शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीचे १६ दरवाजे उघडले; ५१ हजार क्युसेक विसर्ग सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 13:45 IST

हवामान खात्याच्या ‘हाय अलर्ट’च्या इशाऱ्याने प्रशासनाची उडाली धावपळ 

ठळक मुद्दे१६ दरवाजे तीन फुटांनी वर उचलले २९ आॅक्टोबरपर्यंत हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

पैठण : हवामान खात्याने २९ आॅक्टोबरपर्यंत ‘हाय अलर्ट’चा इशारा दिल्याने जायकवाडी प्रशासनाची धांदल उडाली आहे. संभाव्य पाण्याची आवक लक्षात घेता काठोकाठ भरलेल्या धरणात पाण्यासाठी जागा निर्माण करण्याकरिता शुक्रवारी जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे तीन फुटांनी वर उचलून सांडव्यातून ५१ हजार ८९३ क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

दरम्यान, स्थानिक पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात २० हजार क्युसेक एवढी आवक सुरू आहे. आवक लक्षात घेता धरणातून होणारा विसर्ग आणखी वाढविण्यात येऊ शकतो, अशी शक्यता जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली.शुक्रवारी दिवसभर ४३ हजार क्युसेक क्षमतेने धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू होता. सायंकाळी ५ वाजेदरम्यान पुन्हा विसर्ग वाढवून तो ५१ हजार क्युसेक करण्यात आला. मोठ्या क्षमतेने विसर्ग होत असल्याने गोदावरी नदीला पूर आला असून, धरणाखालील पिंपळेश्वर पूल पूर्ण पाण्याखाली गेल्याने पैठण, दक्षिण जायकवाडी व कावसानची वाहतूक शुक्रवारी बंद पडली. 

गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने जलद गतीने धरणात पाणी जमा होत आहे. दरम्यान, २९ आॅक्टोबरपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टी होईल, असा इशारा जायकवाडी प्रशासनाला कळविला आहे. त्यामुळे १०० टक्के भरलेल्या धरणात पाण्यासाठी रिकामी जागा तयार करावी लागत असल्याचे अभियंता काळे यांनी सांगितले.शुक्रवारी सायंकाळी धरणाचे १०, २७, १६, २१, १४, २३, १२, २५ व ११, २६, १३, २४, १५, २२, १७, २० हे १६ दरवाजे तीन फुटांनी वर उचलून गोदापात्रात ५० हजार ३०४ क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १५८९ क्युसेक, असा मिळून ५१ हजार ८९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दरम्यान, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून येणारी आवक नगण्य असल्याचे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे व संदीप राठोड यांनी सांगितले.

धरणात जागा तयार केली नाही, तर...जायकवाडी धरण काठोकाठ भरलेले आहे. या परिस्थितीत स्थानिक पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाला, तर धरणात जलदगतीने पाणी जमा होईल. येणाऱ्या पाण्याला धरणात (पॉकेट) जागा केली नाही, तर जेवढी आवक होईल, तेवढाच विसर्ग करावा लागतो. अशा परिस्थितीत विसर्गावर नियंत्रण ठेवता येत नाही व पूरपरिस्थिती ओढावू शकते. यामुळे धरणात अगोदरच ‘पॉकेट’ तयार करून ठेवल्यास येणाऱ्या पाण्याला थोपवून नियंत्रित विसर्ग करता येतो, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसAurangabadऔरंगाबादgodavariगोदावरी