शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद परिक्षेत्रात वर्षभरात २०५ खून; मालमत्तेचा वाद, अनैतिक संबंधातून झाले ९०% खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 17:24 IST

शहरासह चार जिल्ह्यांत कट रचून केलेल्या खुनाचे प्रमाण मात्र अत्यल्प

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात सर्वाधिक ५४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ४१ खुनाच्या घटना घडल्या.

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालय आणि औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत असलेल्या चार जिल्ह्यांत वर्षभरात २०५ खून झाल्याचे समोर आले. मालमत्तेचा वाद, अनैतिक संबंधातून खून होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. उर्वरित घटना या किरकोळ वादातून घडलेल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत वर्षभरात खुनाच्या ३६ घटनांची, तर औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद ग्रामीण ३६, जालना जिल्ह्यात ३८, बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ४१ खुनाच्या घटना घडल्या. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध एमआयडीसी आहेत. येथे कामानिमित्त बाहेरगावाहून वास्तव्यास आलेल्या लोकांची संख्याही अधिक आहेत. किरकोळ कारणावरून वाद होऊन भांडणे होण्याचे प्रकारही अधिक आहेत. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, सोबत दारू का पीत नाही, म्हणून एका तरुणाची वाळूज एमआयडीसीमध्ये दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटनाही बजाजनगर येथे गतवर्षी झाली होती.

चिकलठाणा येथील चौधरी कॉलनीत एका माथेफिरूने क्षणिक रागातून एकाच कुटुंबातील तीन जणांची चाकूने भोसकून हत्या केली होती. पाण्याची बाटली दिली नाही, म्हणून चहाटपरी चालकाचा गारखेड्यात खून केला होता. अन्य एका घटनेत गारखेडा परिसरातच दुचाकीचा धक्का लागला म्हणून तरुणाचा खून झाला होता. उल्कानगरीसारख्या उच्चभ्रू वसाहतीत घरगुती कारणावरून पत्नीने पतीचा खून केला. आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वाधिक खून क्षणिक वादातून झाल्याचे पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे  यांनी नमूद केले. 

कट रचून केलेल्या खुनाचे मात्र गूढऔरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत वर्षभरात १६९ खुनाच्या घटना घडल्या. ग्रामीण भागातील सर्वाधिक खून मालमत्तेचा वाद, अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले. लुटमारीच्या उद्देशाने झालेल्या मारहाणीत खुनाच्या घटनाही घडल्या. सिल्लोड तालुक्यात मे महिन्यात वाईन शॉप मॅनेजरची हत्या लुटमारीदरम्यान झाली होती. या घटनेचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले होते. दरोडेखोरांच्या हल्ल्यात शेतवस्तीवरील नागरिकांचा खून होण्याचेही प्रकार होतात. गतवर्षी खुनाच्या अनेक घटना गाजल्या होत्या. कट रचून खून होणे हे पोलिसांसाठी डोकेदुखी असते. अशा खुनांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागतात. बऱ्याचदा असे खून उघडकीसही येत नाहीत. 

औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत २०१९ मध्ये १६९ खुनाच्या घटनांची नोंद झाली. कोणत्याही खुनामागे असलेल्या कारणांपैकी मालमत्तेचा वाद, अनैतिक संबंध हे प्रमुख कारण असते. यातून घडणारे खून बऱ्याचदा पूर्वनियोजित कट रचून के लेले असतात, तर क्षणिक भांडणादरम्यान शस्त्राचा वापर केल्याने अथवा गळा आवळून, बेदम मारहाण केल्याने खून होण्याच्या घटना घडण्याचे प्रकारही अधिक आहेत. याला अपघाती खून म्हटले जाते. - सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक, 

वर्षभरातील खून आणि कंसात उघडकीस आलेल्या घटनाऔरंगाबाद ग्रामीण ३६(३६)जालना ३८(३५)बीड ५४(५०)उस्मानाबाद ४१(३८)औरंगाबाद शहर ३६(३५)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस