शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

वर्षभरात औरंगाबादमध्ये झाले २४ खून तर ६१२ जण जखमी; हाणामारीच्या ५०० घटनात समोर आली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 11:50 IST

शहराच्या विस्तारीकरणासोबतच शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. असे असले तरी वर्षभराच्या कालावधीत शहरात तब्बल २४ जणांचे खून झाले आणि हाणामारीच्या शेकडो घटनांमध्ये ६१२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली.

ठळक मुद्दे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अकरा महिन्यांच्या कालावधीत हाणामारीच्या ५०० हून अधिक घटना घडल्या. किरकोळ कारणावरून तब्बल २४ खून शहरात झाले. या घटनांमध्ये ६१२ जण जखमी झाल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : शहराच्या विस्तारीकरणासोबतच शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. असे असले तरी वर्षभराच्या कालावधीत शहरात तब्बल २४ जणांचे खून झाले आणि हाणामारीच्या शेकडो घटनांमध्ये ६१२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत खून आणि हाणामारीच्या घटनांमध्ये घट झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. 

याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहराच्या तिन्ही बाजूने वाळूज, चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन या एमआयडीसी आहे. यासोबत शेंद्रा पंचतारांकित वसाहत आणि नव्याने येऊ घातलेला दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे शहराच्या लोकसंख्येत भर पडणार आहे. उद्योग-व्यवसायानिमित्त देश-विदेशातील लोक औरंगाबादेत येत असतात. औद्योगिकरणासोबतच शहरातील गुन्हेगारी मागील पाच वर्षांच्या तुलनेत वाढली आहे. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत खून आणि हाणामारीसारख्या घटना घटल्याचा दावा शहर पोलिसांनी केला.

कट रचून आणि सुपारी देऊन हत्या करण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. पती सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने शासकीय पदावरील एका महिला अधिकार्‍याने बँक अधिकारी असलेल्या पतीची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी शहरात घडली. अशा मोजक्या घटना सोडल्या, तर किरकोळ कारणावरून तब्बल २४ खून शहरात झाले. 

हाणामारीच्या घटना मात्र रोज घडत आहेत.  वाहनाला कट का मारला, रागाने पाहणे, नळाच्या पाण्यावरून शेजार्‍यांतील भांडण, गुंडागर्दी करून हाणामारी होण्याचे प्रकार मात्र वाढले आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अकरा महिन्यांच्या कालावधीत हाणामारीच्या ५०० हून अधिक घटना घडल्या. या घटनांमध्ये ६१२ जण जखमी झाल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

अनेक प्रकरणांत तडजोड

याविषयी सूत्रांकडून समजले की, शहरात रोज सहा ते सात हाणामारीच्या घटना घडतात. या हाणामारीत जखमी झालेले उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात आणि तेथून पुढे तडजोडीला सुरुवात होते.  प्रकरण पोलिसांत गेले तर कोर्ट-कचेरीच्या चकरा माराव्या लागतील, पुन्हा पोलीस रेकॉर्ड तयार होऊन तरुणांच्या नोकरीसाठी ते अडसर ठरू शकते, ही बाब लक्षात घेऊन प्रकरण आपसात तडजोडीने मिटविले जाते. बर्‍याचदा पोलीसही अशावेळी मदत करतात.