शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

30-30 Scam: डायरीत आहेत कोट्यावधीच्या नोंदी; ३०० जणांनी केली १० लाख ते २.५० कोटींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 13:50 IST

कोट्यवधी रुपयांच्या नोंदी असलेली डायरी पोलिसांच्या ताब्यात 

- राम शिनगारेऔरंगाबाद : राज्यात गाजत असलेल्या ३० : ३० योजनेत २० लाख रुपये ते २ कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक केलेल्या ३०० जणांच्या नावाची मुख्य आरोपी संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड याची डायरी ग्रामीण पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीमध्ये १ लाख रुपयांना प्रतिमहिना ७ ते तब्बल ६० हजार रुपयांचा परतावा देण्यात येत असल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बिडकीन पोलीस ठाण्यात ३०:३० योजनेत फसवणूक झालेल्या दौलत राठोड यांनी ३३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार २१ जानेवारी रोजी केली. त्यानुसार दाखल गुन्ह्यात पोलिसांनी घोटाळ्याचा मास्टरमाइंड संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यास सुरुवातीला ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत महत्त्वाचे धागेदारे हाती लागले आहेत. आरोपी संतोषने नातेवाइकाकडे ठेवलेली एक डायरी पोलिसांना प्राप्त झाली. या डायरीत तब्बल ३०० पेक्षा अधिक जणांच्या नावाचा समावेश आहे. प्रत्येक जणांच्या नावापुढे गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यांना देण्यात येणाऱ्या परताव्याची नोंद करण्यात आली आहे. या नोंदीमध्ये सर्वात कमी रक्कम ही १० लाख रुपये असून, सर्वाधिक रक्कम ही २ कोटी ५० लाख रुपयांपर्यंत असल्याची माहिती आहे. या एका डायरीतील नोंदीचा व्यवहार हा काही कोटींमध्ये पोहोचला असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी ज्योती ढोबळे या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांना राठोडच्या बीड बायपास रोडवरील घरातून एक डायरी प्राप्त झाली होती. त्यामध्ये माजी मंत्री, आमदारांसह बड्या-बड्या राजकीय नेत्यांची नोंद होती. त्या डायरीविषयी बोलताना राठोड याने भावाच्या लग्नाला आमंत्रण देण्यासाठी त्या नाेंदी केल्याचे स्पष्टीकरण दिले होते; मात्र त्यात तथ्य नसल्याचेही चौकशीत समोर आले.

नाशिक, कोलकाता येथे गुंतवणूकआरोपी संतोष राठोड याने शेतकऱ्यांकडून उकळलेल्या कोट्यवधी रुपयांमधून कोलकाता, नाशिक येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे. बिडकीन पोलिसांचे एक पथक नाशिकला त्याच्या मित्राला पकडण्यासाठी रविवारी गेले होते; मात्र राठोड यास अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर राठोडचा मित्र फरार झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय कोलकाता येथील काही बांधकाम व्यावसायिकांसोबतही गुंतवणूक केली आहे. याशिवाय पुणे, मुंबई, औरंगाबादमध्येही त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राजकीय नेत्यांनी गोळा केला पैसासंतोष राठोड याच्या ३०:३० योजनेमध्ये औरंगाबाद शहरातील काही हॉटेल व्यावसायिक,नगरसेवक, आमदारांनी गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील जि. प. सदस्य, आमदार, माजी आमदार, माजी मंत्र्यांसह विद्यमान मंत्र्यांचा समावेश असल्याचेही स्पष्ट झाले. हा सर्व पैसे ब्लॅक असून, त्यांच्या कोठेही नोंदी नाहीत. तसेच हा व्यवहार आरटीजीएसद्वारे झालेला नसल्यामुळे संबंधितांना तक्रारही देता येत नाही अन् पैसेही वसूल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय काही गावनेत्यांनी शेतकऱ्यांचे पैसे योजनेत गुंतवले आहेत.

३० आकड्यांचे आकर्षणसंतोष राठोड यास ३० आकड्यांचे प्रचंड आकर्षण आहे. त्याने या योजनेची सुरुवात ३० तारखेलाच केली होती. त्याशिवाय दुसरे लग्नही ३० तारखेलाच केले. अपत्यप्राप्तीही ३० तारखेलाच झालेली आहे. त्याशिवाय शेतकरी, राजकीय नेत्यांकडून गुंतवणुकीसाठी पैसे गोळा करण्यास ३० निष्ठावंतांची निवड केली होती. त्या सर्वांना मोबाइल नंबर, चारचाकी गाड्यांचे नंबरही त्याने ३० आकडा असणारेच दिल्याचे त्याच्या जवळच्या नातेवाइकांनी सांगितले.

समाजातील अधिकारी, उच्चभ्रूंवर नजरराठोडने नेमलेले एजंट हे स्वत:च्या समाजातील अधिकारी, उच्चभ्रूंच्या घरी जाऊन योजनेत गुंतवणूक केल्याचे फायदे सांगत होते. पैसे गुंतविल्यास अधिक परतावा मिळेल, असेही आमिष दाखविण्यात येत होते, असे एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने 'लोकमत' शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद