शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

शहरातील कचरा उचलण्याचे २११ कोटींचे कंत्राट अडकले चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:07 IST

इंदूरच्या धर्तीवर महापालिका शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देत आहे.

ठळक मुद्दे स्थायी समितीत ठराव एक महिन्यापासून पडून  आता उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वी बैठक

औरंगाबाद : शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे कंत्राट बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देण्याचा २११ कोटी रुपयांचा प्रस्ताव शुक्रवारच्या स्थायी समितीची बैठकीतही मंजूर होऊ शकला नाही.

हा प्रस्ताव मागील एक महिन्यापासून स्थायी समितीत पडून आहे.  बैठक सुरु होताच दुसऱ्या मिनिटाला तहकूबही करण्यात आली. आता २३ आॅक्टोबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादेत येत असून त्यापूर्वी म्हणजेच २२ आॅक्टोबरला स्थायीची बैठक होणार आहे. समितीमधील सदस्यांसोबत २११ कोटींच्या कामावरून अद्याप ‘चर्चा’ पूर्ण झालेली नाही. सदस्यांचे पूर्णपणे समाधान झाल्यावर अंतिम निर्णय होणार आहे.

इंदूरच्या धर्तीवर महापालिका शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देत आहे. एकूण ७ वर्षांसाठीचा हा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. एक टन कचरा कंपनीने उचलल्यास १८६३ रुपये मनपा देणार आहे. वर्षाला ३० कोटींचा हा खर्च आहे. कंपनी ७५ हातगाड्या, ३०० अ‍ॅटो टिप्पर, ३० हायड्रोलिक टिप्पर, ९ कॉम्पॅक्टर, गरजेप्रमाणे एक्सवेटर आदी यंत्रणा उभी करणार आहे. कचरा उचलण्यासाठी संपूर्ण मनुष्यबळही कंपनीकडेच राहणार आहे.

मागील महिन्यातच मनपा प्रशासनाने प्रस्ताव अंतिम करून स्थायी समितीला सादर केला. समितीमधील सदस्यांचे काही मुद्यांवर एकमत झाले नाही. कंपनीला एक वर्षासाठी काम द्यावे की, सात वर्षांसाठी यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. शनिवारी, रविवारी सदस्य सभापतींसोबत चर्चा करणार आहेत. चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी औरंगाबादेत पदाधिकारी मेळावा घेणार आहेत. त्यापूर्वी एक दिवस अगोदर स्थायीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.  

दोन मिनिटांमध्ये बैठक तहकूबशुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजता स्थायी समितीची बैठक सुरू झाली. समितीमधील सदस्य पूनम बमणे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने बैठक पुढे ढकलण्यात यावी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, अशी मगणी गजानन बारवाल, स्वाती नागरे, शिल्पाराणी वाडकर यांनी केली. श्रद्धांजली वाहण्यात आल्यावर बैठक सोमवारी सकाळी ११.३० वाजता घेण्यात येईल, असे सभापती राजू वैद्य यांनी जाहीर केले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना