शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडून १ लाख क्युसेक्सने विसर्ग,चार जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 19:46 IST

आवक लक्षात घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते, औरंगाबाद, जालना,परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पैठण (औरंगाबाद): जायकवाडी धरण काठोकाठ भरलेले असताना (९८.२४%) नाशिक व अहमदनगर जिल्ह्यासह जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी जायकवाडी धरणात १,२०, ००० क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाली. यामुळे धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह सर्व २७ दरवाजे ४ फूटाने वर उचलून धरणातून होणारा विसर्ग १ लाख १३ हजार १८४ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. 

आवक लक्षात घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवून औरंगाबाद ,जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना जायकवाडी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान विसर्ग दिड लाख क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात येणाची शक्यता धरण प्रशासनाने वर्तविल्याने शनिवारी सायंकाळी पैठणकरांचेही धाबे दणाणले. शहरात पाणी घुसेल या भितीने नदीकाठच्या भागासह व्यापाऱ्यांचीही धावपळ उडाली. शनिवारी दुपारनंतर गोदावरी नदी ४६००० व प्रवरा नदी ५७००० क्युसेक्सने भरून  जायकवाडी धरणात दाखल होण्यास प्रारंभ झाला यामुळे दुपारी पाच नंतर जायकवाडीतून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून सायंकाळी सात वाजेपर्यंत  १,१३,१८४ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. यामुळे पैठण शहरातील नदीकाठचा सखल भाग, मोक्षघाट पाण्याखाली आले. ग्रामीण भागातील गोदावरी नदीला येऊन मिळणाऱ्या छोट्या मोठ्या नद्या नाले व ओढ्यातून पाणी उलटे प्रवाही झाले. 

दरम्यान, विसर्ग वाढविण्यात आला तर पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या १४ गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातील भंडारदरा ५५३८, नीळवंडे १०९६०, ओझरवेअर २२१५१ व मुळा धरणातून १५००० क्युसेक्स पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला यामुळे प्रवरा नदीस महापूर  ( ५७८५४ क्युसेक्स) आला असून हे पाणी गतीने जायकवाडी धरणात दाखल होत होते. नाशिक जिल्ह्यात थोडा पावसाचा जोर कमी झाल्याने  दारणा ५९२४, कडवा ५००१, गंगापूर १६०८,पालखेड, ६३९४ व नांदुर मधमेश्वर वेअर मधून ३३५७६ क्युसेक्स विसर्ग तेथील धरण समुहातून करण्यात आले. परंतु नाशिक ते पैठण दरम्यान मुक्त पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदावरीसही (४६००० क्युसेक्स) पुर आला आहे दोन्ही नद्यांचे पाणी जायकवाडीत दाखल होण्यास प्रारंभ झाल्याने जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग करण्याचा निर्णय शनिवारी दुपारनंतर घेण्यात आला. 

धरण भरून ठेवण्याचा अट्टाहास.....दिड लाख क्युसेक्स व त्यापेक्षा अधिक विसर्ग केल्यास पैठण शहरासह तालुक्यातील गोदाकाठच्या गावास पुराचा फटका बसतो. पुरनियंत्रणासाठी धरणात जागा ठेवावी अशी मागणी पैठणकर सुरवातीपासून करत आले आहेत. परंतु केवळ धरण १००%  भरून ठेवण्याच्या जायकवाडी प्रशासनाच्या अट्टाहासातून पैठण शहरावर पुराची टांगती तलवार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दीड लाख क्युसेक्स पाणी सोडण्याचे पत्र समाजमाध्यमावर आल्यानंतर शहरातील व्यापारी धास्तावले.  दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे नियोजन व्यापाऱ्यांचे सुरू होते. दरम्यान, परिस्थिती लक्षात घेता नियंत्रित विसर्ग करावा अशी मागणी माजी राज्यमंत्री अनील पटेल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहीया, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, दत्ता गोर्डे, तुषार पाटील आदींनी केले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद