शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

औरंगाबादच्या रस्त्यांसाठी १५२ कोटी मंजूर; महापालिका निवडणुक जिंकण्याच्या दिशेने महाआघाडीचे पाऊल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 20:01 IST

महापालिका ८, रस्ते विकास महामंडळ ६, एमआयडीसी ६ रस्त्यांची कामे करणार आहे.

ठळक मुद्देसर्व कामे एकाच वेळी सुरू होणारतीन वेगवेगळ्या विभागांना ती देण्यात आली कामे

औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुका जिंकण्याच्या दिशेने पाऊल म्हणून महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटी २४ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. या निधीतून २० रस्त्यांची कामे केली जाणार असून, विशेष म्हणजे केवळ तीन दिवसांमध्ये कामाच्या  निविदाही काढण्यात येणार आहेत. 

शहरातील रस्त्यांसाठी एकाच टप्प्यात पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम जाहीर करण्यात आली आहे. यामुळे राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या शहराच्या रस्त्यांची स्थिती आणखी उत्तम होणार आहे. शहरातील रस्त्यांसाठी निधी जाहीर केल्याचे औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईत जाहीर केले. नव्याने मिळणाऱ्या १५२ कोटी रुपयांच्या निधीमधून महापालिका आठ रस्ते तयार करणार आहे. सहा रस्त्यांची कामे रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सहा कामे सोपविण्यात आली. कमी वेळेत आणि कामांची गुणवत्ता चांगली असावी यादृष्टीने राज्य शासनाने हा निर्णय घेतला. 

शहरातील रस्त्यांसाठी याआधी राज्य शासनाकडून मिळालेल्या १०० कोटींतून सध्या ३० रस्त्यांची कामे सुरू आहेत. आणखी १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वीच करण्यात आली  होती. मात्र नेहमीप्रमाणे महापालिकेला यादी अंतिम करण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे निवडणुकीपूर्वी निधी मिळाला नाही. दरम्यान महापालिकेतर्फे २६३ कोटी रुपयांची यादी राज्य शासनाला पाठविण्यात आली होती. त्यातील पहिल्या टप्प्याचा निधी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून १५२ कोटी २४ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली.

राज्य सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या निधीतील कामे महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या तिन्ही विभागांना देण्यात आली आहेत. तिन्ही विभागांनी प्रत्येकी ५० कोटींची कामे पूर्ण करावीत, तसेच एकूण १५२ कोटी रकमेची नगरविकास विभागाच्या शहरी रस्ते विकास निधीतून प्रतिपूर्ती केली जाईल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रत्येकी सहा रस्त्यांची कामे एमआयडीसी व एमएसआरडीसीतर्फे केली जाणार आहेत. उर्वरित आठ रस्त्यांची कामे महापालिका करणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अंबलगन, शहर अभियंता एस. डी. पानझडे यांची उपस्थिती होती. 

तीन दिवसांत निविदा निघणारशहरातील २२ रस्त्यांच्या कामांची निविदा तीन दिवसांमध्ये काढण्यात येणार आहे. महापालिका ८, रस्ते विकास महामंडळ ६, एमआयडीसी ६ रस्त्यांची कामे करणार आहे. एकूण २० रस्त्यांची २२ किलोमीटरची कामे केली जाणार आहेत. नेमकी कोणत्या रस्त्यांची कामे हाती घ्यायची, याचा निर्णय औरंगाबादमध्ये आल्यानंतर घेण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी नमूद केले. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत व सर्व कामे एकाच वेळी सुरू करून कमीत कमी कालावधीत पूर्ण व्हावीत म्हणून तीन वेगवेगळ्या विभागांना ती देण्यात आली आहेत.

तीन विभागांना प्रत्येकी ५० कोटींची कामे तिन्ही विभागांनी प्रत्येकी ५० कोटींची कामे पूर्ण करावीत, तसेच एकूण १५२ कोटी रकमेची नगरविकास विभागाच्या शहरी रस्ते विकास निधीतून प्रतिपूर्ती केली जाईल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. विशेष म्हणजे या कामांमध्ये साईड ड्रेन, फुटपाथ, दुभाजकांसह रोड फर्निचरच्या कामांचाही समावेश आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार