शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेच्या खात्याकडून औरंगाबादेत १५० कोटींचा निधी; सर्वाधिक ५७ कोटी शिरसाटांना दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:27 IST

ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, ती कामे मंजूर होऊन पूर्ण होत आली आहेत.

औरंगाबाद : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शहरातील आमदारांना १५० कोटींच्या कामांचा धनलाभ झाला असून, त्यांच्या बंडखोरीनंतर सुमारे ३० कोटींची कामे अधांतरी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, ती कामे मंजूर होऊन पूर्ण होत आली आहेत. ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, त्या कामांबाबत काय होईल, हे आताच सांगणे अवघड आहे. शिंदे यांच्यासोबत जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यातील आ. संजय शिरसाट यांना ५७ कोटींचा निधी शिंदे यांनी दिला. प्रदीप जैस्वाल यांना १५ कोटींचा निधी दिला. शहरातील विविध विकासकामांसाठी शिंदे यांनी मागील तीन वर्षांत सुमारे १५० कोटींचा निधी दिला. त्यातील सर्वाधिक ५७ कोटींची कामे एकट्या पश्चिम मतदारसंघात झाली. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या ३० कोटींच्या कामांना खीळ बसू शकते.

नगरविकास खात्याने शहरातील लोकप्रतिनिधींना निधी दिल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाच्या आकडेवारीतून समोर आली. शिरसाट, जैस्वाल, भुमरे या तीन बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात ७३ कोटींचा निधी मंजूर केला. तसेच अंबादास दानवे, माजी खा. चंद्रकांत खैरे यांना २७ कोटींचा निधी मंजूर केला. ११४ कोटींच्या निधीतील विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आणखी ३० कोटींची कामे शिल्लक असल्याचे कळते. आता शिंदे यांच्याकडून नगरविकास खाते काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली कामे अधांतरी राहण्याची चर्चा आहे. रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील निधीचा आकडा वेगळा आहे. तसेच खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. सतीश चव्हाण यांनाही मागणीनुसार काही प्रमाणात निधी मिळाला.

प्रशासकीय मान्यतेसाठी अधिकारी मुंबईलाजिल्ह्यातील कामांसाठी जलसंपदा, नगरपालिका प्रशासनातील अधिकारी मंगळवारी मुंबईला रवाना झाले. जलसंपदा खात्याचे अध्यादेश निघाले असले तरी किती कामांना मंजुरी मिळते, हे या आठवड्यात समोर येईल.

पीडब्ल्यूडीला १५० कोटींच्या मान्यतापीडब्ल्यूडीच्या १५० कोटींच्या कामांना मार्चमध्येच मान्यता मिळाली आहे. उर्वरित कामांच्या मान्यता मागील पंधरवड्यात पूर्ण झाल्या आहेत. सध्या कुठल्याही मंजुरीसाठी प्रस्ताव नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ