शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे प्रथमच ४ फुटांनी उघडले; ७६ हजार क्युसेक पाणी गोदावरी पात्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 17:51 IST

यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडीतून सर्वाधिक विसर्ग

औरंगाबाद : यंदाच्या पावसाळ्यात बुधवारी सायंकाळी जायकवाडी धरणातून प्रथमच ७६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला. धरणाचे १८ दरवाजे ४ फुटांनी उघडण्यात आले. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. दुपारपर्यंत ६७ हजार क्युसेक पाणी धरणातून नदीपात्रात सोडण्यात येत होते, सायंकाळी जायकवाडी धरणाच्या उर्ध्व (वरच्या) दिशेने येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने सुमारे १० हजार क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला.

२७ जुलै रोजी जायकवाडी धरणात ९१.५७ टक्के पाणीसाठा होता. नाशिकहून १९ हजार ८५ क्युसेक प्रति सेकंद पाण्याची आवक सुरू होती. धरणाच्या १८ दरवाजातून ३० हजार ४३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. ३ ऑगस्ट रोजी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आल्यानंतर ८ ऑगस्ट रोजी पुन्हा धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. धरणाचे १० दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले होते. ११ हजार क्युसेक विसर्ग सुरू केला.

आठवड्यापासून पाणीपातळीत वाढ९ ऑगस्ट रोजी २९ हजार क्युसेक, १० ऑगस्ट रोजी २० हजार क्युसेक, ११ ऑगस्ट रोजी ११ हजार क्युसेक, १२ ऑगस्ट रोजी २१ हजार क्युसेक, १३ ऑगस्ट रोजी ३९ हजार क्युसेक तर १४ ऑगस्ट रोजी २९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू राहिला. १५ ऑगस्ट रोजी धरण ९५ टक्के भरले. धरणातून २९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सायंकाळी ५७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. १७ ऑगस्ट सायंकाळी ७६ हजार क्युसेक प्रति सेकंद वेगाने धरणातून पाणी गोदावरी नदीपात्रात झेपावले. ४३ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस