शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

औरंगाबाद परिक्षेत्रात वर्षभरात २०५ खून; मालमत्तेचा वाद, अनैतिक संबंधातून झाले ९०% खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 17:24 IST

शहरासह चार जिल्ह्यांत कट रचून केलेल्या खुनाचे प्रमाण मात्र अत्यल्प

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात सर्वाधिक ५४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ४१ खुनाच्या घटना घडल्या.

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालय आणि औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत असलेल्या चार जिल्ह्यांत वर्षभरात २०५ खून झाल्याचे समोर आले. मालमत्तेचा वाद, अनैतिक संबंधातून खून होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. उर्वरित घटना या किरकोळ वादातून घडलेल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत वर्षभरात खुनाच्या ३६ घटनांची, तर औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद ग्रामीण ३६, जालना जिल्ह्यात ३८, बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ४१ खुनाच्या घटना घडल्या. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध एमआयडीसी आहेत. येथे कामानिमित्त बाहेरगावाहून वास्तव्यास आलेल्या लोकांची संख्याही अधिक आहेत. किरकोळ कारणावरून वाद होऊन भांडणे होण्याचे प्रकारही अधिक आहेत. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, सोबत दारू का पीत नाही, म्हणून एका तरुणाची वाळूज एमआयडीसीमध्ये दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटनाही बजाजनगर येथे गतवर्षी झाली होती.

चिकलठाणा येथील चौधरी कॉलनीत एका माथेफिरूने क्षणिक रागातून एकाच कुटुंबातील तीन जणांची चाकूने भोसकून हत्या केली होती. पाण्याची बाटली दिली नाही, म्हणून चहाटपरी चालकाचा गारखेड्यात खून केला होता. अन्य एका घटनेत गारखेडा परिसरातच दुचाकीचा धक्का लागला म्हणून तरुणाचा खून झाला होता. उल्कानगरीसारख्या उच्चभ्रू वसाहतीत घरगुती कारणावरून पत्नीने पतीचा खून केला. आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वाधिक खून क्षणिक वादातून झाल्याचे पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे  यांनी नमूद केले. 

कट रचून केलेल्या खुनाचे मात्र गूढऔरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत वर्षभरात १६९ खुनाच्या घटना घडल्या. ग्रामीण भागातील सर्वाधिक खून मालमत्तेचा वाद, अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले. लुटमारीच्या उद्देशाने झालेल्या मारहाणीत खुनाच्या घटनाही घडल्या. सिल्लोड तालुक्यात मे महिन्यात वाईन शॉप मॅनेजरची हत्या लुटमारीदरम्यान झाली होती. या घटनेचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले होते. दरोडेखोरांच्या हल्ल्यात शेतवस्तीवरील नागरिकांचा खून होण्याचेही प्रकार होतात. गतवर्षी खुनाच्या अनेक घटना गाजल्या होत्या. कट रचून खून होणे हे पोलिसांसाठी डोकेदुखी असते. अशा खुनांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागतात. बऱ्याचदा असे खून उघडकीसही येत नाहीत. 

औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत २०१९ मध्ये १६९ खुनाच्या घटनांची नोंद झाली. कोणत्याही खुनामागे असलेल्या कारणांपैकी मालमत्तेचा वाद, अनैतिक संबंध हे प्रमुख कारण असते. यातून घडणारे खून बऱ्याचदा पूर्वनियोजित कट रचून के लेले असतात, तर क्षणिक भांडणादरम्यान शस्त्राचा वापर केल्याने अथवा गळा आवळून, बेदम मारहाण केल्याने खून होण्याच्या घटना घडण्याचे प्रकारही अधिक आहेत. याला अपघाती खून म्हटले जाते. - सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक, 

वर्षभरातील खून आणि कंसात उघडकीस आलेल्या घटनाऔरंगाबाद ग्रामीण ३६(३६)जालना ३८(३५)बीड ५४(५०)उस्मानाबाद ४१(३८)औरंगाबाद शहर ३६(३५)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस