शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

Waqf land Scam: मराठवाड्यात वक्फच्या ३५ हजार एकर जमिनी भूमाफियांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 12:10 IST

Waqf land Scam in Marathwada बोर्डाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे वक्फच्या मालमत्ता महसूल प्रशासनाला हाताशी धरून हडपण्याचा डाव विभागात रचला जात आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : मराठवाड्यातील वक्फ बोर्डाच्या सुमारे ३५ हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी कब्जा ( Waqf land Scam in Marathwada) केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. बोर्डाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे वक्फच्या मालमत्ता महसूल प्रशासनाला हाताशी धरून हडपण्याचा डाव विभागात रचला जात आहे (35,000 acres of Waqf land in Marathwada under the control of land mafia). बीडमध्ये ४०९ एकर जमीन हडपण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर वक्फच्या जमिनींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विभागात वक्फची ५५ हजार एकरच्या आसपास जमीन असल्याचा अंदाज आहे.

वक्फच्या जमिनींची नोंद सातबाऱ्यात येण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र वक्फकडून जाेपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत त्याची महसुली नोंद होत नाही. त्यामुळे वक्फ आणि महसूल यांच्या ‘मिलीभगत’ने या जमिनी हडपल्या जात असल्याचे दिसते आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात वक्फच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. उर्वरित जिल्ह्यात थोड्या-अधिक प्रमाणात आहेत. औरंगाबादमध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणच्या वक्फच्या जमिनींवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. याबाबत आजवर कोणताही सर्व्हे बोर्डाने केलेला नाही. मनुष्यबळ, पैसा, अधिकारांची वानवा असल्याने बोर्डाचे घोडे अडलेले आहे. याचा फायदा घेत अनेक ठिकाणच्या मोक्याच्या जमिनी हडपल्या जात आहेत.

मध्यंतरी वक्फच्या सीईओंनी महसूल विभागाला पत्र दिले होते. महसूलमधील यंत्रणेला हाताशी धरून जमिनी हडपल्या जात आहेत, असा सूर त्यांनी पत्रातून आळविला होता. त्या पत्रावरून महसूल प्रशासनात प्रचंड वादळ उठले असले तरी बीडमधील तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, महसूल सहायक, मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदारांसह १५ जणांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे सीईओंच्या पत्रात तथ्य असल्याचे स्पष्ट होत आहे.

वक्फच्या जमिनींची लवकरच पाहणीजमिनींची लवकरच पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर किती जमिनी हडपल्या गेल्या, त्याची माहिती समोर येईल. राज्यात ९७ हजार एकर जमीन आहे. त्यातील सुमारे ७० टक्के जमीन अतिक्रमित झाल्याचा अंदाज आहे. वक्फ बोर्डातील काही जणांना हाताशी धरूनच हा सगळा प्रकार सुरू आहे. जमिनी सांभाळण्याचे आव्हान आहे. कर्मचारीवर्ग, पैसा, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. त्यामुळे अतिक्रमणे वाढत आहेत.-अनिस शेख, सीईओ वक्फ बोर्ड औरंगाबाद.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाEnchroachmentअतिक्रमण