शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

मराठवाड्यात २६ टक्के उपयुक्त जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 11:03 IST

मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजण्याची शक्यता आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून मोठ्या, मध्यम व लघु, अशा ८६७ प्रकल्पांत २६.९० टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

ठळक मुद्देउन्हाळा गांजणार : ३१६ टँकरने पाणीपुरवठा, ५९५ विहिरींचे अधिग्रहण

औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजण्याची शक्यता आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून मोठ्या, मध्यम व लघु, अशा ८६७ प्रकल्पांत २६.९० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. ३१६ पर्यंत टँकरचा आकडा गेला असून, ५९५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २५५ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात २५५ गावांत २१६ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, प्रशासनाने ५९५ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जिल्हानिहाय टंचाई आराखड्याचे आदेश विभागीय पातळीवरून देण्यात आले आहेत. टंचाई आराखडा लवकरच अंतिम होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. १९० गावांत २३१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

यंदा शेती व इतर उपयोगासाठी जायकवाडीतून ८ आवर्तने देणे सध्या शक्य आहे. तिसऱ्या आवर्तनाचा अंतिम टप्पा संपत आला आहे. बंधाºयांची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना विभागीय प्रशासनाने केल्या आहेत. विभागातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाला. त्यामुळे या उन्हाळ्यात विभागातील सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाईची शक्यता निर्माण होऊ शकते. टंचाई आराखड्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाला प्रशासकीय पातळीवरून सूचना दिल्या आहेत.

८६७ प्रकल्पांत २६ टक्के पाणीविभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये ३०.५५ टक्केजलसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्प असून, त्यामध्ये २६.२९ टक्के, ७४६ लघु प्रकल्पांत १५.६२ टक्के, तर ३५ बंधाºयांमध्ये ४४ टक्के जलसाठा आहे. एकूण ८६७ प्रकल्पांत २६.९० टके जलसाठा आहे. मोठ्या प्रकल्पांतील ४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यातील तीन प्रकल्प नांदेड, तर १ प्रकल्प परभणी जिल्ह्यातील आहे. औरंगाबादमधील जायकवाडीत ७५ टक्के पाणी आहे. २५ ते ५० टक्क्यांदरम्यान पाणीसाठा हिंगोलीतील एका प्रकल्पात आहे. उस्मानाबादमधील दोन आणि परभणीतील एका मोठ्या प्रकल्पात ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. बीडमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

टँकरची सद्य:स्थिती अशीजिल्हा गावे टँकरऔरंगाबाद १९० २३१जालना ३५ ४४परभणी ०७ ०९हिंगोली ०२ ०२नांदेड २१ ३०बीड ०० ००लातूर ०० ००उस्मानाबाद ०० ००एकूण २५५ ३१६

टॅग्स :water shortageपाणीकपातMarathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाई