शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

३५00 शिक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:36 IST

जिल्हा परिषदेत दोन वर्षांपासून सुरू असलेल्या बदल्या हव्यात, बदल्या नको, या वादावर आज अखेर एकदाचा पडदा पडला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ‘लॉगइन’वर सकाळपासून जवळपास साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश आले; पण मुख्य कार्यकारी अधिकारी बाहेरगावी असल्याने त्यांची बदल्यांना मान्यता मिळाली नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेत दोन वर्षांपासून सुरू असलेल्या बदल्या हव्यात, बदल्या नको, या वादावर आज अखेर एकदाचा पडदा पडला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ‘लॉगइन’वर सकाळपासून जवळपास साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश आले; पण मुख्य कार्यकारी अधिकारी बाहेरगावी असल्याने त्यांची बदल्यांना मान्यता मिळाली नव्हती. त्यामुळे बदल्यांच्या आदेशाबाबत शिक्षणाधिका-यांनी दिवसभर गोपनीयता बाळगली. दुसरीकडे, बदलीचे आदेश घेण्यासाठी सकाळपासून हजारो शिक्षकांनी जि. प. शिक्षण विभाग, सर्व पंचायत समित्यांमधील गटशिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर गर्दी केली होती. अखेर बदलीच्या आदेशाविनाच सायंकाळी शिक्षकांना घराकडे परतावे लागले.गेल्या वर्षापासून शिक्षकांच्या बदल्या गाजत आहेत. शैक्षणिक वर्षाच्या मध्यात बदल्या नकोत म्हणून नोव्हेंबरमध्ये बदल्यांची प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यानंतर जानेवारीपासूनच नव्याने बदल्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शिक्षकांमध्ये अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्र, असा वाद उफाळून आला. यामध्ये शिक्षकांचे बदली हवी- बदली नको, असे दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. या दोन्ही गटांनी राज्यभर मोर्चे काढून शक्तिप्रदर्शनही केले. असे असले तरी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काहीही झाले, तरी यंदा बदल्या करणारच, असा पवित्रा घेतला आणि आज अखेर औरंगाबाद जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत सुमारे ३ हजार ५०० शिक्षकांचे बदली आदेश मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या ई-मेलवर येऊन धडकले.हजारो शिक्षकांची बदल्यांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर या शासकीय कामकाजानिमित्त दोन दिवसांपासून दिल्ली येथे आहेत. त्यामुळे शिक्षणाधिका-यांना आज सोमवारी सायंकाळपर्यंत बदल्यांसाठी त्यांची मान्यता घेता आली नाही. त्यामुळे सकाळपासून बदली आदेश मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिक्षकांचा हिरमोड झाला. दरम्यान, ‘सीईओ’ कार्यालयाच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सकाळीच १५ ते २० कर्मचारी- अधिका-यांच्या पथकासह अज्ञातस्थळ गाठले. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या हिंदी विद्यालयात संपूर्ण पथकाने दिवसभर साडेतीन हजार शिक्षकांच्या बदली आदेशाच्या चार- चार प्रती डाऊनलोड केल्या. त्यावेळी शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी स्वत:चा मोबाईल दिवसभर बंद करून ठेवला होता. सोबतच्या कर्मचा-यांनाही बदल्यांसंबंधी गोपनीयता बाळगण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळे बदली झाली खरी; पण कोणत्या शाळेवर झाली. पती-पत्नी एकत्रीकरणाचा फायदा मिळाला की नाही, बदल्यांमुळे कोणते व किती शिक्षक विस्थापित झाले, हे शिक्षकांच्या मनातील सर्व प्रश्न दिवसभर अनुत्तरितच राहिले.शिक्षकाने बदलीसाठी २० शाळांचे पर्याय दिल्यानंतर त्यापैकी एकाही शाळेवर त्याची बदली झाली नाही. मात्र, त्याच्या जागेवर बदलीने दुसरा शिक्षक आल्यामुळे तो विस्थापित झाला आहे. आजच्या या बदली आदेशामध्ये जिल्ह्यातील सुमारे पाचशेहून अधिक शिक्षक विस्थापित झाल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.४विस्थापित शिक्षकांना संवर्ग-५ अंतर्गत पुन्हा २० शाळांचे पर्याय दिले जाणार आहेत. उद्यापासून पोर्टलवर लगेच विस्थापित शिक्षकांना आॅनलाईन पर्याय देता येतील. त्यानंतरही त्यांना दिलेल्या २० पर्यायांपैकी एकही शाळा मिळाली नाही, तर मग शिक्षण विभाग त्या शिक्षकाची कोणत्याही शाळेत रिक्त जागेवर बदली करणार आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदTeacherशिक्षक