शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणात ४० टक्के पाणी; पिण्याच्या पाण्याचे, उद्योगांचे टेन्शन गेले

By विकास राऊत | Updated: September 29, 2023 18:45 IST

पुढच्या पावसाळ्यापर्यंत जिवंत साठ्यातून पाणी

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात ४०.६३ टक्के पाणी असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह ४२ पाणीपुरवठा योजना व सहा हजारांहून अधिक लहान - मोठ्या उद्योगांना पुढच्या पावसाळ्यापर्यंत जिवंत साठ्यातून पाणीपुरवठा होणे शक्य होणार आहे. धरणात सध्या ८८२.०९४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. ७ हजार २६९ क्युसेस पाण्याची आवक सध्या सुरू आहे.

दररोज ०.२९ दलघमी पाणी जायकवाडीतून उपसले जाते. वर्षभराचा विचार केला तर ४ टीएमसी पाणी पिण्यासह उद्योगांना लागते. धरणात सध्या सरासरी ३२ टीएमसी जलसाठा आहे, असे जायकवाडी प्रकल्प अभियंता विभागातील सुत्रांनी सांगितले.

शेतीच्या आवर्तनाचा निर्णय नंतर.....रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पाणीपाळ्यांचा (आवर्तन) निर्णय जायकवाडीत ३१ ऑक्टोबर रोजी असलेल्या पाणीसाठ्याच्या अनुषंगाने होईल. दोन्ही हंगामांतील आवर्तनाला लागणारे पाणी आणि धरणातील शिल्लक पाणी यावरच तो निर्णय असेल.

१५ ऑक्टोबरपर्यंत पाणीवाटपाची बैठक१५ ऑक्टोबरपर्यंत पाणीवाटप समितीची बैठक होणे शक्य आहे. या बैठकीत जायकवाडीवरील धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय होईल. वरच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडले तर आवर्तन देण्याच्या निर्णयावर त्याचा सकारात्मक निर्णय होईल.

ऑक्टोबरपर्यंत दरवाजे उघडायचे नाहीत....जिल्ह्यासह मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे दरवाजे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १० जुलै रोजी दिले. धरणात फक्त २६ टक्के जलसाठा असल्यामुळे ते आदेश होते. ऑक्टोबर २०२३ पर्यंत धरणात ३३ टक्के जलसाठा आल्यावर पुढील निर्णय होईल, असे त्यांनी म्हटले होते. सध्या ४० टक्के पाणी आहे.

जायकवाडीतून कुणाला किती पाणी?जायकवाडीतून लहान - मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय दोन ते अडीच लाख शेतकरी अवलंबून आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांतील २००हून अधिक गावे, औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १३५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. उद्योगांना ५२ एमएलडी पाणी उपसा होतो. म्हणजेच शहराला रोज २ द. ल. घ. मी. पाणी लागते. मृत जलसाठ्यातूनही दीड वर्ष पाणीपुरवठा होऊ शकतो. मृत जलसाठ्याची क्षमता ७३८.१०६ द. ल. घ. मी. आहे.

उद्योगांची पाण्याची गरज५२ ते ५५ एमएलडी पाण्याची गरज उद्योगांना आहे. एमआयडीसीच्या योजनांतून हा उपसा होऊन उद्योगांना पाणी पुरविले जाते.शहराची गरजशहराची पाण्याची गरज २६० एमएलडी असून, सध्या १३५ एमएलडी पाणीपुरवठा होताे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसAurangabadऔरंगाबाद