शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

जायकवाडीचे १६ दरवाजे उघडले; ५१ हजार क्युसेक विसर्ग सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 13:45 IST

हवामान खात्याच्या ‘हाय अलर्ट’च्या इशाऱ्याने प्रशासनाची उडाली धावपळ 

ठळक मुद्दे१६ दरवाजे तीन फुटांनी वर उचलले २९ आॅक्टोबरपर्यंत हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

पैठण : हवामान खात्याने २९ आॅक्टोबरपर्यंत ‘हाय अलर्ट’चा इशारा दिल्याने जायकवाडी प्रशासनाची धांदल उडाली आहे. संभाव्य पाण्याची आवक लक्षात घेता काठोकाठ भरलेल्या धरणात पाण्यासाठी जागा निर्माण करण्याकरिता शुक्रवारी जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे तीन फुटांनी वर उचलून सांडव्यातून ५१ हजार ८९३ क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

दरम्यान, स्थानिक पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात २० हजार क्युसेक एवढी आवक सुरू आहे. आवक लक्षात घेता धरणातून होणारा विसर्ग आणखी वाढविण्यात येऊ शकतो, अशी शक्यता जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली.शुक्रवारी दिवसभर ४३ हजार क्युसेक क्षमतेने धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू होता. सायंकाळी ५ वाजेदरम्यान पुन्हा विसर्ग वाढवून तो ५१ हजार क्युसेक करण्यात आला. मोठ्या क्षमतेने विसर्ग होत असल्याने गोदावरी नदीला पूर आला असून, धरणाखालील पिंपळेश्वर पूल पूर्ण पाण्याखाली गेल्याने पैठण, दक्षिण जायकवाडी व कावसानची वाहतूक शुक्रवारी बंद पडली. 

गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने जलद गतीने धरणात पाणी जमा होत आहे. दरम्यान, २९ आॅक्टोबरपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टी होईल, असा इशारा जायकवाडी प्रशासनाला कळविला आहे. त्यामुळे १०० टक्के भरलेल्या धरणात पाण्यासाठी रिकामी जागा तयार करावी लागत असल्याचे अभियंता काळे यांनी सांगितले.शुक्रवारी सायंकाळी धरणाचे १०, २७, १६, २१, १४, २३, १२, २५ व ११, २६, १३, २४, १५, २२, १७, २० हे १६ दरवाजे तीन फुटांनी वर उचलून गोदापात्रात ५० हजार ३०४ क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १५८९ क्युसेक, असा मिळून ५१ हजार ८९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दरम्यान, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून येणारी आवक नगण्य असल्याचे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे व संदीप राठोड यांनी सांगितले.

धरणात जागा तयार केली नाही, तर...जायकवाडी धरण काठोकाठ भरलेले आहे. या परिस्थितीत स्थानिक पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाला, तर धरणात जलदगतीने पाणी जमा होईल. येणाऱ्या पाण्याला धरणात (पॉकेट) जागा केली नाही, तर जेवढी आवक होईल, तेवढाच विसर्ग करावा लागतो. अशा परिस्थितीत विसर्गावर नियंत्रण ठेवता येत नाही व पूरपरिस्थिती ओढावू शकते. यामुळे धरणात अगोदरच ‘पॉकेट’ तयार करून ठेवल्यास येणाऱ्या पाण्याला थोपवून नियंत्रित विसर्ग करता येतो, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसAurangabadऔरंगाबादgodavariगोदावरी