शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

कारागृहातून २९० गुन्हेगार बाहेर; शहरात चोऱ्या, घरफोड्यांसोबत गंभीर गुन्हे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 12:57 IST

खून आणि खुनाचा प्रयत्न, बलात्कारसारख्या गुन्ह्यातील जेलमधील आरोपींना कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने पॅरोलवर सोडले होते

ठळक मुद्देगुन्हे रोखण्यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात गस्त वाढविली आहे.कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येत आहे. 

- बापू सोळुंके

औरंगाबाद : कोरोना आणि न्यायालयाकडून  जामीन घेऊन शहर आणि औरंगाबाद ग्रामीण भागातील तब्बल २९० गुन्हेगार जेलमधून बाहेर आले आहेत. जेलमधून सुटताच गुन्हेगार सक्रिय झाल्याने लॉकडाऊन शिथिल होताच  शहरातील वाहनचोऱ्या, घरफोड्या आणि अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.

शहरातून दररोज सात ते आठ मोटारसायकल चोरीला जात आहेत. वाहन चोरीसोबत घरफोडी आणि उघड्या घरातून किमती माल पळविणे, मारहाण करून लुटणे, मंगळसूत्र चोरी, मोबाईल चोरी, तोतयागिरी करून फसवणूक करणे, आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे सतत घडत आहेत. यासोबत खून, खुनाचा प्रयत्न, किरकोळ कारणावरून शस्त्राने मारहाण करणे आदी गंभीर स्वरूपाच्या घटना वाढल्या आहेत. 

पोलिसांनी अटक केलेल्या खून आणि खुनाचा प्रयत्न, बलात्कारसारख्या गुन्ह्यातील जेलमधील  आरोपींना कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने पॅरोलवर सोडले होते, तर नव्याने पकडल्या जाणाऱ्या आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळत असल्यामुळे शहरातील २००, तर ग्रामीणमधील ९०, असे एकूण २९० गुन्हेगार सध्या जामीन घेऊन जेलबाहेर आले  आहेत. अनेक गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले. गुन्हे रोखण्यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात गस्त वाढविली आहे. कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस