शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

औरंगाबादेतील १६ जण झाले ‘सीए’

By admin | Updated: August 9, 2014 00:56 IST

औरंगाबादेतील १६ जण झाले ‘सीए’

औरंगाबाद : ‘दी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट्स’तर्फे जून महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेमध्ये औरंगाबादचे १६ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यातील आठ विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले. स्थानिक केंद्रातून खुशबू बंग या विद्यार्थिनीने ५८.२५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा औरंगाबाद शाखेतून ३८१ विद्यार्थ्यांनी सीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली. त्यापैकी ८ जण प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाले, तर ‘ग्रुप वन’मध्ये ४ आणि ‘ग्रुप टू’मध्ये ४ विद्यार्थी पास झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम खुशबू बंग ही विद्यार्थिनी केंद्रातून प्रथम आली. गणेश तोतला, शुभी अग्रवाल, शिखा माछर, सुरभी खिंवसरा, पूजा चंडालिया, नूपुर लड्डा, भाग्यश्री जैन तसेच रश्मी काकानी, सुनील कबिराहाल्ली, स्वप्ना लुनावत, अनिरुद्ध जिंतूरकर, अपूर्वा गोगटे, आनंद चिरपूटकर, विनाली शिंदे, ओमप्रकाश मालू, रोझलिन अ‍ॅन्थोनी यांचा समावेश आहे. यासंदर्भात स्थानिक शाखेचे चेअरमन विजय राठी यांनी सांगितले की, प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २ टक्के आहे. ‘ग्रुप वन’मध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ५.२५ टक्के, तर ‘ग्रुप टू’मध्ये उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण ४.२० टक्के एवढे आहे. मागील वर्षी ३१७ पैकी ९ विद्यार्थी सी.ए.ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मागील तीन वर्षांचा निकाल लक्षात घेता यंदा निकालाची टक्केवारी थोडी वाढली आहे. परिश्रमाचे फळ मिळालेऔरंगाबाद केंद्रातून सीएच्या अंतिम परीक्षेत प्रथम आलेल्या खुशबू बंग या विद्यार्थिनीने सांगितले की, दररोज ८ ते १० तास अभ्यास करीत असे, तसेच परीक्षेआधीचे दोन महिने तर दररोज १२ तास अभ्यास करीत होते. पहिला पेपर अवघड गेला होता. यामुळे थोडा हिरमोड झाला; पण परिश्रमाचे फळ मिळाले. माझे दोन्ही भाऊ आयआयटीत आहेत. घरात शैक्षणिक वातावरण असल्याने त्याचा अभ्यासाला मोठा फायदा झाला. या यशाचे श्रेय मी आई-वडील, आजोबा-आजी, नातेवाईक अन् शिक्षकांना देते.