शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव, राज्यातील उद्योग-व्यवसायाला शॉक देणारा

By बापू सोळुंके | Updated: February 13, 2023 20:38 IST

वीज ग्राहक समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष प्रताप होगाडे : २८ फेब्रुवारी रोजी राज्यभर वीज दरवाढ प्रस्तावाची होळी

औरंगाबाद : देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत आधीच महाराष्ट्रातील विजेचे दर सर्वाधिक आहेत. असे असताना महावितरणने त्यांचा भ्रष्टाचार, वीज चोऱ्या आणि अकार्यक्षमता लपविण्यासाठी वीज ग्राहकांच्या माथी ३७ टक्के वीज दरवाढ लादण्याचा प्रस्ताव सादर केला आहे, असा आरोप वीज ग्राहक व औद्योगिक संघटनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. या दरवाढीमुळे उद्योग, व्यवसाय बंद करावा लागेल किंवा दुसऱ्या राज्यात हलवावा, लागू शकतो, तसेच सामान्य वीज ग्राहक, शेतकरी यांच्यासाठी ही दरवाढ कंबरडे मोडणारी आहे. या दरवाढविरोधात २८ फेब्रुवारी रोजी राज्यभर महावितरणच्या प्रस्तावाची होळी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

होगाडे म्हणाले की, महावितरण कंपनीने ६७.६४४ कोटी रुपये तुटीची भरपाई करण्यासाठी सरासरी ३७ टक्के म्हणजेच प्रतियुनिट २ रुपये ५५ पैसे दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. राज्य वीज नियामक आयोगावरील अध्यक्ष आणि सदस्य हे महावितरण कंपनीशी संबंधित असतात. यामुळे आयोगाकडून महावितरणच्या बाजूनेच एकतर्फी निकाल ते देत असतात. आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत ई-फायलिंग पद्धतीने ऑनलाइन हरकती मागविल्या आहेत. यामुळे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींची भेट घेऊन ही दरवाढ रद्द करावी, यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी वीज नियामक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन हकरती दाखल कराव्यात, असे आमचे आवाहन आहे. आधीच महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशातील अन्य राज्यांप्रमाणे वीजदराची आकारणी करावी, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग भारतीचे अध्यक्ष रवींद्र वैद्य म्हणाले की, अत्यंत कमी मार्जिनवर लघु उद्योग चालतो. आता नव्या दरवाढीमुळे आम्हाला उद्योग बंद करावे लागतील. याचे राज्याच्या विकासावर गंभीर परिणाम होतील. सौर ऊर्जेचा लोडही २० टक्क्यांवर देऊ देत नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद