शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सुट्यांमुळे तुंबले तब्बल २५ हजार धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:19 AM

सलग आलेल्या तीन सुट्यांमुळे बँकांमधील व्यवहार खोळंबले. निम्मे एटीएमसुद्धा रिकामे झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सलग आलेल्या तीन सुट्यांमुळे बँकांमधील व्यवहार खोळंबले. निम्मे एटीएमसुद्धा रिकामे झाले होते. बुधवारी बँक उघडताच खातेदारांनी एकच गर्दी केली. आता पुन्हा गुरुवारी (दि.१७)‘पतेती’ असल्याने बँकांना सुटी राहणार आहे. मागील शुक्रवारी क्लिअरिंगसाठी दाखल केलेले सुमारे २५ हजार धनादेश सुट्यांमुळे अजूनही वटले नाहीत. रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात बँकेला सव्वाशे ते दीडशे कोटी पाठविल्याने सध्या पैशाची अडचण मात्र नाही.मागील आठवड्यात १२ आॅगस्टला दुसरा शनिवार, १३ आॅगस्टला रविवार असल्याने दोन दिवस बँका बंद होत्या. त्यानंतर १४ रोजी सोमवारी बँका सुरू होत्या. पुन्हा मंगळवारी १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सुटी आली होती. अनेकांनी सुट्यांमुळे सहलीला जाण्याचे बेत आखले होते. अनेक सरकारी कर्मचारी, अधिकाºयांनी सोमवारची सुटी टाकली होती. यामुळे त्यांना सलग चार दिवस सुट्या मिळाल्या. सुट्यांमुळे बँकाही बंद राहणार असल्यामुळे अनेकांनी एटीएममधून पैसे काढणे सुरू केले. परिणामी रविवारी शहरातील निम्म्यापेक्षा अधिक एटीएम रिकामे झाले. सोमवारी बँका सुरू होत्या, पण एटीएममध्ये पुरेशी रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे त्या दिवशी सायंकाळपर्यंत २५० पेक्षा अधिक एटीएममधील रक्कम संपली होती. एटीएममध्ये रक्कम नसल्याने अनेकांना मंगळवारी ध्वजवंदनानंतर सहलीला जाण्याचा बेत रद्द करावा लागला. सहलीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या लोकांचेही तेथील एटीएम रिकामे झाल्याने हाल झाले.बुधवारी सकाळी बँका सुरू झाल्या तेव्हा काही मिनिटांतच काऊंटरसमोर रांगा लागल्या. मात्र, पगारी आठवडा संपल्याने कमीच गर्दी दिसून आली. काऊंटरवर खातेदारांना आवश्यक रक्कम मिळत होती. यात १०० व ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक होते.एका बँक अधिकाºयाने सांगितले की, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने ११ आॅगस्टला एसबीआयला ९६ कोटी रुपये तर अन्य तीन बँकांच्या करन्सीचेस्टला सर्व मिळून सुमारे दीडशे कोटी रुपये पाठविले. यामुळे शुक्रवारी बहुतांश एटीएममध्ये मुबलक पैसे होते. पण पैसे काढणाºयांची संख्या एवढी होती की, रविवारी एटीएम रिकामे झाले. शुक्रवारी सुमारे २५ हजार धनादेश बँकांमध्ये जमा झाले. ते आज सायंकाळपर्यंत वटविण्याचे काम सुरू होते. गुरुवारी सुटी आली आहे. त्यामुळे ज्यांनी मागील शुक्रवारी धनादेश बँकेत जमा केले, ते १८ रोजीच म्हणजे आठवडाभरानंतर संबंधितांच्या खात्यात जमा होतील. मात्र, ज्यांनी बुधवारी धनादेश जमा केले ते शुक्रवारी सायंकाळपर्यंत वटविले जातील.