शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी २०६२ कोटींचा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 14:28 IST

विकास निर्देशांकात मागे असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला सूत्राबाहेर जाऊन वाढीव निधी

ठळक मुद्देमराठवाड्यातील ८ जिल्ह्यांच्या नियोजन समित्या सर्वाधिक ३२५ कोटी निधी औरंगाबाद जिल्ह्याला 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी २ हजार ६२ कोटी ५० लाखांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीला सदरील निधी पुढील आर्थिक वर्षासाठी दिला जाईल. हा निधी परत जाणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला अजित पवार यांनी बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला दिला. अर्थमंत्र्यांनी विभागाची नियोजन अनुषंगाने आढावा बैठक विभागीय आयुक्तालयात घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

अर्थमंत्री पवार म्हणाले, ९ हजार कोटींचा गेल्या वेळी नियतव्यय होता. यावर्षी ९ हजार ५०० कोटींचा नियतव्यय असेल. जास्तीचा निधी द्यायचा होता. परंतु शेतकऱ्यांसाठी २ लाखांपर्यंतची कर्जमाफी हा महत्त्वाचा कार्यक्र म आहे. ३१ मार्चपर्यंत हा कार्र्यक्रम संपेल असे वाटत नाही. ६० टक्क्यांपर्यंत कार्यक्रम जाईल. शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला रक्कम द्यायची आहे, त्यासाठी निधी लागेल. २ लाखांपेक्षा ज्यांचे कर्ज आहे, त्यांच्यासाठीही मदत पॅकेजसाठी समिती निर्णय घेईल. कॅ बिनेटसमोर समितीचा अहवाल येईल. दरवर्षी कर्जफेड करणारे शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी काही मदत देण्यासाठी सानुग्रहाचा विचार केला जाईल. सध्या देश मंदीतून वाटचाल करतो आहे. नागरिक वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेले आहेत. गुंतवणूकदारांना येण्यासाठी वातावरण निर्माण करावे लागेल. तसे आकर्षित बजेट केंद्राने द्यावे, अशी अपेक्षा आहे. सारथीत ज्यांनी चुका केल्या, त्यांची चौकशी करू. मानव विकास निर्देशांकात उस्मानाबाद मागे आहे. ठरलेलेल्या सूत्रांच्या बाहेर जाऊन अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे.बैठकीला नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, औरंगाबादचे सुभाष देसाई, बीडचे धनंजय मुंडे, परभणीचे नवाब मलिक, जालन्याचे राजेश टोपे यांच्यासह आमदार, खासदार, विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.  

पोलीस भरतीसह डॉक्टर, नर्सेसची भरती करण्याचा विचार ३१ मार्च २०२० पर्यंत विभागाला १ हजार ५३ कोटी रुपयांची तरतूद आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी २ हजार ६४ कोटींपर्यंत नियोजनाचा आकडा गेला आहे. सर्वाधिक निधी औरंगाबाद जिल्ह्याला ३२५ कोटी मिळणार आहे. नांदेडला ३१५ तर बीडला ३०० कोटींपर्यंत तरतूद होणार आहे. हिंगोली जिल्ह्याला १२५ कोटींची तरतूद करण्यात आली. ८ हजार पोलिसांची भरती करायची आहे. डॉक्टर, नर्सेसची भरती करण्याचा विचार आहे. सारथी संस्थेची जबाबदारी आयएएस अधिकाऱ्यांवर देणार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :fundsनिधीMarathwadaमराठवाडाAjit Pawarअजित पवार