शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
3
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
4
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
5
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
10
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
11
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
12
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
13
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
14
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
15
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
16
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
17
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
18
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
19
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
20
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका

Waqf land Scam: मराठवाड्यात वक्फच्या ३५ हजार एकर जमिनी भूमाफियांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 12:10 IST

Waqf land Scam in Marathwada बोर्डाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे वक्फच्या मालमत्ता महसूल प्रशासनाला हाताशी धरून हडपण्याचा डाव विभागात रचला जात आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : मराठवाड्यातील वक्फ बोर्डाच्या सुमारे ३५ हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी कब्जा ( Waqf land Scam in Marathwada) केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. बोर्डाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे वक्फच्या मालमत्ता महसूल प्रशासनाला हाताशी धरून हडपण्याचा डाव विभागात रचला जात आहे (35,000 acres of Waqf land in Marathwada under the control of land mafia). बीडमध्ये ४०९ एकर जमीन हडपण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर वक्फच्या जमिनींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विभागात वक्फची ५५ हजार एकरच्या आसपास जमीन असल्याचा अंदाज आहे.

वक्फच्या जमिनींची नोंद सातबाऱ्यात येण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र वक्फकडून जाेपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत त्याची महसुली नोंद होत नाही. त्यामुळे वक्फ आणि महसूल यांच्या ‘मिलीभगत’ने या जमिनी हडपल्या जात असल्याचे दिसते आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात वक्फच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. उर्वरित जिल्ह्यात थोड्या-अधिक प्रमाणात आहेत. औरंगाबादमध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणच्या वक्फच्या जमिनींवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. याबाबत आजवर कोणताही सर्व्हे बोर्डाने केलेला नाही. मनुष्यबळ, पैसा, अधिकारांची वानवा असल्याने बोर्डाचे घोडे अडलेले आहे. याचा फायदा घेत अनेक ठिकाणच्या मोक्याच्या जमिनी हडपल्या जात आहेत.

मध्यंतरी वक्फच्या सीईओंनी महसूल विभागाला पत्र दिले होते. महसूलमधील यंत्रणेला हाताशी धरून जमिनी हडपल्या जात आहेत, असा सूर त्यांनी पत्रातून आळविला होता. त्या पत्रावरून महसूल प्रशासनात प्रचंड वादळ उठले असले तरी बीडमधील तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, महसूल सहायक, मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदारांसह १५ जणांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे सीईओंच्या पत्रात तथ्य असल्याचे स्पष्ट होत आहे.

वक्फच्या जमिनींची लवकरच पाहणीजमिनींची लवकरच पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर किती जमिनी हडपल्या गेल्या, त्याची माहिती समोर येईल. राज्यात ९७ हजार एकर जमीन आहे. त्यातील सुमारे ७० टक्के जमीन अतिक्रमित झाल्याचा अंदाज आहे. वक्फ बोर्डातील काही जणांना हाताशी धरूनच हा सगळा प्रकार सुरू आहे. जमिनी सांभाळण्याचे आव्हान आहे. कर्मचारीवर्ग, पैसा, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. त्यामुळे अतिक्रमणे वाढत आहेत.-अनिस शेख, सीईओ वक्फ बोर्ड औरंगाबाद.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाEnchroachmentअतिक्रमण