शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव, राज्यातील उद्योग-व्यवसायाला शॉक देणारा

By बापू सोळुंके | Updated: February 13, 2023 20:38 IST

वीज ग्राहक समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष प्रताप होगाडे : २८ फेब्रुवारी रोजी राज्यभर वीज दरवाढ प्रस्तावाची होळी

औरंगाबाद : देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत आधीच महाराष्ट्रातील विजेचे दर सर्वाधिक आहेत. असे असताना महावितरणने त्यांचा भ्रष्टाचार, वीज चोऱ्या आणि अकार्यक्षमता लपविण्यासाठी वीज ग्राहकांच्या माथी ३७ टक्के वीज दरवाढ लादण्याचा प्रस्ताव सादर केला आहे, असा आरोप वीज ग्राहक व औद्योगिक संघटनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. या दरवाढीमुळे उद्योग, व्यवसाय बंद करावा लागेल किंवा दुसऱ्या राज्यात हलवावा, लागू शकतो, तसेच सामान्य वीज ग्राहक, शेतकरी यांच्यासाठी ही दरवाढ कंबरडे मोडणारी आहे. या दरवाढविरोधात २८ फेब्रुवारी रोजी राज्यभर महावितरणच्या प्रस्तावाची होळी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

होगाडे म्हणाले की, महावितरण कंपनीने ६७.६४४ कोटी रुपये तुटीची भरपाई करण्यासाठी सरासरी ३७ टक्के म्हणजेच प्रतियुनिट २ रुपये ५५ पैसे दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. राज्य वीज नियामक आयोगावरील अध्यक्ष आणि सदस्य हे महावितरण कंपनीशी संबंधित असतात. यामुळे आयोगाकडून महावितरणच्या बाजूनेच एकतर्फी निकाल ते देत असतात. आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत ई-फायलिंग पद्धतीने ऑनलाइन हरकती मागविल्या आहेत. यामुळे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींची भेट घेऊन ही दरवाढ रद्द करावी, यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी वीज नियामक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन हकरती दाखल कराव्यात, असे आमचे आवाहन आहे. आधीच महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशातील अन्य राज्यांप्रमाणे वीजदराची आकारणी करावी, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग भारतीचे अध्यक्ष रवींद्र वैद्य म्हणाले की, अत्यंत कमी मार्जिनवर लघु उद्योग चालतो. आता नव्या दरवाढीमुळे आम्हाला उद्योग बंद करावे लागतील. याचे राज्याच्या विकासावर गंभीर परिणाम होतील. सौर ऊर्जेचा लोडही २० टक्क्यांवर देऊ देत नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद