023 18:45 IST

पुढच्या पावसाळ्यापर्यंत जिवंत साठ्यातून पाणी

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात ४०.६३ टक्के पाणी असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह ४२ पाणीपुरवठा योजना व सहा हजारांहून अधिक लहान - मोठ्या उद्योगांना पुढच्या पावसाळ्यापर्यंत जिवंत साठ्यातून पाणीपुरवठा होणे शक्य होणार आहे. धरणात सध्या ८८२.०९४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. ७ हजार २६९ क्युसेस पाण्याची आवक सध्या सुरू आहे.

दररोज ०.२९ दलघमी पाणी जायकवाडीतून उपसले जाते. वर्षभराचा विचार केला तर ४ टीएमसी पाणी पिण्यासह उद्योगांना लागते. धरणात सध्या सरासरी ३२ टीएमसी जलसाठा आहे, असे जायकवाडी प्रकल्प अभियंता विभागातील सुत्रांनी सांगितले.

शेतीच्या आवर्तनाचा निर्णय नंतर.....रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पाणीपाळ्यांचा (आवर्तन) निर्णय जायकवाडीत ३१ ऑक्टोबर रोजी असलेल्या पाणीसाठ्याच्या अनुषंगाने होईल. दोन्ही हंगामांतील आवर्तनाला लागणारे पाणी आणि धरणातील शिल्लक पाणी यावरच तो निर्णय असेल.

१५ ऑक्टोबरपर्यंत पाणीवाटपाची बैठक१५ ऑक्टोबरपर्यंत पाणीवाटप समितीची बैठक होणे शक्य आहे. या बैठकीत जायकवाडीवरील धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय होईल. वरच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडले तर आवर्तन देण्याच्या निर्णयावर त्याचा सकारात्मक निर्णय होईल.

ऑक्टोबरपर्यंत दरवाजे उघडायचे नाहीत....जिल्ह्यासह मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे दरवाजे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १० जुलै रोजी दिले. धरणात फक्त २६ टक्के जलसाठा असल्यामुळे ते आदेश होते. ऑक्टोबर २०२३ पर्यंत धरणात ३३ टक्के जलसाठा आल्यावर पुढील निर्णय होईल, असे त्यांनी म्हटले होते. सध्या ४० टक्के पाणी आहे.

जायकवाडीतून कुणाला किती पाणी?जायकवाडीतून लहान - मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय दोन ते अडीच लाख शेतकरी अवलंबून आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांतील २००हून अधिक गावे, औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १३५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. उद्योगांना ५२ एमएलडी पाणी उपसा होतो. म्हणजेच शहराला रोज २ द. ल. घ. मी. पाणी लागते. मृत जलसाठ्यातूनही दीड वर्ष पाणीपुरवठा होऊ शकतो. मृत जलसाठ्याची क्षमता ७३८.१०६ द. ल. घ. मी. आहे.

उद्योगांची पाण्याची गरज५२ ते ५५ एमएलडी पाण्याची गरज उद्योगांना आहे. एमआयडीसीच्या योजनांतून हा उपसा होऊन उद्योगांना पाणी पुरविले जाते.शहराची गरजशहराची पाण्याची गरज २६० एमएलडी असून, सध्या १३५ एमएलडी पाणीपुरवठा होताे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसAurangabadऔरंगाबाद