शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

औरंगाबादेतील १६ जण झाले ‘सीए’

By admin | Updated: August 9, 2014 00:56 IST

औरंगाबादेतील १६ जण झाले ‘सीए’

औरंगाबाद : ‘दी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट्स’तर्फे जून महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेमध्ये औरंगाबादचे १६ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यातील आठ विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले. स्थानिक केंद्रातून खुशबू बंग या विद्यार्थिनीने ५८.२५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा औरंगाबाद शाखेतून ३८१ विद्यार्थ्यांनी सीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली. त्यापैकी ८ जण प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाले, तर ‘ग्रुप वन’मध्ये ४ आणि ‘ग्रुप टू’मध्ये ४ विद्यार्थी पास झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम खुशबू बंग ही विद्यार्थिनी केंद्रातून प्रथम आली. गणेश तोतला, शुभी अग्रवाल, शिखा माछर, सुरभी खिंवसरा, पूजा चंडालिया, नूपुर लड्डा, भाग्यश्री जैन तसेच रश्मी काकानी, सुनील कबिराहाल्ली, स्वप्ना लुनावत, अनिरुद्ध जिंतूरकर, अपूर्वा गोगटे, आनंद चिरपूटकर, विनाली शिंदे, ओमप्रकाश मालू, रोझलिन अ‍ॅन्थोनी यांचा समावेश आहे. यासंदर्भात स्थानिक शाखेचे चेअरमन विजय राठी यांनी सांगितले की, प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २ टक्के आहे. ‘ग्रुप वन’मध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ५.२५ टक्के, तर ‘ग्रुप टू’मध्ये उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण ४.२० टक्के एवढे आहे. मागील वर्षी ३१७ पैकी ९ विद्यार्थी सी.ए.ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मागील तीन वर्षांचा निकाल लक्षात घेता यंदा निकालाची टक्केवारी थोडी वाढली आहे. परिश्रमाचे फळ मिळालेऔरंगाबाद केंद्रातून सीएच्या अंतिम परीक्षेत प्रथम आलेल्या खुशबू बंग या विद्यार्थिनीने सांगितले की, दररोज ८ ते १० तास अभ्यास करीत असे, तसेच परीक्षेआधीचे दोन महिने तर दररोज १२ तास अभ्यास करीत होते. पहिला पेपर अवघड गेला होता. यामुळे थोडा हिरमोड झाला; पण परिश्रमाचे फळ मिळाले. माझे दोन्ही भाऊ आयआयटीत आहेत. घरात शैक्षणिक वातावरण असल्याने त्याचा अभ्यासाला मोठा फायदा झाला. या यशाचे श्रेय मी आई-वडील, आजोबा-आजी, नातेवाईक अन् शिक्षकांना देते.