शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

पिकांवर फवारणी करताना औरंगाबाद जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांना बाधा; पिके वाचविण्यासाठी बळीराजाचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 1:31 PM

पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना तब्बल ३७ शेतकऱ्यांना बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी आणि अन्य कारणांमुळे पिकांवर कि डींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कीटकनाशके फवारली जातात.फवारणी करताना जहाल कीटकनाशकांची बळीराजालाच बाधा होत आहे

औरंगाबाद : दुष्काळ, कर्जाचा डोंगर आणि पावसाचा लहरीपणा अशा अनेक संकटांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव शेतातील पिके वाचविण्याच्या प्रयत्नात धोक्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना तब्बल ३७ शेतकऱ्यांना बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पावसाअभावी आणि अन्य कारणांमुळे पिकांवर कि डींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कीटकनाशके फवारली जातात. पिक ांवरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी नवनवीन कीटकनाशके वापरात. ही फवारणी शेतकऱ्यांसाठी जीवघेणी ठरू पाहत आहे. फवारणी करताना जहाल कीटकनाशकांची बळीराजालाच बाधा होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. पिकांवरील फवारणीनंतर अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात धाव घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. फवारणी करताना श्वासाद्वारे कीटकनाशक शरीरात जाते; परंतु ते वेळीच लक्षात येत नाही. उलटी, मळमळ अशा त्रासानंतर कीटकनाशकाची बाधा झाल्याचे निदर्शनास येत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तब्बल ३७ शेतकऱ्यांना फवारणीदरम्यान कीटकनाशकाची बाधा झाली. या सर्वांवर उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांत उपचार करण्यात आले. सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात सर्वाधिक १२ शेतकऱ्यांवर उपचार करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. ही सर्व आकडेवारी सरकारी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही अनेकांनी उपचार घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कीटकनाशकाची बाधा झाल्यानंतर उलटी, मळमळ, चक्कर येणे, डोळ्यांना जळजळ हा त्रास सुरू होतो. फवारणी करताना तोंडाला कापड लावले तर श्वास घेता येत नाही. बूट घातले, तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राज्यातील शेती पिकावर कीटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आरोग्य प्रमाणपत्र देण्याची सूचना करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत.जिल्ह्यातील परिस्थिती जिल्ह्यात फवारणीदरम्यान कीटकनाशकाची बाधा झाल्यानंतर उपचार घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या अशी आहे. गंगापूर उपजिल्हा रुग्णालय-३, वैजापूर उपजिल्हा रुग्णालय-१, सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय-१२, ग्रामीण रुग्णालय कन्नड-३,  फुलंब्री-१, पिशोर-३, अजिंठा-३, सोयगाव-६, पाचोड-२, करमाड-२, बिडकीन-१.

अशी घ्यावी खबरदारीपिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी. कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावेत. हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल, तोंडाला मास्क अथवा रुमाल या साहित्यांचा वापर करावा.  फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा नेमून दिलेल्या मापानुसार घ्यावी. कीटकनाशकाचे डबे सुरक्षितरीत्या नष्ट केले पाहिजेत.

काळजी घ्यावीपिकांवर कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. वाऱ्याची दिशा पाहून कीटकनाशक श्वासाद्वारे शरीरात जाणार नाही, याची काळजी घेण्यावर भर द्यावा. कीटकनाशकाची बाधा झाल्यास तात्काळ ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावेत.-एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रhospitalहॉस्पिटल