शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

औरंगाबाद शहरातील १८ वॉर्डांना पाच दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:09 IST

शहरातील प्रत्येक वॉर्डाला समान पाणी मिळावे या हेतूने ११ मेपासून तीन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. मागील दहा दिवसांमध्ये एकाही वॉर्डाला तीन दिवसाआड पाणी मिळाले नाही.

ठळक मुद्देनियोजनाची ऐसीतैशी : तीन दिवसांआड पाणी देण्याची घोषणा हवेतच; सणासुदीच्या दिवसांत पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रत्येक वॉर्डाला समान पाणी मिळावे या हेतूने ११ मेपासून तीन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. मागील दहा दिवसांमध्ये एकाही वॉर्डाला तीन दिवसाआड पाणी मिळाले नाही. पाणीपुरवठ्यातील संपूर्ण नियोजनच कोलमडले असून, मे हिटच्या तडाख्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शहागंज पाण्याच्या टाकीवर अवलंबून असलेल्या १८ वॉर्डांची अवस्था सर्वाधिक बिकट आहे. ऐन रजमान महिन्यात या भागातील नागरिकांना चक्क पाच दिवसाआड म्हणजेच सहाव्या दिवशी पाणी देण्याचा पराक्रम महापालिका प्रशासन करीत आहे.उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरात पाणीपुरवठ्याची ओरड सुरू आहे. जायकवाडीहून मुबलक प्रमाणात पाणी येत आहे. महापालिकेकडे नियोजन नसल्याने सर्वत्र पाण्यासाठी ओरड होत आहे. सिडको-हडको भागात रविवारी सर्वाधिक पाणीपुरवठ्याची ओरड सुरू होती. टी.व्ही. सेंटर परिसरातील विविध वसाहतींना रविवारी पाणी येणार होते. मात्र, नियोजित वेळेत पाणीच आले नाही. अशीच अवस्था भावसिंगपुरा भागातील संगीता कॉलनी आणि इतर वसाहतींमध्ये होती. या भागाला रेल्वेस्टेशन येथून मेन लाईनवरून पाणी देण्यात येते. फारोळा येथील पाणीपुरवठ्याचे पंप तब्बल एक तास बंद होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना रविवारी निर्जळीचा सामना करावा लागला. यापूर्वी जेव्हा भावसिंगपुरा भागातील नागरिकांना पाण्याचा टप्पा होता तेव्हासुद्धा पाणीच आले नव्हते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आठ ते दहा दिवस निर्जळीचा कसा सामना करावा, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.एमआयडीसीच्या पाण्याचे गाजरशहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिकेने एमआयडीसी प्रशासनाकडे पाच एमएलडी पाण्याची मागणी केली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही मागील महिन्यातच पाणी देण्यास तत्त्वत: मंजुरीही दिली होती. मे महिना संपत आला तरी मनपाला एमआयडीसीकडून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. सिडको एन-१ भागात एमआयडीसीचे पाणीपुरवठा केंद्र आहे. या केंद्रावरून पाण्याचे सर्व टँकर भरण्यात येतील. त्यासाठी २ एमएलडी पाणी घेण्यात येईल. उर्वरित ३ एमएलडी पाणी सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीत आण्यात येईल. सातारा-देवळाई भागातही एमआयडीसीचे २ एमएलडी पाणी देण्यात यावे, असा ठरावही सर्वसाधारण सभेत मागील महिन्यात मंजूर करण्यात आला होता. पाणी येण्यापूर्वीच महापालिकेने पाण्याचे नियोजनही करून ठेवले आहे. मे महिना संपत आला तरीसुद्धा पाणी आले नाही. औरंगाबादकरांसह सातारा-देवळाई भागातील लाखो नागरिकांना एमआयडीसीच्या पाण्याचे निव्वळ गाजर दाखविण्याचे काम महापालिकेने केल्याचे दिसून येत आहे.कोणालाच देणे-घेणे नाहीपाणीपुरवठा विभागात पूर्वी कर्मचारी नाहीत, अशी ओरड अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून या विभागाला १०० पेक्षा अधिक लाईनमन, अधिकारी देण्यात आले आहेत. यानंतरही पाणीपुरवठ्यात किंचितही सुधारणा झालेली नाही. पाणीपुरवठा वेळेवर का होत नाही, याचे उत्तर वरिष्ठ अधिकाºयांपासून कनिष्ठ कर्मचाºयांपर्यंत नाही. प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होण्याचे धोरण बजाविण्यात येत आहे.शहागंजवर अन्याय का?रमजान महिन्याला सुरुवात होऊन चार दिवस झाले. शहागंज पाण्याच्या टाकीवर जवळपास १८ वॉर्ड अवलंबून आहेत. या भागातील नागरिकांना ५ दिवसाआड म्हणजेच सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. सहा दिवस पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या भागातील गोरगरीब नागरिकांकडे नाही. त्यामुळे मे हिटच्या तडाख्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात