शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

छत्रपती संभाजीनगरात आल्या ४० लाख वह्या; दोन महिन्यांत होणार १३ कोटींची उलाढाल

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 22, 2023 12:36 IST

नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी जोरात

छत्रपती संभाजीनगर : नवीन शैक्षणिक वर्षाला जून महिन्यापासून सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने शालेय साहित्यांच्या बाजारपेठेत मोठ्या उलाढालीला सुरुवात झाली आहे. आजघडीला ४० लाख वह्या, रजिस्टर शहरात दाखल झाली आहेत. त्यांची किंमत १५ कोटींच्या आसपास आहे. पुढील ‘मे व जून’ या महिन्यांत ८० टक्के वह्या विक्री होतील. म्हणजेच १३ कोटींची उलाढाल या काळात होईल.

मुंबई, जालनातील उत्पादकांच्या वह्या४० लाख वह्या, रजिस्टर बाजारात आले आहेत. यातील ही ८० टक्के वह्या, रजिस्टर हे मुंबईहून, तर उर्वरित २० टक्के वह्या जालन्यातील उत्पादकांकडून आणण्यात आल्या आहेत. मुंबईतील नामांकित उत्पादकांच्या वह्या शहरात जास्त विकल्या जातात.

६० दिवसांत ३२ लाख वह्याजिल्हा व्यापारी महासंघाचे सहसचिव सुनील अजमेरा यांनी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याला २ डझन वह्या घ्याव्या लागतातच. ४० लाख वह्या बाजारात आल्या असल्या तरी पुढील ६० दिवसांत यातील ३२ लाख वह्या विकल्या जातील. त्यानंतर शिल्लक ८ लाख वह्या दिवाळीपर्यंत विकतील.

२० टक्कांपर्यंत वाढल्या किमतीकागद्याच्या किमती वाढल्याने वह्यांच्या किमती २० टक्यांपर्यंत वाढल्या आहेत. 

वह्या व रजिस्टरचे बाजारातील साधारण भाव असे.किती पानी वही एप्रिल २०२२ (प्रतिनग) एप्रिल २०२३१०० पानी वही २५ रु. -------३० रु.२०० पानी वही ५० रु. ------६५ रु.२०० पानी रजिस्टर ६० रु. -----७५ रु

यंदा पाने तेवढीच ठेवली, किमती वाढविल्यादरवर्षी पाने कमी करून वह्यांच्या किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न उत्पादक करीत असतात. मात्र, आता पाने आणखी कमी करता येत नाही, यामुळे यंदा पाने तेवढीच ठेवून किमती वाढविण्यात आल्या आहेत.

खाकी रंगाच्या मुखपृष्ठाला मागणीपूर्वी वह्यांच्या मुखपृष्ठावर कार्टून, वाहनाचे, निसर्गाचे छायाचित्र असे. त्यावर खाकी रंगाचे कव्हर घातले जात. मात्र, आता खाकी रंगाच्या कव्हर सारखे प्रिंटच मुखपृष्ठावर असते.

२०० पानी रजिस्टरच सुपर हिट१०० पानी वह्यांपेक्षा २०० पानी रजिस्टर सुपर हिट आहेत. कारण, शाळा असो वा खासगी शिकवणी, दोन्ही ठिकाणी २०० पानांचे रजिस्टर चालते. यामुळे ७० टक्के रजिस्टर, तर ३० टक्के वह्या विकल्या जातात.

स्टेपल बँडिंगपूर्वी वह्यांना दोऱ्याची बांधणी केली जात होते. मात्र, आता स्टेपल बँडिंगचा जास्त वापर केला जात आहे. यामुळे वह्यांची पाने वेगवेगळी होत नाहीत, असे उत्पादकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण