शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे प्रथमच ४ फुटांनी उघडले; ७६ हजार क्युसेक पाणी गोदावरी पात्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 17:51 IST

यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडीतून सर्वाधिक विसर्ग

औरंगाबाद : यंदाच्या पावसाळ्यात बुधवारी सायंकाळी जायकवाडी धरणातून प्रथमच ७६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला. धरणाचे १८ दरवाजे ४ फुटांनी उघडण्यात आले. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. दुपारपर्यंत ६७ हजार क्युसेक पाणी धरणातून नदीपात्रात सोडण्यात येत होते, सायंकाळी जायकवाडी धरणाच्या उर्ध्व (वरच्या) दिशेने येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने सुमारे १० हजार क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला.

२७ जुलै रोजी जायकवाडी धरणात ९१.५७ टक्के पाणीसाठा होता. नाशिकहून १९ हजार ८५ क्युसेक प्रति सेकंद पाण्याची आवक सुरू होती. धरणाच्या १८ दरवाजातून ३० हजार ४३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. ३ ऑगस्ट रोजी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आल्यानंतर ८ ऑगस्ट रोजी पुन्हा धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. धरणाचे १० दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले होते. ११ हजार क्युसेक विसर्ग सुरू केला.

आठवड्यापासून पाणीपातळीत वाढ९ ऑगस्ट रोजी २९ हजार क्युसेक, १० ऑगस्ट रोजी २० हजार क्युसेक, ११ ऑगस्ट रोजी ११ हजार क्युसेक, १२ ऑगस्ट रोजी २१ हजार क्युसेक, १३ ऑगस्ट रोजी ३९ हजार क्युसेक तर १४ ऑगस्ट रोजी २९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू राहिला. १५ ऑगस्ट रोजी धरण ९५ टक्के भरले. धरणातून २९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सायंकाळी ५७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. १७ ऑगस्ट सायंकाळी ७६ हजार क्युसेक प्रति सेकंद वेगाने धरणातून पाणी गोदावरी नदीपात्रात झेपावले. ४३ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस