शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

१४ कोटीला २७ कोटींचा पीकविमा

By admin | Updated: May 19, 2015 00:50 IST

बाळासाहेब जाधव , लातूर वर्षभरात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही़ अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करून लातूर जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार २८७ शेतकऱ्यांनी

बाळासाहेब जाधव , लातूरवर्षभरात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही़ अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करून लातूर जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार २८७ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी पीकविम्यापोटी १४ कोटी ४७ लाख रूपये बँकेमध्ये भरले़ त्या पीकविम्यापोटी लातूर जिल्ह्याला २७ कोटी ३४ लाख रूपये मंजूर झाले आहेत़ या मंजूर झालेल्या पीकविम्याबाबत जिल्हा प्रशासन मात्र अद्यापही अनभिज्ञच असल्याने शेतकरी नाराज आहेत.लातूर , चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, उदगीर, जळकोट, रेणापूर, चाकूर, अहमदपूर या तालुक्यात अल्प पर्जन्यमान झाले आहे़ अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली़ पुन्हा उघडीप दिल्याने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख ९९ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रासाठी ४ लाख ८० हजार २८७ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी पीकविम्यापोटी १४ कोटी ४७ लाख रूपये बँकेत भरले होते़ त्या पीकविम्यापोटी लातूर जिल्ह्याला २७ कोटी ३४ लाख रूपये मंजूर झाले आहेत़ परंतु, या पीकविम्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे मात्र राष्ट्रीय कृषी पीकविम्याबाबत मात्र माहितीच मिळालेली नाही़ त्यामुळे राष्ट्रीय पीकविम्याबाबत हे दोन्ही विभाग मात्र अनभिज्ञच असल्याचे दिसून येत आहे़ जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत प्राधान्याने हा राष्ट्रीय कृषी पीकविमा भात, खरीप ज्वार, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ऊसखोड या पिकासाठी असून तो पीकविमा भरण्याचे अवाहन करण्यात आले होते़ तर मका, नाचणी, कांदा आदी पिकांना यातून वगळण्यात आलेले होते़ मंजूर पीकविम्यात मूग, उडीद, कापूस व ज्वारी या पिकांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे़ शासन व प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांमध्येही गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे़ त्यातच दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी पीकविम्यापोटी २७ कोटी ३४ लाख रूपये मंजूर करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मात्र अद्यापही अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे़मंजूर पीकविम्याच्या रकमेबाबत तंत्रअधिकारी जी़टी थोंटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लातूर जिल्ह्यात ४ लाख ८० हजार ८४० शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पीकविमा भरला. परंतु, शासनाने किती पीकविमा मंजूर केला, याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाशी कुठलाही पत्रव्यवहार झाला नाही. त्यामुळे राष्ट्रीय कृषी पीकविम्याची मदत आली कुठे, असा प्रश्न त्यांच्याकडूनच केला जात आहे़ दरम्यान, कृषी विभाग व महसूल विभागाकडेही राष्ट्रीय पीकविम्याच्या माहितीबाबत अनभिज्ञता होती. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे.