शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कंपन्यांचे २० % पाणी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:56 IST

पैठण रोडवरील ज्या कंपन्यांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो त्या कंपन्यांच्या पाण्यात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मार्च महिना संपत आला असून, पाराही वाढत चालला आहे. शहरात पाण्याची मागणी दुप्पट झाली आहे. महापालिका समाधानकारक पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे नगरसेवकांकडून आतापासूनच पाण्यासाठी ओरड सुरू झाली. सोमवारी सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे पैठण रोडवरील ज्या कंपन्यांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो त्या कंपन्यांच्या पाण्यात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. हळूहळू या पाण्यात आणखी कपात करण्याची घोषणाही महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली.

शहराला दररोज २०० एमएलडी पाण्याची गरज असताना महापालिका चार दिवसाआड, आठ दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. पाणी प्रश्न दरवर्षी उन्हाळ्यात पेट घेतो. यंदा मार्च महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये महापालिका कुठे चार दिवसाआड, तर कुठे सहा दिवसाआड पाणी देत आहे. सर्वसामान्य नागरिक पाणीपुरठ्यावर अजिबात समाधानी नाहीत. शहराच्या चारही बाजूने गुंठेवारीअंतर्गत ७० ते ८० नवीन वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतींना मागील अनेक वर्षांपासून महापालिका टँकरने पाणीपुरवठा करीत आहे. सोमवारी सर्वसाधारण सभेत महिला नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर ओरड सुरू केली. विविध पक्षाच्या नगरसेवकांनीही आपल्या वॉर्डातील समस्या सांगितल्या. दररोज १३० ते १३५ एमएलडी पाणीच शहरात येते. या पाण्याचे अत्यंत बारकाईने नियोजन करून वाटप करण्यात येत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत महापालिकेच्या मुख्य लाईनवरून विविध कंपन्यांना पाणी देण्यात येते. या पाण्यात कपात करण्यात यावी. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, कंपन्यांना पाणी कसे काय देता, असा रोषही नगरसेवकांनी व्यक्त केला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी कंपन्यांना देण्यात आलेल्या पाण्यात २० टक्के कपात करण्यात यावी, असे आदेश प्रशासनाला दिले.

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी