शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

१४ कोटीला २७ कोटींचा पीकविमा

By admin | Updated: May 19, 2015 00:50 IST

बाळासाहेब जाधव , लातूर वर्षभरात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही़ अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करून लातूर जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार २८७ शेतकऱ्यांनी

बाळासाहेब जाधव , लातूरवर्षभरात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही़ अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करून लातूर जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार २८७ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी पीकविम्यापोटी १४ कोटी ४७ लाख रूपये बँकेमध्ये भरले़ त्या पीकविम्यापोटी लातूर जिल्ह्याला २७ कोटी ३४ लाख रूपये मंजूर झाले आहेत़ या मंजूर झालेल्या पीकविम्याबाबत जिल्हा प्रशासन मात्र अद्यापही अनभिज्ञच असल्याने शेतकरी नाराज आहेत.लातूर , चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, उदगीर, जळकोट, रेणापूर, चाकूर, अहमदपूर या तालुक्यात अल्प पर्जन्यमान झाले आहे़ अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली़ पुन्हा उघडीप दिल्याने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख ९९ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रासाठी ४ लाख ८० हजार २८७ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी पीकविम्यापोटी १४ कोटी ४७ लाख रूपये बँकेत भरले होते़ त्या पीकविम्यापोटी लातूर जिल्ह्याला २७ कोटी ३४ लाख रूपये मंजूर झाले आहेत़ परंतु, या पीकविम्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे मात्र राष्ट्रीय कृषी पीकविम्याबाबत मात्र माहितीच मिळालेली नाही़ त्यामुळे राष्ट्रीय पीकविम्याबाबत हे दोन्ही विभाग मात्र अनभिज्ञच असल्याचे दिसून येत आहे़ जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत प्राधान्याने हा राष्ट्रीय कृषी पीकविमा भात, खरीप ज्वार, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ऊसखोड या पिकासाठी असून तो पीकविमा भरण्याचे अवाहन करण्यात आले होते़ तर मका, नाचणी, कांदा आदी पिकांना यातून वगळण्यात आलेले होते़ मंजूर पीकविम्यात मूग, उडीद, कापूस व ज्वारी या पिकांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे़ शासन व प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांमध्येही गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे़ त्यातच दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी पीकविम्यापोटी २७ कोटी ३४ लाख रूपये मंजूर करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मात्र अद्यापही अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे़मंजूर पीकविम्याच्या रकमेबाबत तंत्रअधिकारी जी़टी थोंटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लातूर जिल्ह्यात ४ लाख ८० हजार ८४० शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पीकविमा भरला. परंतु, शासनाने किती पीकविमा मंजूर केला, याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाशी कुठलाही पत्रव्यवहार झाला नाही. त्यामुळे राष्ट्रीय कृषी पीकविम्याची मदत आली कुठे, असा प्रश्न त्यांच्याकडूनच केला जात आहे़ दरम्यान, कृषी विभाग व महसूल विभागाकडेही राष्ट्रीय पीकविम्याच्या माहितीबाबत अनभिज्ञता होती. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे.