शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

प्रत्येक ठाण्याचे २५ टक्के पाेलीस आता गस्तीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:39 IST

औरंगाबाद  : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येक ठाण्यातील २५ टक्के पोलिसांनी रस्त्यावर गस्त घालावी , असा स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी ठाणेदारांना दिला आहे.  लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून शहरात वाहनचोरी, घरफोडी, दुकानफोडी आणि वाटमारीचे प्रकार वाढले आहेत. सोनसाखळी चोरी रोखण्यात पोलिसांना यश आले असले तरी मंगळसूत्र चोरटे पुन्हा सक्रिय होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर डॉ. गुप्ता यांनी रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती वाढविण्याचा ...

औरंगाबाद : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येक ठाण्यातील २५ टक्के पोलिसांनी रस्त्यावर गस्त घालावी, असा स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी ठाणेदारांना दिला आहे. 

लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून शहरात वाहनचोरी, घरफोडी, दुकानफोडी आणि वाटमारीचे प्रकार वाढले आहेत. सोनसाखळी चोरी रोखण्यात पोलिसांना यश आले असले तरी मंगळसूत्र चोरटे पुन्हा सक्रिय होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर डॉ. गुप्ता यांनी रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांत कार्यरत मनुष्यबळाच्या सुमारे २५ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना गस्तीचे  काम सोपविले  जात आहे. दोन दिवसांपासून काही पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली आहे.

शहरात चार्ली पोलिसांची आणि बीट मार्शलची गस्त बंद करून बीट हवालदारांवर गस्त सोपविण्यात आली होती. आता गस्तीकरिता स्वतंत्र कर्मचारी देण्यात येत असल्याने त्यांच्यावर अन्य जबाबदारी नसेल. यामुळे ते निर्धोकपणे गस्त करू शकतील.  यातील काही  कर्मचारी दुचाकीने  तर काही पोलीस मोबाईल व्हॅन आणि जीपमधून गस्त घालतील. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद