शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात २६ टक्के उपयुक्त जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 11:03 IST

मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजण्याची शक्यता आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून मोठ्या, मध्यम व लघु, अशा ८६७ प्रकल्पांत २६.९० टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

ठळक मुद्देउन्हाळा गांजणार : ३१६ टँकरने पाणीपुरवठा, ५९५ विहिरींचे अधिग्रहण

औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजण्याची शक्यता आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून मोठ्या, मध्यम व लघु, अशा ८६७ प्रकल्पांत २६.९० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. ३१६ पर्यंत टँकरचा आकडा गेला असून, ५९५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २५५ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात २५५ गावांत २१६ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, प्रशासनाने ५९५ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जिल्हानिहाय टंचाई आराखड्याचे आदेश विभागीय पातळीवरून देण्यात आले आहेत. टंचाई आराखडा लवकरच अंतिम होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. १९० गावांत २३१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

यंदा शेती व इतर उपयोगासाठी जायकवाडीतून ८ आवर्तने देणे सध्या शक्य आहे. तिसऱ्या आवर्तनाचा अंतिम टप्पा संपत आला आहे. बंधाºयांची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना विभागीय प्रशासनाने केल्या आहेत. विभागातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाला. त्यामुळे या उन्हाळ्यात विभागातील सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाईची शक्यता निर्माण होऊ शकते. टंचाई आराखड्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाला प्रशासकीय पातळीवरून सूचना दिल्या आहेत.

८६७ प्रकल्पांत २६ टक्के पाणीविभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये ३०.५५ टक्केजलसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्प असून, त्यामध्ये २६.२९ टक्के, ७४६ लघु प्रकल्पांत १५.६२ टक्के, तर ३५ बंधाºयांमध्ये ४४ टक्के जलसाठा आहे. एकूण ८६७ प्रकल्पांत २६.९० टके जलसाठा आहे. मोठ्या प्रकल्पांतील ४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यातील तीन प्रकल्प नांदेड, तर १ प्रकल्प परभणी जिल्ह्यातील आहे. औरंगाबादमधील जायकवाडीत ७५ टक्के पाणी आहे. २५ ते ५० टक्क्यांदरम्यान पाणीसाठा हिंगोलीतील एका प्रकल्पात आहे. उस्मानाबादमधील दोन आणि परभणीतील एका मोठ्या प्रकल्पात ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. बीडमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

टँकरची सद्य:स्थिती अशीजिल्हा गावे टँकरऔरंगाबाद १९० २३१जालना ३५ ४४परभणी ०७ ०९हिंगोली ०२ ०२नांदेड २१ ३०बीड ०० ००लातूर ०० ००उस्मानाबाद ०० ००एकूण २५५ ३१६

टॅग्स :water shortageपाणीकपातMarathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाई