शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी २०६२ कोटींचा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 14:28 IST

विकास निर्देशांकात मागे असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला सूत्राबाहेर जाऊन वाढीव निधी

ठळक मुद्देमराठवाड्यातील ८ जिल्ह्यांच्या नियोजन समित्या सर्वाधिक ३२५ कोटी निधी औरंगाबाद जिल्ह्याला 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी २ हजार ६२ कोटी ५० लाखांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीला सदरील निधी पुढील आर्थिक वर्षासाठी दिला जाईल. हा निधी परत जाणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला अजित पवार यांनी बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला दिला. अर्थमंत्र्यांनी विभागाची नियोजन अनुषंगाने आढावा बैठक विभागीय आयुक्तालयात घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

अर्थमंत्री पवार म्हणाले, ९ हजार कोटींचा गेल्या वेळी नियतव्यय होता. यावर्षी ९ हजार ५०० कोटींचा नियतव्यय असेल. जास्तीचा निधी द्यायचा होता. परंतु शेतकऱ्यांसाठी २ लाखांपर्यंतची कर्जमाफी हा महत्त्वाचा कार्यक्र म आहे. ३१ मार्चपर्यंत हा कार्र्यक्रम संपेल असे वाटत नाही. ६० टक्क्यांपर्यंत कार्यक्रम जाईल. शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला रक्कम द्यायची आहे, त्यासाठी निधी लागेल. २ लाखांपेक्षा ज्यांचे कर्ज आहे, त्यांच्यासाठीही मदत पॅकेजसाठी समिती निर्णय घेईल. कॅ बिनेटसमोर समितीचा अहवाल येईल. दरवर्षी कर्जफेड करणारे शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी काही मदत देण्यासाठी सानुग्रहाचा विचार केला जाईल. सध्या देश मंदीतून वाटचाल करतो आहे. नागरिक वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेले आहेत. गुंतवणूकदारांना येण्यासाठी वातावरण निर्माण करावे लागेल. तसे आकर्षित बजेट केंद्राने द्यावे, अशी अपेक्षा आहे. सारथीत ज्यांनी चुका केल्या, त्यांची चौकशी करू. मानव विकास निर्देशांकात उस्मानाबाद मागे आहे. ठरलेलेल्या सूत्रांच्या बाहेर जाऊन अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे.बैठकीला नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, औरंगाबादचे सुभाष देसाई, बीडचे धनंजय मुंडे, परभणीचे नवाब मलिक, जालन्याचे राजेश टोपे यांच्यासह आमदार, खासदार, विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.  

पोलीस भरतीसह डॉक्टर, नर्सेसची भरती करण्याचा विचार ३१ मार्च २०२० पर्यंत विभागाला १ हजार ५३ कोटी रुपयांची तरतूद आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी २ हजार ६४ कोटींपर्यंत नियोजनाचा आकडा गेला आहे. सर्वाधिक निधी औरंगाबाद जिल्ह्याला ३२५ कोटी मिळणार आहे. नांदेडला ३१५ तर बीडला ३०० कोटींपर्यंत तरतूद होणार आहे. हिंगोली जिल्ह्याला १२५ कोटींची तरतूद करण्यात आली. ८ हजार पोलिसांची भरती करायची आहे. डॉक्टर, नर्सेसची भरती करण्याचा विचार आहे. सारथी संस्थेची जबाबदारी आयएएस अधिकाऱ्यांवर देणार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :fundsनिधीMarathwadaमराठवाडाAjit Pawarअजित पवार