शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

तीन वर्षांमध्ये छत्रपती संभाजीनगरात १८४ पेडलर्स अटकेत, तरीही नशेखोरीचा आलेख वाढताच

By सुमित डोळे | Updated: October 24, 2023 12:11 IST

मुंबईच्या ग्रँटरोडपर्यंत पोहोचले होते तपासाचे धागेदोरे, परंतु तपासात सातत्य राहिले नाही

छत्रपती संभाजीनगर : गेल्या तीन वर्षांमध्ये शहरात अमली पदार्थांच्या एकूण १५५ कारवायांत १८४ नशेखोर, अमली पदार्थांचे पुरवठादार पकडले गेले. यात जवळपास हजारो गोळ्या, नशेली पदार्थांच्या बाटल्या जप्त झाल्या. तरीही शहरातील नशेखोरीचा वेग दुपटीने वाढला. यात प्रामुख्याने एनडीपीएस पथक, पुंडलिकनगर, सिटीचौक, एटीएसच्या कारवाईत अमली पदार्थ सापडले. जुलै महिन्यातच मुंबईच्या ग्रँटरोडपर्यंत पोलिसांचे तपासाचे धागेदोरे पोहोचले होते. मात्र, त्यानंतर तपासात सातत्यच न राहिल्याने, गुन्हेगारांच्या साखळी पद्धतीच्या रॅकेटमुळे पोलिस शेवटपर्यंत पोहाेचू शकले नाही.

तीन वर्षांपूर्वी शहरातील वाढती नशेखोरी रोखण्यासाठी एनडीपीएस पथकाच्या स्थापनेनंतर कारवाया वेगाने वाढल्या. अमली पदार्थांपेक्षा नशेच्या गोळ्या, पातळ औषधांद्वारे नशा करण्याचे प्रमाण अधिक आहे. पावडर, कोकेन, चरसचा वापर उच्चभ्रू वसाहती, कुटुंबातील मुलांमध्ये सर्वाधिक आहे. पथकाने नशेच्या गोळ्या, खोकल्याच्या औषधांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. मात्र, अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे वर्तुळ अत्यंत गोपनीय पद्धतीने चालत असल्याने त्यांच्यापर्यंत ठोस पुराव्यांसह पोहोचण्यात पथकाला अडचणी आल्या.

नऊ महिन्यांत सर्वाधिक आरोपीवर्षे कारवाया आरोपी गांजा             नशेच्या गोळ्या औषधी बाटल्या पावडर चरस२०२२, ५८- ९९- १४९.५९९ कि.ग्रॅ- १३७६२- ३४५- ५.७३.०३ ग्रॅ. १९४.०६ ग्रॅ.२०२३ (सप्टेंबर) ५९- ८५-            ९३.८०२- कि.ग्रॅ १५४२- ५९९ - _             १४३.१२ ग्रॅ. 

जुलै महिन्यात मुंबईपर्यंत पाेहोचले पोलिसजुलै महिन्यात उच्चभ्रू कुटुंबातली मुले नशा करताना रंगेहात पकडली गेली होती. त्यात पुंडलिकनगर पोलिसांनी अनिल अंबादास माळवे (वय ५१, रा. प्रकाशनगर) याला एमडी ड्रग्ज व चरस, गांजासह अटक केली. माळवे हा पेडलर्सचा शहरातील मुख्य एजंट आहे. त्याच्या चौकशीत मुंबईच्या ग्रँट रोडवर मुख्य तस्करांना भेटून हे पदार्थ आणले जात असल्याचे सिद्ध झाले होते, तर त्याच आठवड्यात एटीएसच्या कारवाईत मोहम्मद अदनान शेख अशरफ (२७, रा. गणेश कॉलनी) हा ४ लाख ९३ हजार रुपयांच्या २४६.५० ग्रॅम चरससह पकडला गेला होता. अदनान, अनिलसह अन्य एजंटही व्हॉट्सॲप, टेलिग्रामवर एकमेकांच्या संपर्कात राहतात. संपर्क होताच चॅट, कॉल हिस्टरी डिलिट करतात. दर दहा, पंधरा दिवसांनी रेल्वेद्वारे मुंबईवरून तस्करी होते.

टॅग्स :Drugsअमली पदार्थAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी