शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडून १ लाख क्युसेक्सने विसर्ग,चार जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 19:46 IST

आवक लक्षात घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते, औरंगाबाद, जालना,परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पैठण (औरंगाबाद): जायकवाडी धरण काठोकाठ भरलेले असताना (९८.२४%) नाशिक व अहमदनगर जिल्ह्यासह जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी जायकवाडी धरणात १,२०, ००० क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाली. यामुळे धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह सर्व २७ दरवाजे ४ फूटाने वर उचलून धरणातून होणारा विसर्ग १ लाख १३ हजार १८४ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. 

आवक लक्षात घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवून औरंगाबाद ,जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना जायकवाडी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान विसर्ग दिड लाख क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात येणाची शक्यता धरण प्रशासनाने वर्तविल्याने शनिवारी सायंकाळी पैठणकरांचेही धाबे दणाणले. शहरात पाणी घुसेल या भितीने नदीकाठच्या भागासह व्यापाऱ्यांचीही धावपळ उडाली. शनिवारी दुपारनंतर गोदावरी नदी ४६००० व प्रवरा नदी ५७००० क्युसेक्सने भरून  जायकवाडी धरणात दाखल होण्यास प्रारंभ झाला यामुळे दुपारी पाच नंतर जायकवाडीतून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून सायंकाळी सात वाजेपर्यंत  १,१३,१८४ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. यामुळे पैठण शहरातील नदीकाठचा सखल भाग, मोक्षघाट पाण्याखाली आले. ग्रामीण भागातील गोदावरी नदीला येऊन मिळणाऱ्या छोट्या मोठ्या नद्या नाले व ओढ्यातून पाणी उलटे प्रवाही झाले. 

दरम्यान, विसर्ग वाढविण्यात आला तर पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या १४ गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातील भंडारदरा ५५३८, नीळवंडे १०९६०, ओझरवेअर २२१५१ व मुळा धरणातून १५००० क्युसेक्स पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला यामुळे प्रवरा नदीस महापूर  ( ५७८५४ क्युसेक्स) आला असून हे पाणी गतीने जायकवाडी धरणात दाखल होत होते. नाशिक जिल्ह्यात थोडा पावसाचा जोर कमी झाल्याने  दारणा ५९२४, कडवा ५००१, गंगापूर १६०८,पालखेड, ६३९४ व नांदुर मधमेश्वर वेअर मधून ३३५७६ क्युसेक्स विसर्ग तेथील धरण समुहातून करण्यात आले. परंतु नाशिक ते पैठण दरम्यान मुक्त पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदावरीसही (४६००० क्युसेक्स) पुर आला आहे दोन्ही नद्यांचे पाणी जायकवाडीत दाखल होण्यास प्रारंभ झाल्याने जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग करण्याचा निर्णय शनिवारी दुपारनंतर घेण्यात आला. 

धरण भरून ठेवण्याचा अट्टाहास.....दिड लाख क्युसेक्स व त्यापेक्षा अधिक विसर्ग केल्यास पैठण शहरासह तालुक्यातील गोदाकाठच्या गावास पुराचा फटका बसतो. पुरनियंत्रणासाठी धरणात जागा ठेवावी अशी मागणी पैठणकर सुरवातीपासून करत आले आहेत. परंतु केवळ धरण १००%  भरून ठेवण्याच्या जायकवाडी प्रशासनाच्या अट्टाहासातून पैठण शहरावर पुराची टांगती तलवार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दीड लाख क्युसेक्स पाणी सोडण्याचे पत्र समाजमाध्यमावर आल्यानंतर शहरातील व्यापारी धास्तावले.  दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे नियोजन व्यापाऱ्यांचे सुरू होते. दरम्यान, परिस्थिती लक्षात घेता नियंत्रित विसर्ग करावा अशी मागणी माजी राज्यमंत्री अनील पटेल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहीया, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, दत्ता गोर्डे, तुषार पाटील आदींनी केले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद