शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कंपन्यांचे २० % पाणी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:56 IST

पैठण रोडवरील ज्या कंपन्यांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो त्या कंपन्यांच्या पाण्यात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मार्च महिना संपत आला असून, पाराही वाढत चालला आहे. शहरात पाण्याची मागणी दुप्पट झाली आहे. महापालिका समाधानकारक पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे नगरसेवकांकडून आतापासूनच पाण्यासाठी ओरड सुरू झाली. सोमवारी सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे पैठण रोडवरील ज्या कंपन्यांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो त्या कंपन्यांच्या पाण्यात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. हळूहळू या पाण्यात आणखी कपात करण्याची घोषणाही महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली.

शहराला दररोज २०० एमएलडी पाण्याची गरज असताना महापालिका चार दिवसाआड, आठ दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. पाणी प्रश्न दरवर्षी उन्हाळ्यात पेट घेतो. यंदा मार्च महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये महापालिका कुठे चार दिवसाआड, तर कुठे सहा दिवसाआड पाणी देत आहे. सर्वसामान्य नागरिक पाणीपुरठ्यावर अजिबात समाधानी नाहीत. शहराच्या चारही बाजूने गुंठेवारीअंतर्गत ७० ते ८० नवीन वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतींना मागील अनेक वर्षांपासून महापालिका टँकरने पाणीपुरवठा करीत आहे. सोमवारी सर्वसाधारण सभेत महिला नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर ओरड सुरू केली. विविध पक्षाच्या नगरसेवकांनीही आपल्या वॉर्डातील समस्या सांगितल्या. दररोज १३० ते १३५ एमएलडी पाणीच शहरात येते. या पाण्याचे अत्यंत बारकाईने नियोजन करून वाटप करण्यात येत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत महापालिकेच्या मुख्य लाईनवरून विविध कंपन्यांना पाणी देण्यात येते. या पाण्यात कपात करण्यात यावी. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, कंपन्यांना पाणी कसे काय देता, असा रोषही नगरसेवकांनी व्यक्त केला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी कंपन्यांना देण्यात आलेल्या पाण्यात २० टक्के कपात करण्यात यावी, असे आदेश प्रशासनाला दिले.

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी