शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

औरंगाबादच्या रस्त्यांसाठी १५२ कोटी मंजूर; महापालिका निवडणुक जिंकण्याच्या दिशेने महाआघाडीचे पाऊल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 20:01 IST

महापालिका ८, रस्ते विकास महामंडळ ६, एमआयडीसी ६ रस्त्यांची कामे करणार आहे.

ठळक मुद्देसर्व कामे एकाच वेळी सुरू होणारतीन वेगवेगळ्या विभागांना ती देण्यात आली कामे

औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुका जिंकण्याच्या दिशेने पाऊल म्हणून महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटी २४ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. या निधीतून २० रस्त्यांची कामे केली जाणार असून, विशेष म्हणजे केवळ तीन दिवसांमध्ये कामाच्या  निविदाही काढण्यात येणार आहेत. 

शहरातील रस्त्यांसाठी एकाच टप्प्यात पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम जाहीर करण्यात आली आहे. यामुळे राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या शहराच्या रस्त्यांची स्थिती आणखी उत्तम होणार आहे. शहरातील रस्त्यांसाठी निधी जाहीर केल्याचे औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईत जाहीर केले. नव्याने मिळणाऱ्या १५२ कोटी रुपयांच्या निधीमधून महापालिका आठ रस्ते तयार करणार आहे. सहा रस्त्यांची कामे रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सहा कामे सोपविण्यात आली. कमी वेळेत आणि कामांची गुणवत्ता चांगली असावी यादृष्टीने राज्य शासनाने हा निर्णय घेतला. 

शहरातील रस्त्यांसाठी याआधी राज्य शासनाकडून मिळालेल्या १०० कोटींतून सध्या ३० रस्त्यांची कामे सुरू आहेत. आणखी १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वीच करण्यात आली  होती. मात्र नेहमीप्रमाणे महापालिकेला यादी अंतिम करण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे निवडणुकीपूर्वी निधी मिळाला नाही. दरम्यान महापालिकेतर्फे २६३ कोटी रुपयांची यादी राज्य शासनाला पाठविण्यात आली होती. त्यातील पहिल्या टप्प्याचा निधी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून १५२ कोटी २४ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली.

राज्य सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या निधीतील कामे महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या तिन्ही विभागांना देण्यात आली आहेत. तिन्ही विभागांनी प्रत्येकी ५० कोटींची कामे पूर्ण करावीत, तसेच एकूण १५२ कोटी रकमेची नगरविकास विभागाच्या शहरी रस्ते विकास निधीतून प्रतिपूर्ती केली जाईल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रत्येकी सहा रस्त्यांची कामे एमआयडीसी व एमएसआरडीसीतर्फे केली जाणार आहेत. उर्वरित आठ रस्त्यांची कामे महापालिका करणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अंबलगन, शहर अभियंता एस. डी. पानझडे यांची उपस्थिती होती. 

तीन दिवसांत निविदा निघणारशहरातील २२ रस्त्यांच्या कामांची निविदा तीन दिवसांमध्ये काढण्यात येणार आहे. महापालिका ८, रस्ते विकास महामंडळ ६, एमआयडीसी ६ रस्त्यांची कामे करणार आहे. एकूण २० रस्त्यांची २२ किलोमीटरची कामे केली जाणार आहेत. नेमकी कोणत्या रस्त्यांची कामे हाती घ्यायची, याचा निर्णय औरंगाबादमध्ये आल्यानंतर घेण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी नमूद केले. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत व सर्व कामे एकाच वेळी सुरू करून कमीत कमी कालावधीत पूर्ण व्हावीत म्हणून तीन वेगवेगळ्या विभागांना ती देण्यात आली आहेत.

तीन विभागांना प्रत्येकी ५० कोटींची कामे तिन्ही विभागांनी प्रत्येकी ५० कोटींची कामे पूर्ण करावीत, तसेच एकूण १५२ कोटी रकमेची नगरविकास विभागाच्या शहरी रस्ते विकास निधीतून प्रतिपूर्ती केली जाईल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. विशेष म्हणजे या कामांमध्ये साईड ड्रेन, फुटपाथ, दुभाजकांसह रोड फर्निचरच्या कामांचाही समावेश आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार