शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

औरंगाबादेतील १६ जण झाले ‘सीए’

By admin | Updated: August 9, 2014 00:56 IST

औरंगाबादेतील १६ जण झाले ‘सीए’

औरंगाबाद : ‘दी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट्स’तर्फे जून महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेमध्ये औरंगाबादचे १६ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यातील आठ विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले. स्थानिक केंद्रातून खुशबू बंग या विद्यार्थिनीने ५८.२५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा औरंगाबाद शाखेतून ३८१ विद्यार्थ्यांनी सीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली. त्यापैकी ८ जण प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाले, तर ‘ग्रुप वन’मध्ये ४ आणि ‘ग्रुप टू’मध्ये ४ विद्यार्थी पास झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम खुशबू बंग ही विद्यार्थिनी केंद्रातून प्रथम आली. गणेश तोतला, शुभी अग्रवाल, शिखा माछर, सुरभी खिंवसरा, पूजा चंडालिया, नूपुर लड्डा, भाग्यश्री जैन तसेच रश्मी काकानी, सुनील कबिराहाल्ली, स्वप्ना लुनावत, अनिरुद्ध जिंतूरकर, अपूर्वा गोगटे, आनंद चिरपूटकर, विनाली शिंदे, ओमप्रकाश मालू, रोझलिन अ‍ॅन्थोनी यांचा समावेश आहे. यासंदर्भात स्थानिक शाखेचे चेअरमन विजय राठी यांनी सांगितले की, प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २ टक्के आहे. ‘ग्रुप वन’मध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ५.२५ टक्के, तर ‘ग्रुप टू’मध्ये उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण ४.२० टक्के एवढे आहे. मागील वर्षी ३१७ पैकी ९ विद्यार्थी सी.ए.ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मागील तीन वर्षांचा निकाल लक्षात घेता यंदा निकालाची टक्केवारी थोडी वाढली आहे. परिश्रमाचे फळ मिळालेऔरंगाबाद केंद्रातून सीएच्या अंतिम परीक्षेत प्रथम आलेल्या खुशबू बंग या विद्यार्थिनीने सांगितले की, दररोज ८ ते १० तास अभ्यास करीत असे, तसेच परीक्षेआधीचे दोन महिने तर दररोज १२ तास अभ्यास करीत होते. पहिला पेपर अवघड गेला होता. यामुळे थोडा हिरमोड झाला; पण परिश्रमाचे फळ मिळाले. माझे दोन्ही भाऊ आयआयटीत आहेत. घरात शैक्षणिक वातावरण असल्याने त्याचा अभ्यासाला मोठा फायदा झाला. या यशाचे श्रेय मी आई-वडील, आजोबा-आजी, नातेवाईक अन् शिक्षकांना देते.