शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

३५० अंगणवाड्यांना मिळेना हक्काचे छत !

By admin | Updated: July 24, 2014 00:12 IST

उस्मानाबाद : बालकांना पक्का निवारा मिळावा, यासाठी शासनाकडून कोट्यवधीचा निधी दिला जात आहे. मात्र निधी उपलब्ध होऊनही १४७ अंगणवाड्यांची बांधकामे विविध कारणांमुळे रखडली आहेत.

उस्मानाबाद : बालकांना पक्का निवारा मिळावा, यासाठी शासनाकडून कोट्यवधीचा निधी दिला जात आहे. मात्र निधी उपलब्ध होऊनही १४७ अंगणवाड्यांची बांधकामे विविध कारणांमुळे रखडली आहेत. तर दुसरीकडे जागा उपलब्ध होत नसल्याने २०० अंगणवाड्यांचे इमारत बांधकाम अडचणीत सापडले आहे. एकंदरीत जिल्ह््यातील ३५० अंगणवाड्यांना त्यांच्या हक्काचे छत अद्याप उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे या गावातील बालकांना समाजमंदिरामध्ये अथवा मंदिरात बसविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
जिल्ह््यामध्ये १० प्रकल्पांतर्गत सुमारे १ हजार ८७६ अंगणवाड्या सुरु आहेत. या अंगणवाड्यांमधून लाखो बालके ज्ञानाचे धडे गिरवत आहे. एकीकडे अंगणवाड्या डिजिटल करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. तर दुसरी हजारो बालकांना बसण्यासाठी पक्की इमारत नाही. उपलब्ध होईल त्या इमारतीमध्ये बसून ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहे. इमारतीची समस्या लक्षात घेऊन मागील दोन-तीन वर्षामध्ये शासनाकडून बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे जवळपास १४७ इमारतींची बांधकामे रखडली आहेत. पाणी नसल्यामुळे काही इमारतीची बांधकामे झाली नाहीत, असे सांगण्यात आले. काही ठिकाणी ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या आहेत. तर काही इमारतीचा निधी आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या जिल्हा बँकेत अडकला आहे. त्यामुळे या १४७ अंगणवाड्यांच्या बालकांना मिळेल त्या इमारतीत बसावे लागत आहे.
दरम्यान, २०० वर गावे अशी आहेत की, जेथे अंगणवाडीसाठी जागा मिळत नाही. गावामधील गावठाण जमिनी बक्कळ असतात. असे असतानाही अंगणवाडीसाठी जागा मिळत ही एक प्रकारची शोकांतिकाच आहे. त्यामुळे या मुलांनाही बसण्यासाठी समाजमंदिरे अथवा भाड्याच्या इमारतीचा आधार घ्यावा लागत आहे. १४७ अंगणवाड्यांची कामे विविध कारणांमुळे रखडली आहेत. याबाबत प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
कुपोषणमुक्तीवर परिणाम
शासनाच्या वतीने कुपोषणमुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळे उपक्रम अंगणवाडीच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत. मात्र ३५० अंगणवाड्यांना हक्काची इमारत नसल्यामुळे संबंधित अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांना गैरसोयीला तोंड द्यावे लागते. परिणामी त्यांना हे उपक्रम पूर्ण क्षमतेने राबविता येत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. याचाच परिणाम कुपोषण मुक्तगाव यासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमावर होत असल्याचेही नमूद केले.
लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची गरज
२०० वर गावांमध्ये अंगणवाड्यांसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे या गावातील बालकांना भाड्याच्या इमारतीत अथवा समाजमंदिरामध्ये बसून ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यानंतर मार्गी लागू शकतो. असे झाल्यास २०० वर गावांमध्ये अंगणवाड्यांच्या इमारती उभा राहू शकतात.