पैठण : जायकवाडी धरण क्षेत्र आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी १८ दरवाजांतून ३७ हजार ७२८ क्यूसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी ८ वाजता जायकवाडीतून १८ हजार ८६४ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. त्यानंतर आवक वाढल्यामुळे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हा विसर्ग वाढवून धरणाचे १८ दरवाजे दोन फुटाने उघडून ३७ हजार ७२८ क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रात्रीतून पाण्याची आवक आणखी वाढल्यास गोदावरी नदीपात्रातील विसर्गही वाढवण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.
अडीच महिन्यांपासून दरवाजे सुरूचजायकवाडी धरण यावर्षी शंभर टक्के भरल्यामुळे धरणात येणारे सर्व पाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. आज रोजी धरणाची पाणी पातळी १५२२ फुटांवर असून, जिवंत पाणीसाठा २१७०.९३५ दलघमी आहे. सध्या धरणातील पाण्याची सध्याची आवक ३७ हजार ७२८ क्यूसेक इतकी आहे. मागील अडीच महिन्यांपासून धरणातून विसर्ग सुरूच आहे.
Web Summary : Due to heavy rainfall, Jayakwadi Dam's water discharge increased. 37,728 cusecs released through 18 gates into Godavari. Riverbank villages are alerted. The dam is full, and discharge has continued for 2.5 months.
Web Summary : भारी बारिश के कारण जायकवाड़ी बांध से पानी का निर्वहन बढ़ा। गोदावरी में 18 गेटों से 37,728 क्यूसेक पानी छोड़ा गया। नदी किनारे के गांवों को सतर्क किया गया। बांध भरा हुआ है, और ढाई महीने से पानी छोड़ा जा रहा है।