शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

चुलीतील विस्तवाने झोपडी पेटून १५ शेळ्यांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 16:00 IST

१५ शेळ्या होरपळून मृत्युमुखी पडल्या तर 8 शेळ्या जखमी झाल्या

औरंगाबाद : चुलीतील विस्तवाने झोपडी पेटल्याने त्यात बांधलेल्या १५ शेळ्या होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री खुलताबाद तालुक्यातील नंद्राबाद येथे घडली.

नंद्राबाद येथील गट नंबर 23 मध्ये सुखलाल रखमाजी मोरे हे आपली आई नगुबाई रखमाजी मोरे यांच्यासोबत झोपडीत राहतात. सुखलाल हे शेळीपालन करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी रात्री झोपडीतील चुलीवर स्वंयपाक केल्यानंतर नगुबाई यांनी त्यातील लाकडे विझवली. रात्री सुखलाल यांनी शेळ्यांना झोपडीत बांधले व ते आईसोबत बाहेर झोपले. 

मध्यरात्री अचानक चुलीतील विस्तवाने पेट घेतला. वारा असल्याने विस्तव उडून बाहेर आल्याने गवताची झोपडी काही क्षणातच संपूर्ण पेटली. आतील शेळ्यांच्या आवाजाने सुखलाल यांना जाग आली. त्यांनी शेळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत १५ शेळ्या होरपळून मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यांनी प्रयत्नपूर्वक जखमी 8 शेळ्यांना बाहेर काढले. यात ते सुद्धा भाजले गेले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी विलास सोनवणे, तलाठी सचिन भिंगारे, पोहेकॉ संजय जगताप, गणेश लिपने यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. सरपंच सय्यद इलियास, उपसरपंच संतोष बोडखे, माजी सरपंच द्वारकादास घोडके, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सय्यद  रफीक, ग्रा.पं. सदस्य राम निंभोरे यांनी भेट देऊन मोरे यांना शासकीय मदतीची मागणी केली.

 

टॅग्स :fireआगDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद