शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

औरंगाबाद परिमंडळात दोन महिन्यांत पकडली १६०९ ग्राहकांची वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:57 IST

महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम सुरूच ठेवली असून, या मोहिमेंतर्गत एप्रिल व मे महिन्यात १ हजार ६०९ ग्राहकांची वीजचोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे. 

ठळक मुद्देऔरंगाबाद व जालना जिल्ह्यांत लघुदाब वीज ग्राहकांकडे ३४४ कोटी ७९ लाख ३० हजार रुपये एवढी थकबाकी वाढली आहे.

औरंगाबाद : महावितरणच्या परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत लघुदाब वीज ग्राहकांकडे ३४४ कोटी ७९ लाख ३० हजार रुपये एवढी थकबाकी वाढली आहे. तथापि, थकबाकी वसुलीची मोहीम सुरूच ठेवली असून, या मोहिमेंतर्गत एप्रिल व मे महिन्यात १ हजार ६०९ ग्राहकांची वीजचोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे. 

या संदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद शहर मंडळांतर्गत २२१ ग्राहकांनी केलेली वीजचोरी उघडकीस आली, तर ग्रामीण मंडळांतर्गत १२०२ वीज चोऱ्या उघडकीस आल्या. जालना एक आणि दोन मंडळांतर्गत १८९ वीज चोऱ्या पकडण्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांना यश आले. वीजचोरी पकडलेल्या ग्राहकांकडे १ कोटी २८ लाख ६० हजार रुपये बिलाची थकबाकी आहे. अधिकाऱ्यांनी वीज चोरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच यापैकी २३१ जणांनी थकबाकी व दंडाची रक्कम भरण्याची तयारी दाखविली. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून १९ लाख ४३ हजार रुपये बिल व दंडाची रक्कम वसूल केली. तथापि, ६३ वीज चोरांविरुद्ध औरंगाबादेतील ५ आणि जालन्यातील ३ पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. 

यापूर्वी औरंगाबाद परिमंडळांतर्गत दोन्ही जिल्ह्यांतील वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी जालना येथे एकच पोलीस ठाणे होते. अधिकारी वीज चोरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यास त्याठिकाणी दिवसभर ताटकळत बसावे लागत होते. त्यामुळे एप्रिल २०१८ पासून वीज चोरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत छावणी आणि सिडको पोलीस ठाणे, तर ग्रामीणमध्ये चिकलठाणा, सिल्लोड आणि गंगापूर अशी पाच पोलीस ठाणे देण्यात आले, तर जालना जिल्ह्यासाठी सदर बाजार पोलीस ठाणे, भोकरदन पोलीस ठाणे आणि परतूर पोलीस ठाणे देण्यात आले आहेत, या दोन जिल्ह्यांमध्ये यावेळी पहिल्यांदाच वीज चोरांविरुद्ध ६३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मोहीम अधिक गतिमान करणारयासंदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, एप्रिल व मे महिन्यांमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली आहे. ती वसूल करणे व वीज चोरांविरुद्ध मोहीम गतिमान करण्यासाठी पथके तैनात केली जाणार आहेत. ३० जून रोजी या पथकांचे आदेश काढले जातील. पुढील महिन्यापासून सुरुवातीला १ ते १० तारखेपर्यंत वीज चोरांविरुद्ध मोहीम राबविली जाईल, तर उर्वरित दिवसांमध्ये ही पथके थकबाकी वसुली करतील. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणtheftचोरीMONEYपैसा