शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Waqf land Scam: मराठवाड्यात वक्फच्या ३५ हजार एकर जमिनी भूमाफियांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 12:10 IST

Waqf land Scam in Marathwada बोर्डाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे वक्फच्या मालमत्ता महसूल प्रशासनाला हाताशी धरून हडपण्याचा डाव विभागात रचला जात आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : मराठवाड्यातील वक्फ बोर्डाच्या सुमारे ३५ हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी कब्जा ( Waqf land Scam in Marathwada) केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. बोर्डाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे वक्फच्या मालमत्ता महसूल प्रशासनाला हाताशी धरून हडपण्याचा डाव विभागात रचला जात आहे (35,000 acres of Waqf land in Marathwada under the control of land mafia). बीडमध्ये ४०९ एकर जमीन हडपण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर वक्फच्या जमिनींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विभागात वक्फची ५५ हजार एकरच्या आसपास जमीन असल्याचा अंदाज आहे.

वक्फच्या जमिनींची नोंद सातबाऱ्यात येण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र वक्फकडून जाेपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत त्याची महसुली नोंद होत नाही. त्यामुळे वक्फ आणि महसूल यांच्या ‘मिलीभगत’ने या जमिनी हडपल्या जात असल्याचे दिसते आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात वक्फच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. उर्वरित जिल्ह्यात थोड्या-अधिक प्रमाणात आहेत. औरंगाबादमध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणच्या वक्फच्या जमिनींवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. याबाबत आजवर कोणताही सर्व्हे बोर्डाने केलेला नाही. मनुष्यबळ, पैसा, अधिकारांची वानवा असल्याने बोर्डाचे घोडे अडलेले आहे. याचा फायदा घेत अनेक ठिकाणच्या मोक्याच्या जमिनी हडपल्या जात आहेत.

मध्यंतरी वक्फच्या सीईओंनी महसूल विभागाला पत्र दिले होते. महसूलमधील यंत्रणेला हाताशी धरून जमिनी हडपल्या जात आहेत, असा सूर त्यांनी पत्रातून आळविला होता. त्या पत्रावरून महसूल प्रशासनात प्रचंड वादळ उठले असले तरी बीडमधील तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, महसूल सहायक, मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदारांसह १५ जणांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे सीईओंच्या पत्रात तथ्य असल्याचे स्पष्ट होत आहे.

वक्फच्या जमिनींची लवकरच पाहणीजमिनींची लवकरच पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर किती जमिनी हडपल्या गेल्या, त्याची माहिती समोर येईल. राज्यात ९७ हजार एकर जमीन आहे. त्यातील सुमारे ७० टक्के जमीन अतिक्रमित झाल्याचा अंदाज आहे. वक्फ बोर्डातील काही जणांना हाताशी धरूनच हा सगळा प्रकार सुरू आहे. जमिनी सांभाळण्याचे आव्हान आहे. कर्मचारीवर्ग, पैसा, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. त्यामुळे अतिक्रमणे वाढत आहेत.-अनिस शेख, सीईओ वक्फ बोर्ड औरंगाबाद.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाEnchroachmentअतिक्रमण