शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद परिमंडळात दोन महिन्यांत पकडली १६०९ ग्राहकांची वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:57 IST

महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम सुरूच ठेवली असून, या मोहिमेंतर्गत एप्रिल व मे महिन्यात १ हजार ६०९ ग्राहकांची वीजचोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे. 

ठळक मुद्देऔरंगाबाद व जालना जिल्ह्यांत लघुदाब वीज ग्राहकांकडे ३४४ कोटी ७९ लाख ३० हजार रुपये एवढी थकबाकी वाढली आहे.

औरंगाबाद : महावितरणच्या परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत लघुदाब वीज ग्राहकांकडे ३४४ कोटी ७९ लाख ३० हजार रुपये एवढी थकबाकी वाढली आहे. तथापि, थकबाकी वसुलीची मोहीम सुरूच ठेवली असून, या मोहिमेंतर्गत एप्रिल व मे महिन्यात १ हजार ६०९ ग्राहकांची वीजचोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे. 

या संदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद शहर मंडळांतर्गत २२१ ग्राहकांनी केलेली वीजचोरी उघडकीस आली, तर ग्रामीण मंडळांतर्गत १२०२ वीज चोऱ्या उघडकीस आल्या. जालना एक आणि दोन मंडळांतर्गत १८९ वीज चोऱ्या पकडण्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांना यश आले. वीजचोरी पकडलेल्या ग्राहकांकडे १ कोटी २८ लाख ६० हजार रुपये बिलाची थकबाकी आहे. अधिकाऱ्यांनी वीज चोरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच यापैकी २३१ जणांनी थकबाकी व दंडाची रक्कम भरण्याची तयारी दाखविली. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून १९ लाख ४३ हजार रुपये बिल व दंडाची रक्कम वसूल केली. तथापि, ६३ वीज चोरांविरुद्ध औरंगाबादेतील ५ आणि जालन्यातील ३ पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. 

यापूर्वी औरंगाबाद परिमंडळांतर्गत दोन्ही जिल्ह्यांतील वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी जालना येथे एकच पोलीस ठाणे होते. अधिकारी वीज चोरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यास त्याठिकाणी दिवसभर ताटकळत बसावे लागत होते. त्यामुळे एप्रिल २०१८ पासून वीज चोरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत छावणी आणि सिडको पोलीस ठाणे, तर ग्रामीणमध्ये चिकलठाणा, सिल्लोड आणि गंगापूर अशी पाच पोलीस ठाणे देण्यात आले, तर जालना जिल्ह्यासाठी सदर बाजार पोलीस ठाणे, भोकरदन पोलीस ठाणे आणि परतूर पोलीस ठाणे देण्यात आले आहेत, या दोन जिल्ह्यांमध्ये यावेळी पहिल्यांदाच वीज चोरांविरुद्ध ६३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मोहीम अधिक गतिमान करणारयासंदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, एप्रिल व मे महिन्यांमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली आहे. ती वसूल करणे व वीज चोरांविरुद्ध मोहीम गतिमान करण्यासाठी पथके तैनात केली जाणार आहेत. ३० जून रोजी या पथकांचे आदेश काढले जातील. पुढील महिन्यापासून सुरुवातीला १ ते १० तारखेपर्यंत वीज चोरांविरुद्ध मोहीम राबविली जाईल, तर उर्वरित दिवसांमध्ये ही पथके थकबाकी वसुली करतील. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणtheftचोरीMONEYपैसा