शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे प्रथमच ४ फुटांनी उघडले; ७६ हजार क्युसेक पाणी गोदावरी पात्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 17:51 IST

यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडीतून सर्वाधिक विसर्ग

औरंगाबाद : यंदाच्या पावसाळ्यात बुधवारी सायंकाळी जायकवाडी धरणातून प्रथमच ७६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला. धरणाचे १८ दरवाजे ४ फुटांनी उघडण्यात आले. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. दुपारपर्यंत ६७ हजार क्युसेक पाणी धरणातून नदीपात्रात सोडण्यात येत होते, सायंकाळी जायकवाडी धरणाच्या उर्ध्व (वरच्या) दिशेने येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने सुमारे १० हजार क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला.

२७ जुलै रोजी जायकवाडी धरणात ९१.५७ टक्के पाणीसाठा होता. नाशिकहून १९ हजार ८५ क्युसेक प्रति सेकंद पाण्याची आवक सुरू होती. धरणाच्या १८ दरवाजातून ३० हजार ४३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. ३ ऑगस्ट रोजी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आल्यानंतर ८ ऑगस्ट रोजी पुन्हा धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. धरणाचे १० दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले होते. ११ हजार क्युसेक विसर्ग सुरू केला.

आठवड्यापासून पाणीपातळीत वाढ९ ऑगस्ट रोजी २९ हजार क्युसेक, १० ऑगस्ट रोजी २० हजार क्युसेक, ११ ऑगस्ट रोजी ११ हजार क्युसेक, १२ ऑगस्ट रोजी २१ हजार क्युसेक, १३ ऑगस्ट रोजी ३९ हजार क्युसेक तर १४ ऑगस्ट रोजी २९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू राहिला. १५ ऑगस्ट रोजी धरण ९५ टक्के भरले. धरणातून २९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सायंकाळी ५७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. १७ ऑगस्ट सायंकाळी ७६ हजार क्युसेक प्रति सेकंद वेगाने धरणातून पाणी गोदावरी नदीपात्रात झेपावले. ४३ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस