शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीचे १६ दरवाजे उघडले; ५१ हजार क्युसेक विसर्ग सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 13:45 IST

हवामान खात्याच्या ‘हाय अलर्ट’च्या इशाऱ्याने प्रशासनाची उडाली धावपळ 

ठळक मुद्दे१६ दरवाजे तीन फुटांनी वर उचलले २९ आॅक्टोबरपर्यंत हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

पैठण : हवामान खात्याने २९ आॅक्टोबरपर्यंत ‘हाय अलर्ट’चा इशारा दिल्याने जायकवाडी प्रशासनाची धांदल उडाली आहे. संभाव्य पाण्याची आवक लक्षात घेता काठोकाठ भरलेल्या धरणात पाण्यासाठी जागा निर्माण करण्याकरिता शुक्रवारी जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे तीन फुटांनी वर उचलून सांडव्यातून ५१ हजार ८९३ क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

दरम्यान, स्थानिक पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात २० हजार क्युसेक एवढी आवक सुरू आहे. आवक लक्षात घेता धरणातून होणारा विसर्ग आणखी वाढविण्यात येऊ शकतो, अशी शक्यता जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली.शुक्रवारी दिवसभर ४३ हजार क्युसेक क्षमतेने धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू होता. सायंकाळी ५ वाजेदरम्यान पुन्हा विसर्ग वाढवून तो ५१ हजार क्युसेक करण्यात आला. मोठ्या क्षमतेने विसर्ग होत असल्याने गोदावरी नदीला पूर आला असून, धरणाखालील पिंपळेश्वर पूल पूर्ण पाण्याखाली गेल्याने पैठण, दक्षिण जायकवाडी व कावसानची वाहतूक शुक्रवारी बंद पडली. 

गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने जलद गतीने धरणात पाणी जमा होत आहे. दरम्यान, २९ आॅक्टोबरपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टी होईल, असा इशारा जायकवाडी प्रशासनाला कळविला आहे. त्यामुळे १०० टक्के भरलेल्या धरणात पाण्यासाठी रिकामी जागा तयार करावी लागत असल्याचे अभियंता काळे यांनी सांगितले.शुक्रवारी सायंकाळी धरणाचे १०, २७, १६, २१, १४, २३, १२, २५ व ११, २६, १३, २४, १५, २२, १७, २० हे १६ दरवाजे तीन फुटांनी वर उचलून गोदापात्रात ५० हजार ३०४ क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १५८९ क्युसेक, असा मिळून ५१ हजार ८९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दरम्यान, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून येणारी आवक नगण्य असल्याचे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे व संदीप राठोड यांनी सांगितले.

धरणात जागा तयार केली नाही, तर...जायकवाडी धरण काठोकाठ भरलेले आहे. या परिस्थितीत स्थानिक पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाला, तर धरणात जलदगतीने पाणी जमा होईल. येणाऱ्या पाण्याला धरणात (पॉकेट) जागा केली नाही, तर जेवढी आवक होईल, तेवढाच विसर्ग करावा लागतो. अशा परिस्थितीत विसर्गावर नियंत्रण ठेवता येत नाही व पूरपरिस्थिती ओढावू शकते. यामुळे धरणात अगोदरच ‘पॉकेट’ तयार करून ठेवल्यास येणाऱ्या पाण्याला थोपवून नियंत्रित विसर्ग करता येतो, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसAurangabadऔरंगाबादgodavariगोदावरी