शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

जायकवाडी धरणात ४० टक्के पाणी; पिण्याच्या पाण्याचे, उद्योगांचे टेन्शन गेले

By विकास राऊत | Updated: September 29, 2023 18:45 IST

पुढच्या पावसाळ्यापर्यंत जिवंत साठ्यातून पाणी

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात ४०.६३ टक्के पाणी असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह ४२ पाणीपुरवठा योजना व सहा हजारांहून अधिक लहान - मोठ्या उद्योगांना पुढच्या पावसाळ्यापर्यंत जिवंत साठ्यातून पाणीपुरवठा होणे शक्य होणार आहे. धरणात सध्या ८८२.०९४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. ७ हजार २६९ क्युसेस पाण्याची आवक सध्या सुरू आहे.

दररोज ०.२९ दलघमी पाणी जायकवाडीतून उपसले जाते. वर्षभराचा विचार केला तर ४ टीएमसी पाणी पिण्यासह उद्योगांना लागते. धरणात सध्या सरासरी ३२ टीएमसी जलसाठा आहे, असे जायकवाडी प्रकल्प अभियंता विभागातील सुत्रांनी सांगितले.

शेतीच्या आवर्तनाचा निर्णय नंतर.....रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पाणीपाळ्यांचा (आवर्तन) निर्णय जायकवाडीत ३१ ऑक्टोबर रोजी असलेल्या पाणीसाठ्याच्या अनुषंगाने होईल. दोन्ही हंगामांतील आवर्तनाला लागणारे पाणी आणि धरणातील शिल्लक पाणी यावरच तो निर्णय असेल.

१५ ऑक्टोबरपर्यंत पाणीवाटपाची बैठक१५ ऑक्टोबरपर्यंत पाणीवाटप समितीची बैठक होणे शक्य आहे. या बैठकीत जायकवाडीवरील धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय होईल. वरच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडले तर आवर्तन देण्याच्या निर्णयावर त्याचा सकारात्मक निर्णय होईल.

ऑक्टोबरपर्यंत दरवाजे उघडायचे नाहीत....जिल्ह्यासह मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे दरवाजे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १० जुलै रोजी दिले. धरणात फक्त २६ टक्के जलसाठा असल्यामुळे ते आदेश होते. ऑक्टोबर २०२३ पर्यंत धरणात ३३ टक्के जलसाठा आल्यावर पुढील निर्णय होईल, असे त्यांनी म्हटले होते. सध्या ४० टक्के पाणी आहे.

जायकवाडीतून कुणाला किती पाणी?जायकवाडीतून लहान - मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय दोन ते अडीच लाख शेतकरी अवलंबून आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांतील २००हून अधिक गावे, औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १३५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. उद्योगांना ५२ एमएलडी पाणी उपसा होतो. म्हणजेच शहराला रोज २ द. ल. घ. मी. पाणी लागते. मृत जलसाठ्यातूनही दीड वर्ष पाणीपुरवठा होऊ शकतो. मृत जलसाठ्याची क्षमता ७३८.१०६ द. ल. घ. मी. आहे.

उद्योगांची पाण्याची गरज५२ ते ५५ एमएलडी पाण्याची गरज उद्योगांना आहे. एमआयडीसीच्या योजनांतून हा उपसा होऊन उद्योगांना पाणी पुरविले जाते.शहराची गरजशहराची पाण्याची गरज २६० एमएलडी असून, सध्या १३५ एमएलडी पाणीपुरवठा होताे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसAurangabadऔरंगाबाद