शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१५० टन बटाटे मातीमोल भावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:04 IST

गुरुवारी जाधववाडीतील अडत बाजारात आग्ऱ्याहून तब्बल १५० टन जुन्या बटाट्याची आवक झाली. एक क्विंटल बटाट्याला २५० रुपये गाडीभाडे लागले अन् येथे तोच बटाटा ३०० रुपये क्विंटलने विक्री झाला. मातीमोल भावात बटाटा खरेदी करण्यासाठी सकाळी हजारो ग्राहक जमले होते. तरीही मोठ्या प्रमाणात बटाटे विक्रीविना पडून होते.

ठळक मुद्देहालबेहाल : गाडीभाडे प्रति क्विंटल २५० रुपये अन् विक्री ३०० रुपयांत

औरंगाबाद : गुरुवारी जाधववाडीतील अडत बाजारात आग्ऱ्याहून तब्बल १५० टन जुन्या बटाट्याची आवक झाली. एक क्विंटल बटाट्याला २५० रुपये गाडीभाडे लागले अन् येथे तोच बटाटा ३०० रुपये क्विंटलने विक्री झाला. मातीमोल भावात बटाटा खरेदी करण्यासाठी सकाळी हजारो ग्राहक जमले होते. तरीही मोठ्या प्रमाणात बटाटे विक्रीविना पडून होते.आग्रा येथे बटाट्याचे शेकडो शीतगृह आहेत. तेथून देशभरात बटाट्याचा पुरवठा होतो. आजघडीला शीतगृहामध्ये हजारो टन बटाटे शिल्लक आहेत. नवीन बटाट्याची आवक सुरू झाल्याने शीतगृहचालकांनी जुने बटाटे शीतगृहातून बाहेर काढणे सुरू केले आहे. तेथे जागेवर फुकटात बटाटे मिळत आहेत. येथील अडत्यांना फक्त तेथून बटाटे आणण्याचे गाडीभाडे, हमाली द्यावी लागत आहे. व्यापारी मुजीब शेठ यांनी सांगितले की, आज जाधववाडीत १५० टन बटाट्याची आवक झाली. जुन्या बटाट्याचे वेफर्स, चिवडा तयार करता येत नाही. खाण्यास गोड असतात यामुळे या बटाट्याला मागणी कमी असते. आग्ºयाहून एका मालट्रकमध्ये २० टन बटाटे आणले जातात. २५० रुपये प्रतिक्विंटल गाडीभाडे लागले. येथे ३०० रुपये क्विंटलने बटाटे विक्री झाले. आज अडत बाजारात ३०० ते ६०० रुपये क्विंटलपर्यंत बटाटे विक्री झाले. यात ८० टक्के बटाटे हा ३०० रुपये क्विंटलने विक्री झाले.इंदूरमध्ये नवीन बटाट्याची आवक सुरू झाली आहे. हे बटाटे वेफर्स, चिवडा करण्यासाठी उपयोगाचे असतात. मात्र, जागेवरच ८०० ते १ हजार रुपये प्रति क्विंटलने नवीन बटाटे विकले जात आहेत. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात कमी भावातील जुने बटाटे शिल्लक आहेत. ते विक्री झाल्यानंतर नवीन बटाटे मागविण्यात येतील.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद